शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भिवंडी तालुक्यातील खोणी येथे प्लॅस्टिक मणी बनवण्याच्या कारखान्यास भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:54 IST

प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यास बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

 भिवंडी: भिवंडी शहरा नजीकच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मच्छा कंपाऊंड येथे प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यास बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून ही आग भयंकर असल्याने आगीच्या ज्वाळांनी सिमेंटचे पत्रे उडाले असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तर या आगीच्या ज्वाळांनी नजीकच्या गोदामात साठवून ठेवलेले प्लास्टिकचे मणी असलेला साठा सुद्धा जळून खाक झाला आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होत या आगीवर सुमारे दीड तासात नियंत्रण मिळवले आहे. तर कारखान्यां मध्ये काम करणारे तब्बल दहा कामगार यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत कारखान्या बाहेर पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

आगीचं कारण अजून स्पष्ट नसले तरी सुद्धा प्लास्टिक मणी बनवण्याच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर केमिकल चा साठा असल्याने त्या केमिकल ने पेट घेतल्याने या आगीने रौद्र रूप धारण केले होते .त्यानंतर सुमारे तीन तासाने या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविले आहे .

खोणी भागात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक मणी बनविण्याचे कारखाने आहेत परंतु त्यांच्याकडे अग्नी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने या आगीत इतरांचेही नुकसान होत असून होणाऱ्या प्रदूषणा कडे प्रदूषण नियंत्रण महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे .

टॅग्स :fireआगBhiwandiभिवंडी