शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

अखेर ‘ते’आधारकार्ड केंद्र पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:19 IST

डोंबिवली: केडीएमसीच्या येथील विभागीय कार्यालयात आधारकार्ड मिळण्याची व्यवस्था नागरीकांसाठी उपलब्ध करून दिली होती. परंतू नोंदणी (टोकण)कुठे करायची यावरून झालेल्या वादात हे कें द्र गुरूवारपासून बंद करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे आधारचे काम बंद राहील असा फलक कें द्राबाहेर लावण्यात आला असून केंद्र चालक कैलास डोंगरे यांनी सोयी सुविधा पुरविण्याबाबत केडीएमसीकडे मागणी केल्याने आता महापालिकेच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देनोंदणीचा उदभवलेला वाद : आता केडीएमसीच्या भुमिकेकडे लक्ष

डोंबिवली: केडीएमसीच्या येथील विभागीय कार्यालयात आधारकार्ड मिळण्याची व्यवस्था नागरीकांसाठी उपलब्ध करून दिली होती. परंतू नोंदणी (टोकण)कुठे करायची यावरून झालेल्या वादात हे कें द्र गुरूवारपासून बंद करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे आधारचे काम बंद राहील असा फलक कें द्राबाहेर लावण्यात आला असून केंद्र चालक कैलास डोंगरे यांनी सोयी सुविधा पुरविण्याबाबत केडीएमसीकडे मागणी केल्याने आता महापालिकेच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील वाचनालयाच्या जागेत राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले आहे. आधारकार्डासाठी याठिकाणी मध्यरात्रीपासूनच नागरीकांच्या रांगा लागतात. परंतू तीनपैकी केवळ दोन युनिटच सध्या चालू असल्याने रांगा लावूनही नंबर लागत नसल्याने नागरीकांची पुरती परवड झाली आहे. दरम्यान केंद्रावर वाढती गर्दी आणि मध्यरात्रीपासून बाहेर लागत असलेल्या रांगा पाहता सुरक्षेच्या अनुषंगाने केंद्रचालक डोंगरे यांनी नवीन आधार नोंदणी व सुधारीत आधार कार्डसाठी टोकण हे सावरकररोडवरील जाणता राजा कार्यालयात सायंकाळी ४ ते ५ यावेळेत मिळेल असे फलक केंद्राबाहेर लावले होते. पण याला आरटीआय कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी हरकत घेत नोंदणी एखादया राजकीय (भाजपच्या) पक्षाच्या कार्यालयात का? असा सवाल केला. यावर डोंगरे यांनी नोंदणीसाठी निंबाळकर यांच्याशी संपर्क साधावा असे फलक केंद्राबाहेर लावल्याने दोघांमध्ये बुधवारी जोरदार वाद झाला होता. या वादात नागरीक वेठीला धरले गेलेच त्याचबरोबर हे केंद्र बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. ती शक्यता गुरूवारी प्रत्यक्षात उतरली. त्रांतिक कारण पुढे करीत हे केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळपासूनच केंद्रावर आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरीकांना बंदच्या सूचना पाहून माघारी परतावे लागले. दरम्यान नोंदणीच्या उदभवलेल्या वादानंतर आता विभागीय कार्यालयातूनच टोकण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण केंद्रावर मनुष्यबळाची कमतरता आणि सुरक्षेचा अभाव असल्याने नोंदणीसाठी मनुष्यबळ महापालिकेने पुरवावे अशी मागणी केंद्रचालक डोंगरे यांनी ग प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्याकडे केली आहे. यावर महापालिकेडून कोणती कार्यवाही होते याकडे लक्ष लागले आहे. मात्र जोपर्यंत मनुष्यबळ पुरविले जात नाही तोपर्यंत केंद्र चालू न करण्याचा निर्णय घेतल्याचे डोंगरे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्लीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका