शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या बिल्डिंगच्या रहिवाशांसह बिल्डरलॉबीला आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:25 IST

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात कमी पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यात बांधकामाला बंदी घातली. या बंदीचा फटका ग्रामीणभागाऐवजी शहरी भागास जास्त बसेल.

ठाणे : कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात कमी पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यात बांधकामाला बंदी घातली. या बंदीचा फटका ग्रामीणभागाऐवजी शहरी भागास जास्त बसेल. चेनच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायात कोठ्यवधी रूपयांची गुंतवणूक करणाºया विकासकाला याचा आर्थिक फटका बसेल. यापेक्षा जास्त फटका जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांपुढे जीवन मरणाची समस्या उभी राहणार आहे.ग्रामस्थांकडून निर्माण होणाºया कचºयाची विल्हेवाट लावली जात आहे. ग्रामीण भागातील गावखेड्यात कचारा विल्हेवाटीची समस्या नाही, याशिवाय निवास व्यवस्थेची देखील समस्या नाही. पण शहरात वर्षानुवर्ष दाटावाटीने बांधलेल्या इमारतीं सध्या जीर्ण, मोडकळीस आणि धोकादायक झाल्या.त्यांची वेळीच पुनर्बांधणी करून लाखो रहिवाशांचे जीव वाचवणे आवश्यक आहे. पण बांधकामास बंदी घातल्यामुळे या इमारतींची पुनर्बांधणी करणे शक्य होणार नाही. प्रसंगी या रहिवाशांना जीव धोक्यात घालून राहावे लागेल अन्यथा त्यांना अन्यत्र राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करण्याचा फटका बसेल.ठाणे शहराच्या गावठाणमधील जुन्या इमारतींना या बंदीचा फटका बसेल. या शहराच्या सुमारे पाच ते आठ किमी.च्या पलिकडे विकास झाला. पण मुख्य ठाणे शहर म्हणजे जांभळी नाक, चेंदणी कोळीवाडा, चरई, कोपरी, कळवा, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट, म्हाडाच्या जुन्या इमारती आदी परिसरातील इमारतींची पुनर्बांधणी होणे अपेक्षित आहे. पण ती या बंदीमुळे रखडणार आहे. या कालावधीत व्यवसायीक इमारतींऐवजी रहिवाशी इमारतींच्या पुनर्बांधणीस परवानगी मिळणे गरजेचे आहे. ज्या जागेवर रहिवाशी इमारत आहे. तेथे इमारतीच्या बांधकामास परवानगी मिळाल्यानंतरच या जुन्या इमारतींमधील रहिवाशांच्या निवाºयाची समस्या सूटेल.विकासकाच्या बांधकाम व्यवसायाला जोडून कितीतरी व्यवहार आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी विकासक बीन शेती कर शासनाला भरतो, एनए करण्यासाठी विकास कर ही त्यास द्यावा लागतो,जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहार व घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारातूनही शासनाला मोठ्या रकमांचा महसूल मिळतो, या सारख्या विविध स्वरूपाच्या कराव्दारे शासनाला मिळणार महसूल या बांधकाम बंदीमुळे बुडणार आहे. बांधकाम व्यवसायाीतील अभियंत्यांपासून ते ठेकेदार, मुकादम, मजूर, कारपेंटर, मिस्तरी आदींच्या रोजीरोटी बुडेल....तर सर्वसामान्यांना घर घेणे परवडणार नाहीबांधकाम व्यवसायावर खालपासून वरपर्यंत असलेले चेन पूर्णपणे विस्कळीत होऊन बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल, सध्या तयार असलेल्या इमारतींमधील घराच्या किंमतीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होईल. सर्व सामान्य व्यक्तींना घरे घेणेच शक्य होणार नाही. बांधकाम साहित्यांच्या किंमतीही मोठ्याप्रमाणात वाढतील.आज लागू केलेली बंदी काही दिवसांनी उठवली तरी देखील काही वर्षांपर्यंत सामान्य व्यक्ती घरे घेऊन शकणार नाही, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक, व्यवायासीक फटका या बांधकाम बंदीमुळे होणार असल्याचे मत जाणकार तज्ज्ञांकडून ऐकायला मिळाले.

टॅग्स :thaneठाणे