शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

'आमच्या विभागातील रिक्त पदेही भरा!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:40 IST

केडीएमसीतील रिक्त उपसचिवपद आणि अग्निशमन दलातील काही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे.

कल्याण : केडीएमसीतील रिक्त उपसचिवपद आणि अग्निशमन दलातील काही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे. सुरक्षा विभागाला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. सुरक्षा विभागातील रिक्त पदे भरली जात नसतानाच जादा कामाचा मोबदलाही मिळत नाही. सलग तीन-तीन ड्युट्या कराव्या लागत असल्याने ही परवड थांबणार कधी? असा सवाल सुरक्षारक्षक व्यक्त करत आहेत.उपमुख्य सुरक्षा अधिकारी, सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ सुरक्षा रक्षक आणि वॉचमन, सुरक्षा रक्षक अशी एकूण २६९ पदे मंजूर आहेत. यातील केवळ १७१ पदेच भरण्यात आली आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत. उपमुख्य सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवली आहेत. महापालिका मुख्यालय, कल्याणमधील कार्यालये आणि डोंबिवली विभागीय कार्यालय याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. त्यांच्या मदतीला भांडुप सुरक्षा मंडळाचे ३४ सुरक्षारक्षक घेतले आहेत. तर अन्य १०८ कर्मचारी खाजगी स्तरावर सुरक्षा विभागाला सहाय्यक म्हणून नेमले आहेत. त्यांना केवळ अटेंडंट म्हणून घेतले आहे.रिक्त पदे भरा आणि जादा कामाचा मोबदला मिळावा अशी प्रमुख मागणी सुरक्षारक्षकांची आहे. केडीएमसीतील अग्निशमन दलातील कर्मचाºयांना अतिकालीन भत्ता लागू करण्याबाबत प्रस्ताव एप्रिलमध्ये महासभेत मंजूर झाला. अग्निशमन दल कर्मचाºयांच्या प्रलंबित हक्कांच्या मागण्यांसंदर्भात दोन प्रस्ताव दाखल झाले होते. या कर्मचाºयांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असताना आम्ही काय चूक केली? आमचाही विचार व्हावा, असा सूर सुरक्षा कर्मचारी आळवत आहेत. दरम्यान, सद्य:स्थितीला उपसचिवपद आणि सिस्टीम अ‍ॅनालिसिससह अग्निशमन दलातील फायरमन, लीडिंग फायरमनच्या २४ जागा भरण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आमच्या विभागातील पदे भरावीत, अशी मागणी सुरक्षारक्षक करत आहेत. यासंदर्भात प्रभारी सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्याशी संपर्क केला असता अपुºया मनुष्यबळामुळे कर्मचाºयांवर ताण पडत असून ही पदे भरण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार केल्याचे ते म्हणाले....तर कार्यवाही होईल!सद्य:स्थितीला राज्य सरकारच्या धोरणानुसारच एखाद्या विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. तूर्तास तरी सुरक्षा विभागातील रिक्त पदे भरण्याचे प्रयोजन नाही.सरकारने आदेश दिल्यास केडीएमसीतर्फे त्यासंदर्भात कार्यवाही सुरू करून रिक्त पदे भरली जातील, असे सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद धाट यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका