शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

अखेर अंबरनाथमध्ये बेकायदेशीर रिक्षा चालकांवर कारवाई सुरू

By पंकज पाटील | Updated: January 11, 2024 18:42 IST

स्क्रॅप रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर यापुढे देखील कारवाई करत राहावी अशी मागणी रिक्षा संघटनेने केले आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील बेकायदेशीर रिक्षा चालवणाऱ्या व कारवाई होत नसल्यामुळे रिक्षा संघटना आक्रमक झाली होती या बेकायदेशीर रिक्षाच्या विरोधात अंबरनाथ बंदची हाक देण्यात आली होती अखेर अधिकाऱ्यांनी आजपासून या रिक्षा चालकांवर कारवाई सुरू केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

स्क्रॅप रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर यापुढे देखील कारवाई करत राहावी अशी मागणी रिक्षा संघटनेने केले आहे. अंबरनाथ शहरातील अनधिकृत रिक्षा चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुरुवारी अंबरनाथ वाहतूक विभाग आणि कल्याण परिवहन विभागाने अनधिकृत रिक्षाचालकांवर संयुक्त कारवाई केली. अनधिकृत रिक्षा चालकांमुळे परवानाधारक रिक्षाचालकांना त्रास होत असल्याने वाहतूक विभागाने अनधिकृत रिक्षा आणि चालकांवर कायमस्वरूपी कारवाई करावी या मागणीसाठी जोशीकाका रिक्षा चालक-मालक संघटनेचे शहर अध्यक्ष मिलिंद पाटील गुरुवारपासून रिक्षा बंदची हाक दिली होती. त्यामुळे रिक्षा चालकांच्या बेमुदत रिक्षा बंद आंदोलनाच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन अंबरनाथ वाहतूक विभागाणे बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस धडक कारवाई केली.

त्याचबरोबर कल्याण परिवहन विभागाने देखील संयुक्त कारवाई दरम्यान 18 ते 20 वाहनचालकांवर कारवाई केल्याचे कल्याण परिवहन विभागाचे अधिकारी सचिन आयरे यांनी सांगितले. अंबरनाथ वाहतूक विभागाने दोन दिवसात 20 रिक्षांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 20,000 रुपये दंड वसूल केल्याची माहिती अंबरनाथ वाहतूक विभागाचे अधिकारी गणेश पाटोळे यांनी दिली. शहरात साईट भाडा मारणारे बेकायदेशीर रिक्षा चालकांमुळे प्रामाणिक रिक्षा चालकांना त्रास सहन करावा लागत असल्याने रिक्षा संघटनाच या अनधिकृत रिक्षा चालकांच्या विरोधात उभी राहिली होती. अखेर रिक्षा संघटनेच्या या भूमिकेनंतर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना जाग आली आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथtraffic policeवाहतूक पोलीस