शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

जुन्या बिल्डिंगच्या रहिवाशांसह बिल्डरलॉबीला आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:25 IST

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात कमी पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यात बांधकामाला बंदी घातली. या बंदीचा फटका ग्रामीणभागाऐवजी शहरी भागास जास्त बसेल.

ठाणे : कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात कमी पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यात बांधकामाला बंदी घातली. या बंदीचा फटका ग्रामीणभागाऐवजी शहरी भागास जास्त बसेल. चेनच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायात कोठ्यवधी रूपयांची गुंतवणूक करणाºया विकासकाला याचा आर्थिक फटका बसेल. यापेक्षा जास्त फटका जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांपुढे जीवन मरणाची समस्या उभी राहणार आहे.ग्रामस्थांकडून निर्माण होणाºया कचºयाची विल्हेवाट लावली जात आहे. ग्रामीण भागातील गावखेड्यात कचारा विल्हेवाटीची समस्या नाही, याशिवाय निवास व्यवस्थेची देखील समस्या नाही. पण शहरात वर्षानुवर्ष दाटावाटीने बांधलेल्या इमारतीं सध्या जीर्ण, मोडकळीस आणि धोकादायक झाल्या.त्यांची वेळीच पुनर्बांधणी करून लाखो रहिवाशांचे जीव वाचवणे आवश्यक आहे. पण बांधकामास बंदी घातल्यामुळे या इमारतींची पुनर्बांधणी करणे शक्य होणार नाही. प्रसंगी या रहिवाशांना जीव धोक्यात घालून राहावे लागेल अन्यथा त्यांना अन्यत्र राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करण्याचा फटका बसेल.ठाणे शहराच्या गावठाणमधील जुन्या इमारतींना या बंदीचा फटका बसेल. या शहराच्या सुमारे पाच ते आठ किमी.च्या पलिकडे विकास झाला. पण मुख्य ठाणे शहर म्हणजे जांभळी नाक, चेंदणी कोळीवाडा, चरई, कोपरी, कळवा, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट, म्हाडाच्या जुन्या इमारती आदी परिसरातील इमारतींची पुनर्बांधणी होणे अपेक्षित आहे. पण ती या बंदीमुळे रखडणार आहे. या कालावधीत व्यवसायीक इमारतींऐवजी रहिवाशी इमारतींच्या पुनर्बांधणीस परवानगी मिळणे गरजेचे आहे. ज्या जागेवर रहिवाशी इमारत आहे. तेथे इमारतीच्या बांधकामास परवानगी मिळाल्यानंतरच या जुन्या इमारतींमधील रहिवाशांच्या निवाºयाची समस्या सूटेल.विकासकाच्या बांधकाम व्यवसायाला जोडून कितीतरी व्यवहार आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी विकासक बीन शेती कर शासनाला भरतो, एनए करण्यासाठी विकास कर ही त्यास द्यावा लागतो,जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहार व घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारातूनही शासनाला मोठ्या रकमांचा महसूल मिळतो, या सारख्या विविध स्वरूपाच्या कराव्दारे शासनाला मिळणार महसूल या बांधकाम बंदीमुळे बुडणार आहे. बांधकाम व्यवसायाीतील अभियंत्यांपासून ते ठेकेदार, मुकादम, मजूर, कारपेंटर, मिस्तरी आदींच्या रोजीरोटी बुडेल....तर सर्वसामान्यांना घर घेणे परवडणार नाहीबांधकाम व्यवसायावर खालपासून वरपर्यंत असलेले चेन पूर्णपणे विस्कळीत होऊन बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल, सध्या तयार असलेल्या इमारतींमधील घराच्या किंमतीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होईल. सर्व सामान्य व्यक्तींना घरे घेणेच शक्य होणार नाही. बांधकाम साहित्यांच्या किंमतीही मोठ्याप्रमाणात वाढतील.आज लागू केलेली बंदी काही दिवसांनी उठवली तरी देखील काही वर्षांपर्यंत सामान्य व्यक्ती घरे घेऊन शकणार नाही, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक, व्यवायासीक फटका या बांधकाम बंदीमुळे होणार असल्याचे मत जाणकार तज्ज्ञांकडून ऐकायला मिळाले.

टॅग्स :thaneठाणे