शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या मनुष्यबळावर अग्निशमन विभागाचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 03:30 IST

१९९९ मध्ये सुरू झालेल्या अग्निशमन दलात कर्मचारी नियुक्तीसाठी सरकारने केवळ ११ पदांनाच मंजुरी दिली. पुढे वाढती लोकसंख्या व लोकवस्तीच्या प्रमाणात ही सेवा कमी पडू लागल्याने

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागात राज्य सरकारने १०३ पदांना मंजुरी दिली आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक २२४ पदांच्या निर्मितीचा ठराव २०११ मध्ये महासभेत मंजूर केला. राज्य सरकारच्या मान्यतेसाठी हा ठराव प्रशासनाने तब्बल चार वर्षांनी पाठवला. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

१९९९ मध्ये सुरू झालेल्या अग्निशमन दलात कर्मचारी नियुक्तीसाठी सरकारने केवळ ११ पदांनाच मंजुरी दिली. पुढे वाढती लोकसंख्या व लोकवस्तीच्या प्रमाणात ही सेवा कमी पडू लागल्याने पुरेशा मनुष्यबळाच्या नियुक्तीसाठी अतिरिक्त पदांना मंजुरी मिळावी, याकरिता माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी २००७ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. २००९ मध्ये न्यायालयाने अग्निशमन दलासाठी पुरेशा पदांना मंजुरी देण्याचे आदेश सरकारला दिले. राज्य सरकारने त्यावेळी ९२ पदांना मंजुरी दिली. सध्या या विभागात ८३ स्थायी अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटावर ४२ चालक आहेत. २०११ मधील जनगणनेनुसार मीरा-भार्इंदर शहरांची लोकसंख्या आठ लाख १४ हजार इतकी असली, तरी ती १२ लाखांवर असल्याचे सांगण्यात येत आहे.सिल्व्हर पार्क येथील केंद्र सुरू आहे, तर उत्तन व मीरा रोड येथील कनाकिया परिसरात असलेल्या केंद्रांत प्रत्येकी दोन वाहने तैनात असून भार्इंदर पश्चिमेकडील कल्पना चावला केंद्रात एकच वाहन तैनात केले आहे. नवघर येथील केंद्र सध्या बंद आहे. सुरू असलेल्या केंद्रांपैकी ६० फूट मार्ग व सिल्व्हर पार्क केंद्रात प्रत्येक पाळीत एक चालक व दोन फायरमन, तर उर्वरित केंद्रांत प्रत्येक पाळीत प्रत्येकी एक चालक व फायरमन तैनात केले जातात.प्रत्यक्षात एका केंद्रात किमान २५ कर्मचारी तीन पाळ्यांत कार्यरत असणे अपेक्षित असताना तुटपुंज्या मनुष्यबळावर अग्निशमन विभागाचा गाडा हाकला जात आहे.वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अग्निशमन दलासाठी मुख्य अग्निशमन अधिकाºयाची वानवा अनेक वर्षांपासून असून तूर्तास त्याचा पदभार प्रभारी अधिकाºयाकडे दिला आहे. सरकारच्या वेळाकाढूपणाबद्दल येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिका प्रशासनाने पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.या पदांचा आहे समावेशया विभागात कार्यरत असलेल्या स्थायी अधिकारी व कर्मचाºयांखेरीज अतिरिक्त २२४ पदनिर्मितीचा ठराव ३१ आॅक्टोबर २०११ च्या महासभेत मंजूर करण्यात आला. त्यात केंद्र अधिकाºयाची दोन पदे, प्रमुख अग्निशामकाची १० पदे, यंत्रचालक व चालकाची ३५ पदे, चालकाची सात पदे व अग्निशामकांच्या १६९ पदांचा समावेश आहे.भार्इंदर पालिका : २२४ पदांच्या निर्मितीचा ठराव मंजुरीसाठी सरकारकडे पडून 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका