शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

अपुऱ्या मनुष्यबळावर अग्निशमन विभागाचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 03:30 IST

१९९९ मध्ये सुरू झालेल्या अग्निशमन दलात कर्मचारी नियुक्तीसाठी सरकारने केवळ ११ पदांनाच मंजुरी दिली. पुढे वाढती लोकसंख्या व लोकवस्तीच्या प्रमाणात ही सेवा कमी पडू लागल्याने

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागात राज्य सरकारने १०३ पदांना मंजुरी दिली आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक २२४ पदांच्या निर्मितीचा ठराव २०११ मध्ये महासभेत मंजूर केला. राज्य सरकारच्या मान्यतेसाठी हा ठराव प्रशासनाने तब्बल चार वर्षांनी पाठवला. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

१९९९ मध्ये सुरू झालेल्या अग्निशमन दलात कर्मचारी नियुक्तीसाठी सरकारने केवळ ११ पदांनाच मंजुरी दिली. पुढे वाढती लोकसंख्या व लोकवस्तीच्या प्रमाणात ही सेवा कमी पडू लागल्याने पुरेशा मनुष्यबळाच्या नियुक्तीसाठी अतिरिक्त पदांना मंजुरी मिळावी, याकरिता माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी २००७ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. २००९ मध्ये न्यायालयाने अग्निशमन दलासाठी पुरेशा पदांना मंजुरी देण्याचे आदेश सरकारला दिले. राज्य सरकारने त्यावेळी ९२ पदांना मंजुरी दिली. सध्या या विभागात ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटावर ४२ चालक आहेत. २०११ मधील जनगणनेनुसार मीरा-भार्इंदर शहरांची लोकसंख्या आठ लाख १४ हजार इतकी असली, तरी ती १२ लाखांवर असल्याचे सांगण्यात येत आहे.सिल्व्हर पार्क येथील केंद्र सुरू आहे, तर उत्तन व मीरा रोड येथील कनाकिया परिसरात असलेल्या केंद्रांत प्रत्येकी दोन वाहने तैनात असून भार्इंदर पश्चिमेकडील कल्पना चावला केंद्रात एकच वाहन तैनात केले आहे. नवघर येथील केंद्र सध्या बंद आहे. सुरू असलेल्या केंद्रांपैकी ६० फूट मार्ग व सिल्व्हर पार्क केंद्रात प्रत्येक पाळीत एक चालक व दोन फायरमन, तर उर्वरित केंद्रांत प्रत्येक पाळीत प्रत्येकी एक चालक व फायरमन तैनात केले जातात.प्रत्यक्षात एका केंद्रात किमान २५ कर्मचारी तीन पाळ्यांत कार्यरत असणे अपेक्षित असताना तुटपुंज्या मनुष्यबळावर अग्निशमन विभागाचा गाडा हाकला जात आहे.वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अग्निशमन दलासाठी मुख्य अग्निशमन अधिकाºयाची वानवा अनेक वर्षांपासून असून तूर्तास त्याचा पदभार प्रभारी अधिकाºयाकडे दिला आहे. सरकारच्या वेळाकाढूपणाबद्दल येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिका प्रशासनाने पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.या पदांचा आहे समावेशया विभागात कार्यरत असलेल्या स्थायी अधिकारी व कर्मचाºयांखेरीज अतिरिक्त २२४ पदनिर्मितीचा ठराव ३१ आॅक्टोबर २०११ च्या महासभेत मंजूर करण्यात आला. त्यात केंद्र अधिकाºयाची दोन पदे, प्रमुख अग्निशामकाची १० पदे, यंत्रचालक व चालकाची ३५ पदे, चालकाची सात पदे व अग्निशामकांच्या १६९ पदांचा समावेश आहे.भार्इंदर पालिका : २२४ पदांच्या निर्मितीचा ठराव मंजुरीसाठी सरकारकडे पडून 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका