शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

एसटी कर्मचाऱ्यांचे पगाराविना आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:19 IST

अडचणींचा करावा लागतोय सामना : तत्काळ धोरण आखण्याची मागणी, संसाराचा गाडा कसा हाकणार?

हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या तोंडावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना जीवावर उदार होऊन इच्छित स्थळी पोचविणाºया जिल्ह्यातील २ हजार ७८८ एसटी कर्मचाºयांचा पगार देण्यात शासन पातळीवरून कुचराई केली जात असल्याने त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. पगार देण्याबाबत सरकारने तत्काळ धोरण आखण्याची मागणी कर्मचारी वर्गातून केली जात आहे.सर्वसामान्य प्रवाशांची जीवनरेखा म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केलेली एसटी सेवा आणि ते चालविणारे चालक, वाहक, तंत्रज्ञ आदी वर्ग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकटात सापडला आहे. कोरोनाच्या संकटामुळे एसटी सेवेवर परिणाम झाल्यानंतर एसटी विभागाच्या फेºयांवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर एसटी परिवहन विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा, नालासोपारा असे एकूण ८ आगार असून या आगारातून दररोज एसटी बसच्या ३ हजार ३७४ फेºयांसह १ लाख ४३ हजार किलोमीटर्सचा प्रवास केला जात आहे. यातून पालघर विभागाला सुमारे ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते. पालघर आगारातून ६९२ फेºयांद्वारे दररोज २१ हजार १३८ किलोमीटर्सचा प्रवास पार केला जातो, तर सफाळे आगाराच्या ४२७ फेºयांद्वारे ७ हजार ६७६ किमी, वसई आगाराच्या ३५८ फेºयांद्वारे २० हजार १४५ किमी, अर्नाळा आगाराच्या २९८ फेºयाद्वारे २२ हजार ६५५.४ किमी, डहाणू आगाराच्या ४४५ फेºयांद्वारे १६ हजार ०४०.६ किमी, जव्हार आगाराच्या ४५७ फेºयांद्वारे १९ हजार ६३६.३ किमी, बोईसर आगाराच्या ५५५ फेºयांद्वारे २२ हजार ०३८.२ किमी आणि नालासोपारा आगाराच्या १४६ फेºयांद्वारे १३ हजार ८८७ किमीचा प्रवास पार पाडत एसटीचे चालक आणि वाहक एसटी विभागाला सुमारे ४५ लाखाचे उत्पन्न मिळवून देत आहेत.पालघर विभागात एकूण १ हजार २४१ चालक असून ५११ वाहक, ५०२ तंत्रज्ञ, ५३४ इतर कर्मचारी असा एकूण २ हजार ७८८ कर्मचारीवर्ग कार्यरत आहेत. मार्च महिन्यापासून कोरोनाचा हळूहळू प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने गर्दी जमणाºया सरकारी यंत्रणांना बंद करण्याचे आदेश निघाले आणि एसटी, रेल्वे या सरकारी यंत्रणांना सर्वात मोठा फटका बसला आहे. पालघर एसटी विभागाला आज ४० ते ५० कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले असून त्याचा थेट फटका कर्मचाºयांच्या कुटुंबाला बसला आहे. मार्च महिन्याचा अर्धा पगार, एप्रिलचा ७५ टक्के, मे अर्धा पगार, जून अजून मिळालेला नाही, तर जुलै महिन्याच्या पगाराची शाश्वती नसल्याने घरखर्च, मुलांच्या शाळेची फी, आजार खर्च, एसटी विभागाकडून घेतलेले कर्ज, बँकांचे कर्ज आदी खर्च सोसून खायचे काय? अशी बिकट परिस्थिती एसटी कर्मचाºयांवर ओढवली आहे. या पगाराबाबत एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाचा हा धोरणात्मक निर्णय असल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे.कोरोना संसर्गाची भीती असतानाही आम्ही कामावर येतोय. त्याचा मोबदला मिळत नाही. काम करूनही पगार मिळत नसल्याने कुटुंबाच्या उदारनिर्वाहासह अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.- चंद्रकांत पाटील, एसटीचालक