शहरं
Join us  
Trending Stories
1
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
2
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
3
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
4
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
5
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
6
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
7
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
10
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
11
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
12
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
13
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
14
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
15
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
16
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
17
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
18
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
19
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
20
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश

अखेर....उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात वेतन, कामगार नेत्यांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 17:31 IST

Ulhasnagar Municipal Corporation News : शासन जीएसटी अनुदाना अभावी महापालिका कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार दोन टप्प्यात देण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले.

- सदानंद नाईक उल्हासनगर -  शासन जीएसटी अनुदाना अभावी महापालिका कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार दोन टप्प्यात देण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. बुधवारी दुपारी कामगार नेते दिलीप थोरात यांनी मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्या कॅबिन समोर ठिय्या आंदोलन केल्यावर वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याला मान्यता दिल्याची माहिती थोरात यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिका आस्थापनाचा दरमहा एकून खर्च १९ कोटी पेक्षा जास्त असून त्यापैकी कर्मचारी पगारावर १२ कोटी खर्च होतो. तर महापालिकेला जीएसटी अनुदानपोटी १६ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळते. दरम्यान मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केल्याने, गेल्या महिन्यात २० कोटींची वसुली झाली. शासन अनुदान येण्यास विलंब झाल्याचे कारण महापालिका प्रशासनाने देत महिन्याची १७ तारीख उलटून गेल्यावर पगार झाला नसल्याने, कामगारात प्रचंड असंतोष निर्माण झाला. अभय योजने अंतर्गत वसुली झालेल्या २० कोटीच्या निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार का केले नाही?. असा प्रश्न कामगारांकडून करण्यात आला. कर्मचाऱ्यांचा पगार न देता, अभय योजने अंतर्गत जमा झालेले निधी गेला कुठे? असा प्रश्न विचारल्यावर, महापालिका प्रशासनाने याबाबत चुपकी साधली. 

कर्मचाऱ्यांचा पगार देण्या ऐवजी महापालिकेने ठेकेदारांची देणी प्रथम दिल्याने सर्वस्तरातून एकच टीकेची झोळ उठली. आखिल भारतीय काँग्रेस मजदूर संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग यांनी कर्मचाऱ्यांचा पगारवेळेत करीत नसेलतर, त्यांच्या पगाराच्या रक्कमेवर ६ टक्के व्याज शासन नियमानुसार देण्याची मागणी टाक यांनी केली होती. कर्मचाऱ्यांच्या पगारावरून महापालिकेची कोंडी झाल्यावर, शासनाने जीएसटी अनुदान त्वरित देण्याची मागणी शासनाकडे करावी लागली. तसेच कामगार नेते दिलीप थोरात यांच्या ठिय्या आंदोलनामुळे वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचा निर्णय घेतला. तसेच वर्ग-३ यांच्यासह अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्त वेतन देणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. महिन्याची १७ तारीख उलटूनही कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याने, कर्मचाऱ्यात असंतोष निर्माण झाला होता. तसेच कर्मचारी संघटनेने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यास सुरवात केल्यावर, अभय योजनेचा २० कोटीचा निधी ठेकेदारांच्या देणी देण्यावर खर्च केल्याचे उघड झाले. दरम्यान कर्मचाऱ्यांचा पगार नाही. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यावर महापालिका प्रशासनाने धाबे दणाणले होते. 

अभय योजने अंतर्गत वसूल झालेल्या निधींबाबत संभ्रम

 महापालिकेला मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेतुन २० कोटीची वसुली झाली. त्या निधीतून कर्मचाऱ्यांचा पगार देण्या ऐवजी प्रथम थकेदाराची देणी कोणाच्या आदेशानव्हे दिली. याबाबतची चर्चा महापालिका वर्तुळात होत आहे. मात्र तसे न होता. त्या निधीतून ठेकेदारांची देणी दिल्याचे बोलले जात आहे. ठेकेदारांची देणी प्रथम दिल्यानेच, कर्मचाऱ्यांचा पगार लटकल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर