शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आधी खड्डे बुजवा, मगच टोलवसुली करा; आंदोलकांची आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2022 07:51 IST

खड्डे बुजवण्याकरिता तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार असल्याचे बाबूभाई शेख यांच्याकडून सांगण्यात आले. 

भिवंडी / पडघा : मुंबई-नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे झालेली दुर्दशा यामुळे गुरुवारी सर्वपक्षीय स्थानिक आंदोलकांनी पडघा टोलनाक्यावरील टोलवसुली बंद पाडली होती. टोलनाका पूर्ववत सुरू व्हावा याकरिता शुक्रवारी  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  व टोलनाका प्रशासनाने पडघा टाेलनाका कार्यालयात स्थानिक आंदोलकांची एक बैठक बोलावली होती. त्यात टोलनाका तत्काळ सुरू करण्यासंदर्भात कुठलाही तोडगा न निघाल्याने पुढील तीन ते चार दिवस पडघा टोलनाका बंदच राहणार आहे.

भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक बाळासाहेब साळुंखे, एमएलएन कंपनीचे व्यवस्थापक गिरीश कामत, पिक इन्फ्रास्ट्रक्चर या टोलवसुली कंपनीचे व्यवस्थापक बाबूभाई शेख, पोलीस निरीक्षक दिनेश कटके आदी सहभागी होते. अगोदर  खड्डे बुजवा, मगच खोल नाका सुरू करा या आपल्या मागणीवर डॉ. संजय पाटील, माजी सभापती प्रकाश भोईर, भगवान सांबरे, रवींद्र विशे, शैलेश बिडवी,  शशिकांत गोतारणे, मुशिर नाचन, श्रीकांत गायकर,  अशोक शेरेकर, पडद्याचे सरपंच अमोल बिडवी, उपसरपंच  अभिषेक नागावेकर, रिक्षा युनियनचे अशोक पाटील, विकास थेटे आदी आंदोलक ठाम राहिले.  

आंदोलक असमाधानीखड्डे बुजवण्याकरिता तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार असल्याचे बाबूभाई शेख यांच्याकडून  सांगण्यात आले. आंदोलकांचे यात समाधान न झाल्याने पुढील तीन-चार दिवसांअगोदर खड्डे भरा, मगच टोलनाका सुरू करा, असे सांगण्यात आले. अखेर टोलनाका प्रशासनाला आंदोलकांची ही मागणी मागणी मान्य करावी लागली. यामुळे पुढील खड्डे बुजविण्यापर्यंत लागणाऱ्या  तीन-चार दिवस कालावधीनंतरच पडघा टोल नाका सुरू होणार आहे. तसेच महामार्गावरील प्रलंबित कामेही पूर्ण करण्याचे आश्वासन टोलनाका प्रशासनाने आंदोलकांना दिले आहे.