शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

अखेर वर्तकनगरच्या ‘त्या’ १०८ पोलीस कुटुंबियांचे होणार पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:48 IST

ठाण्याच्या वर्तकनगर येथील धोकादायक इमारतीमधील पोलीस कुटुंबाना तात्काळ घरे खाली करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेने दिले होते. याच ५१ ते ५२ या तीन इमारतींमधील १०८ कुटूंबियांचे एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णयएमएमआरडीएच्या घरात पुनर्वसनाचे मुख्यमंत्र्याचे आदेश४८ तासांमध्ये घरे खाली करण्याचे दिले होते आदेश

ठाणे: येत्या ४८ तासांमध्ये घरे रिक्त करा, असे आदेश मिळालेल्या वर्तकनगर येथील ५१ ते ५३ या तीन इमारतींमधील १०८ पोलीस कुटुंबियांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. या सर्व कुटुंबियांचे एमएमआरडीएच्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.ठाण्याच्या वर्तकनगर येथील धोकादायक इमारतीमधील पोलीस कुटुंबाना तात्काळ घरे खाली करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे या वसाहतीमधील पोलीस कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण होते. याबाबत पोलीस महिला मंडळाच्या वतीने शैला जाधव, तसेच स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत सातपुते यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कैफियत मांडली होती. या पार्श्वभूमीवर ऐन पावसाळ्यात योग्य पुनर्वसनाशिवाय पोलीस कुटुंबियांना बेघर करु नका अशी विनंती पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. याच विनंतीची तात्काळ दखल घेत या धोकादायक इमारतीमधील पोलीस कुटुंबांचे पुनर्वसन त्वरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांना मंगळवारी दिले. दरम्यान, इमारत क्रमांक १४ आणि १६ या धोकादायक असल्या तरी त्या दुरुस्त करुन राहण्यास योग्य असल्यामुळे त्यांचे स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेने पोलीस प्रशासनाकडे मागितले आहे. गेली तीन ते चार महिने इमारत क्रमांक १४ आणि १६ ची दुरुस्ती करण्यात आली असल्यामुळे या दोन्ही इमारतींचे स्थैर्यता प्रमाणपत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिका प्रशासनाकडे देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या या पाठपुराव्यामुळे पोलीस कुटुंबियांनी आभार व्यक्त केले आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसtmcठाणे महापालिका