शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

प्रकल्पांची कामे मुदतीपूर्वीच पूर्ण करा - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:36 IST

अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा हातखंडा आहे.

कल्याण : अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा हातखंडा आहे. सहापदरी रस्ता तसेच वाहतूकदृष्ट्या अत्यंत निकडीच्या असलेल्या पत्रीपुलाचे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान ‘एमएसआरडीसी’ने स्वीकारावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.शीळफाटा-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या आणि नवीन पत्रीपुलाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे, आमदार सुभाष भोईर, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ पलावा जंक्शन येथे झाला. त्यानंतर, नव्या पत्रीपुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. याच ठिकाणी मुख्य कार्यक्रम पार पडला. दरम्यान, वाहतूककोंडीमुळे पालकमंत्र्यांना कल्याण फाट्यापासून सोनारपाडापर्यंत विरूद्ध दिशेने वाहन चालवून कार्यक्रमस्थळी पोहोचावे लागले. त्यामुळे पालकमंत्र्यांनीच नियम तोडल्याची चर्चा सुरू होती.शिंदे म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीसह अन्य बाजूच्या शहरांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असून अनेक आंदोलनेही झाली. दरम्यान, हे दोन्ही प्रकल्प महत्त्वपूर्ण असून त्यामुळे निश्चितच वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. तीस महिन्यांत सहापदरी रस्ता, तर आठ महिन्यांत पत्रीपूल पूर्ण केला जाणार आहे. मात्र, एमएसआरडीसीने त्याहीपेक्षा लवकर हा पूल बांधण्याचा प्रयत्न करावा, असे शिंदे म्हणाले. एमएसआरडीसीच्या माध्यमातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले असून नागपूर-मुंबई हे ७०० किलोमीटरचे १० ते १५ तासांचे अंतर सहा तासांवर येणार आहे. ठाणे-बोरिवली हे दोन तासांचे अंतर एका बोगद्याच्या माध्यमातून १० मिनिटांत कापले जाणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. राज्यमंत्री चव्हाण यांनीही या प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर व्हावीत, अशी सूचना केली. दरम्यान, सहापदरी रस्त्यामुळे बाधित होणारे जमीनधारक, शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा निर्णय घेण्याआधीच भूमिपूजनाच्या कामाचा घाट घातल्याचा आरोप करत भूमिपुत्रांनी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केली. आधी मोबदला द्या, मगच कामाला सुरुवात करा, अशी मागणी त्यांनी केली. शिष्टमंडळातर्फे पालकमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. त्यावर भूमिपुत्रांना मोबदला मिळेल. भूमिपुत्रांच्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी समितीकमिटी स्थापन केल्याचे शिंदे यांनी सांगितले.‘ती’ मार्गिका चुकीचीनुकत्याच पार पडलेल्या मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात राज्यमंत्री चव्हाण यांनी डोंबिवली मेट्रोची मागणी केली होती. त्याबाबत बोलताना भोईर यांनी, मेट्रोच्या मार्गात दाखवण्यात आलेली मार्गिका चुकीची आहे.त्याचा संबंधितांना फायदा होणार नाही, असा टोला चव्हाणांना लगावला. यावर जास्तीतजास्त प्रवाशांना फायदा होईल, त्याच मार्गाने मेट्रो नेण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, असे चव्हाण यांनी उत्तर दिले.तर, प्रस्तावित कल्याण मेट्रो ही तळोजाहून शीळफाटामार्गे आली पाहिजे. तसेच बिर्ला कॉलेजमार्गे ही मेट्रो नेण्याबाबतही आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे