शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

अखेर अंबरनाथमध्ये बेकायदेशीर रिक्षा चालकांवर कारवाई सुरू

By पंकज पाटील | Updated: January 11, 2024 18:42 IST

स्क्रॅप रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर यापुढे देखील कारवाई करत राहावी अशी मागणी रिक्षा संघटनेने केले आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील बेकायदेशीर रिक्षा चालवणाऱ्या व कारवाई होत नसल्यामुळे रिक्षा संघटना आक्रमक झाली होती या बेकायदेशीर रिक्षाच्या विरोधात अंबरनाथ बंदची हाक देण्यात आली होती अखेर अधिकाऱ्यांनी आजपासून या रिक्षा चालकांवर कारवाई सुरू केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

स्क्रॅप रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर यापुढे देखील कारवाई करत राहावी अशी मागणी रिक्षा संघटनेने केले आहे. अंबरनाथ शहरातील अनधिकृत रिक्षा चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुरुवारी अंबरनाथ वाहतूक विभाग आणि कल्याण परिवहन विभागाने अनधिकृत रिक्षाचालकांवर संयुक्त कारवाई केली. अनधिकृत रिक्षा चालकांमुळे परवानाधारक रिक्षाचालकांना त्रास होत असल्याने वाहतूक विभागाने अनधिकृत रिक्षा आणि चालकांवर कायमस्वरूपी कारवाई करावी या मागणीसाठी जोशीकाका रिक्षा चालक-मालक संघटनेचे शहर अध्यक्ष मिलिंद पाटील गुरुवारपासून रिक्षा बंदची हाक दिली होती. त्यामुळे रिक्षा चालकांच्या बेमुदत रिक्षा बंद आंदोलनाच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन अंबरनाथ वाहतूक विभागाणे बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस धडक कारवाई केली.

त्याचबरोबर कल्याण परिवहन विभागाने देखील संयुक्त कारवाई दरम्यान 18 ते 20 वाहनचालकांवर कारवाई केल्याचे कल्याण परिवहन विभागाचे अधिकारी सचिन आयरे यांनी सांगितले. अंबरनाथ वाहतूक विभागाने दोन दिवसात 20 रिक्षांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 20,000 रुपये दंड वसूल केल्याची माहिती अंबरनाथ वाहतूक विभागाचे अधिकारी गणेश पाटोळे यांनी दिली. शहरात साईट भाडा मारणारे बेकायदेशीर रिक्षा चालकांमुळे प्रामाणिक रिक्षा चालकांना त्रास सहन करावा लागत असल्याने रिक्षा संघटनाच या अनधिकृत रिक्षा चालकांच्या विरोधात उभी राहिली होती. अखेर रिक्षा संघटनेच्या या भूमिकेनंतर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना जाग आली आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथtraffic policeवाहतूक पोलीस