शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जंगलातील वणवा विझवणारे अग्निदूत जंगलात झाले तयार

By सुरेश लोखंडे | Updated: March 11, 2023 18:40 IST

ठाणेकरांचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरच्या जंगलात चोरवाटांनी शिरकाव करणाऱ्यांकडून वेळोवेळी वणवे लावण्याच्या घटना घडतात.

ठाणे : ग्लोबल वॉर्मिंगचे संकट अधिकाधिक गहिरे होत असतानाच ठाणे जिल्ह्यातील येऊर, तुंगारेश्वर, तानसा, भातसा, माळशेज, घाटघर येथील जंगलात मानवनिर्मिती अथवा वीज कोसळून किंवा झाडांच्या घर्षणातून वणवा पेटण्याचे प्रकार वाढले आहेत. वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होऊ नये याकरिता वन विभागाने जंगल परिसरात वास्तव्य करणाऱ्यांच्या समित्या स्थापन केल्या आहेत. वणवा लागल्यास तो लवकरात लवकर कसा विझवायचा, याचे प्रशिक्षण या नागरिकांना दिले आहे. जाळपट्टे तयार करुन धसईच्या जंगलात लागलेला वणवा स्थानिकांनी तातडीने विझवला. भविष्यात ठिकठिकाणी याच माध्यमातून वनसंपदेचे रक्षण केले जाणार आहे.

ठाणेकरांचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरच्या जंगलात चोरवाटांनी शिरकाव करणाऱ्यांकडून वेळोवेळी वणवे लावण्याच्या घटना घडतात. मुंबई-नाशिक महामार्गाला लागून असलेल्या भातसा, तानसा अभयारण्य परिसरातही मानवनिर्मित वणवे लावले जातात. शहापूर तालुक्यातील खर्डी, पाशाळा, विहिगाव, डोळखांब, धसई आदी जंगलातील वणवे रोखण्यासाठी उपवनसंरक्षक सचिन रेपाळ, वनरक्षक योगेश पाटील, विनोद लबडे आणि सहकाऱ्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप करुन कुठे वणवा लागला तर लागलीच इतरांना जागरूक करण्याची व्यवस्था केली. दोन दिवसांपूर्वी मुरबाड तालुक्यातील शिरवाडी गाव परिसरातील जंगलात पाच बाय पाच फुटांचे जाळपट्टे स्थानिकांनी तयार केले. येथील जमीन जाळून टाकल्याने वणवा लागला तरी जाळपट्ट्यापर्यंत येऊन थांबतो व विझतो. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता वनविभागाने जंगल परिसरात सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (सीएफआर) स्थापन केल्याची माहिती रहिवासी राजेंद्र सोनगळ यांनी ‘लोकमत’ला दिली. शिरवाडी येथील १५० हेक्टर वन जमिनीचे वणव्यापासून रक्षण करण्याची जबाबदारी समितीवर सोपवली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे एकीकडे खाडीने तर दुसरीकडे भल्यामोठ्या जंगलांनी वेढली आहेत. केंद्रीय वनविभागाकडून स्थानिक वन अधिकाऱ्यांना ‘फायर अलर्ट’ ही ऑनलाइन यंत्रणा केंद्राच्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाकडून सुरू करण्यात आल्याची माहिती धसई वनरक्षक पाटील यांनी दिली. वणवा विझवण्यासाठी अत्याधुनिक एअर ब्लोअरच्या बॅकपॅकसह पाण्याच्या फवारणीचे पंप आणि झाडाच्या फांद्याचा वापर केला जात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. स्थानिकांनाही प्रशिक्षित करून जनजागृती केली आहे.

यामुळे लागतो वणवा

वणवा का लागतो याबाबत सेवानिवृत्त वनाधिकारी प्रवीण पाटील म्हणाले की, आकाशातून वीज कोसळली, झाडांचे घर्षण झाले तर नैसर्गिक कारणास्तव वणवा लागतो. बेफिकिरीने फेकलेली जळती सिगारेट/विडी अथवा फेकलेली जळती माचीसची काडी, शेतीसाठी पेटवलेल्या पालापाचोळ्यामुळेही वणवा लागतो. ही व अशी मानवनिर्मित वणव्याची कारणे आहेत. मात्र वणव्यांमुळे वन्य पशुपक्षी, त्यांची निवासस्थाने, औषधी वनस्पती, चारा, गवत जळून भस्मसात होते.

 

टॅग्स :thaneठाणे