शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंड्यांचे आर्थिक थर कोसळणार

By admin | Updated: July 29, 2015 00:05 IST

ठाणे शहराची नवीन ओळख दहीहांडीचे ठाणे अशी निर्माण झाली आहे. मात्र, हंडींच्या उंचीवर आलेली मर्यादा आणि रस्त्यावरच्या उत्सवांवरील बंदी त्याचबरोबर आवाजाची मर्यादा

ठाणे : ठाणे शहराची नवीन ओळख दहीहांडीचे ठाणे अशी निर्माण झाली आहे. मात्र, हंडींच्या उंचीवर आलेली मर्यादा आणि रस्त्यावरच्या उत्सवांवरील बंदी त्याचबरोबर आवाजाची मर्यादा यामुळे दहीहांडीचा उत्सव साजरा कसा होणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे ठाण्यासह इतर भागातील ४ हजारांहून अधिक दहीहंडी आयोजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर होणाऱ्या या आयोजनांमधून अनेक गोविंदा मंडळांचे आर्थिक गणित जोडले गेल्याने या दहीहंड्या रद्द झाल्यास गोविंदांचे आर्थिक थर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाण्यातील ओपन हाऊस, टेंभी नाका, जांभळी नाका, कळवा नाका, शास्त्रीनगर नाका यांचे आयोजन रस्त्यावरच होते. या हंड्याच्या आयोजनामध्ये राजकीय आयोजकांचे प्रमाण ९० टक्के इतके आहे. हे उत्सव आयोजित करणारे मोठ्या प्रमाणात वर्गण्या गोळा करीत असतात. या उत्सवांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थकारण निर्माण होत असते. रस्त्यावर होणाऱ्या लहानमोठ्या दहीहंडी आयोजनांचा थेट संबंध गोविंदा मंडळांच्या आर्थिक उलाढालीशीही आहे. हंडींच्या बक्षीसांवर अनेक गोविंदा मंडळांचे शैक्षणिक, आरोग्यविषयक विविध वार्षिक उपक्र म ठरतात. त्यामुळे त्याचा थेट परिणाम या उपक्रमांवरही होण्याचीही शक्यता आहे. शिवाय, अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचे आर्थिक गणितेही दहीहंडीतून मिळणाऱ्या पैशात गुंतलेले असते. शिवाय, डीजे, ध्वनिक्षेपक, बिगारी, माथाडी कामगार आदींनाही या ठिकाणी व्यवसाय मिळत असतो. तो आता बंद होणार आहे. मिळणाऱ्या वर्गण्याही आयोजकांना घेता येणार नाहीत. त्यामुळे आयोजनाचे आर्थिक थर कोसळणार असल्याचे चित्र आहे. टेंभी नाक्यावरील सायलेन्स झोनचे काय? टेंभी नाका, जांभळी नाका, चरई हा एक किलोमीटरचा परिसर सायलेन्स झोनमध्ये येत आहे. न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शाळा आणि जिल्हा शासकीय रु ग्णालय या परिसरात आहे. मात्र, या भागातील आवाजाच्या निर्बंधांची कधीच काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही. टेंभी नाका येथे दिहहंडी आणि नवरात्रोत्सव मोठ्या गाजावाजामध्ये सुरु असतो. तर, जांभळी नाका येथेही चैत्री नवरात्रोत्सव आणि दिहहंडी मोठ्या आवाजामध्ये सुरु असते. दुसरीकडे आंबेडकर रोड परिसरातही दिहहंडी उभारण्यात येत असते. या भागातील सायलेन्स झोनचे निर्बंध कधीच शिथील केले जात नाहीत. तरीही, या ठिकाणी उत्सव साजरे होत असतात. त्यामुळे आता जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी काय कारवाई करणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.