शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

आधी रोशनी शिंदेंची तक्रार तर दाखल करु घ्या; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

By अजित मांडके | Updated: April 6, 2023 14:38 IST

रोशनी शिंदेला ठाकरे आणि आव्हाडांकडून धोका; शिवसेना महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे हिला झालेल्या मारहाणीनंतर मुंबईत आता तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तिच्या जीवाला आता उध्दव ठाकरे गटातील नेते उध्दव ठाकरे, आदीत्य, राजन विचारे तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धोका असल्याचा दावा करीत, तिला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी  शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. रोशनी हीचा केवळ वापर करुन घेतला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. परंतु आधी तिची तक्रार तर दाखल करुन घ्या असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

तीन दिवसांपूर्वी रोशनी शिंदे हिच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उध्दव ठाकरे यांचे अख्खे कुटुंब ठाण्यात येऊन गेले. तर बुधवारी तिच्यासाठी महाविकास आघाडीने ठाण्यात मोर्चा काढला होता. यातूनच आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यात आता शिवसेनेकडून करण्यात आलेल्या अजब मागणीनंतर यात आणखी भर पडणार असल्याचे चित्र आहे. रोशनी हिचा केवळ वापर करुन घेतला जात आहे. तिला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. या प्रकारावरुन हेच सिध्द होत आहे की रोशनीच्या माध्यमातून ठाकरे आणि राष्टÑवादीचा गट सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसत असल्याचे त्यांनी म्हंटेल आहे. तसेच उध्दव ठाकरे, आदीत्य ठाकरे, राजन विचारे आणि  राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनच रोशनी हिच्या जीवाला धोका असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. त्यातही या महिलेची प्रकृती चांगली असून केवळ तिच्या आधारे सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. त्यामुळे तिला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दुसरीकडे मीनाक्षी शिंदे आव्हाड यांनी टीव्ट करीत समाचार घेतला आहे. राजकारण बाजूला राहूद्या एक म्हणून विचार करा, स्त्रीचे पूर्णत्व हे मातृत्व असते. तिला लाथा बुक्यांनी माहराण झाली हे महाराष्ट्राला माहिती आहे. ताई रोशनी तुमची बहीन आहे कमीत कमी तिची तक्रार तर नोंदवून घ्यायला सांगा असा सल्ला त्यांनी दिला आहे. बाकी खरच तिला संरक्षण द्यायला सांगा नाही तर सगळ्या पोलीस स्टेशनचा स्टाफ कमी आहे, अजून एक कमी होईल, आधीच ५०० पोलीस बंदोबस्त करत आहेत, हे संरक्षण गुडांना दिले गेले असून एक बंधुकधारी पोलीस असे ५०० पोलीस बाहेर आहेत. घोडंबदर सगळे टर्न बंद केले का तर तिथे उभे ठेवायला पोलीसच नाहीत, ५०० पोलीस शिंदे गटाला संरक्षण देण्यासाठी ताई तुमच्या बरोबर किती पोलीस आहेत, रोशनीला मारत असतांना बघायला, असा सवालाही त्यांनी उपस्थित केला आहे. एकूणच आता वातावरण आणखी तापणार असल्याचेच यावरुन दिसत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv Senaशिवसेना