शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्या विभागातील रिक्त पदेही भरा!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:40 IST

केडीएमसीतील रिक्त उपसचिवपद आणि अग्निशमन दलातील काही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे.

कल्याण : केडीएमसीतील रिक्त उपसचिवपद आणि अग्निशमन दलातील काही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे. सुरक्षा विभागाला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. सुरक्षा विभागातील रिक्त पदे भरली जात नसतानाच जादा कामाचा मोबदलाही मिळत नाही. सलग तीन-तीन ड्युट्या कराव्या लागत असल्याने ही परवड थांबणार कधी? असा सवाल सुरक्षारक्षक व्यक्त करत आहेत.उपमुख्य सुरक्षा अधिकारी, सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ सुरक्षा रक्षक आणि वॉचमन, सुरक्षा रक्षक अशी एकूण २६९ पदे मंजूर आहेत. यातील केवळ १७१ पदेच भरण्यात आली आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत. उपमुख्य सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवली आहेत. महापालिका मुख्यालय, कल्याणमधील कार्यालये आणि डोंबिवली विभागीय कार्यालय याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. त्यांच्या मदतीला भांडुप सुरक्षा मंडळाचे ३४ सुरक्षारक्षक घेतले आहेत. तर अन्य १०८ कर्मचारी खाजगी स्तरावर सुरक्षा विभागाला सहाय्यक म्हणून नेमले आहेत. त्यांना केवळ अटेंडंट म्हणून घेतले आहे.रिक्त पदे भरा आणि जादा कामाचा मोबदला मिळावा अशी प्रमुख मागणी सुरक्षारक्षकांची आहे. केडीएमसीतील अग्निशमन दलातील कर्मचाºयांना अतिकालीन भत्ता लागू करण्याबाबत प्रस्ताव एप्रिलमध्ये महासभेत मंजूर झाला. अग्निशमन दल कर्मचाºयांच्या प्रलंबित हक्कांच्या मागण्यांसंदर्भात दोन प्रस्ताव दाखल झाले होते. या कर्मचाºयांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असताना आम्ही काय चूक केली? आमचाही विचार व्हावा, असा सूर सुरक्षा कर्मचारी आळवत आहेत. दरम्यान, सद्य:स्थितीला उपसचिवपद आणि सिस्टीम अ‍ॅनालिसिससह अग्निशमन दलातील फायरमन, लीडिंग फायरमनच्या २४ जागा भरण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आमच्या विभागातील पदे भरावीत, अशी मागणी सुरक्षारक्षक करत आहेत. यासंदर्भात प्रभारी सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्याशी संपर्क केला असता अपुºया मनुष्यबळामुळे कर्मचाºयांवर ताण पडत असून ही पदे भरण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार केल्याचे ते म्हणाले....तर कार्यवाही होईल!सद्य:स्थितीला राज्य सरकारच्या धोरणानुसारच एखाद्या विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. तूर्तास तरी सुरक्षा विभागातील रिक्त पदे भरण्याचे प्रयोजन नाही.सरकारने आदेश दिल्यास केडीएमसीतर्फे त्यासंदर्भात कार्यवाही सुरू करून रिक्त पदे भरली जातील, असे सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद धाट यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका