शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आधी रोशनी शिंदेंची तक्रार तर दाखल करु घ्या; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

By अजित मांडके | Updated: April 6, 2023 14:38 IST

रोशनी शिंदेला ठाकरे आणि आव्हाडांकडून धोका; शिवसेना महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे हिला झालेल्या मारहाणीनंतर मुंबईत आता तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तिच्या जीवाला आता उध्दव ठाकरे गटातील नेते उध्दव ठाकरे, आदीत्य, राजन विचारे तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धोका असल्याचा दावा करीत, तिला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी  शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. रोशनी हीचा केवळ वापर करुन घेतला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. परंतु आधी तिची तक्रार तर दाखल करुन घ्या असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

तीन दिवसांपूर्वी रोशनी शिंदे हिच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उध्दव ठाकरे यांचे अख्खे कुटुंब ठाण्यात येऊन गेले. तर बुधवारी तिच्यासाठी महाविकास आघाडीने ठाण्यात मोर्चा काढला होता. यातूनच आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यात आता शिवसेनेकडून करण्यात आलेल्या अजब मागणीनंतर यात आणखी भर पडणार असल्याचे चित्र आहे. रोशनी हिचा केवळ वापर करुन घेतला जात आहे. तिला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. या प्रकारावरुन हेच सिध्द होत आहे की रोशनीच्या माध्यमातून ठाकरे आणि राष्टÑवादीचा गट सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसत असल्याचे त्यांनी म्हंटेल आहे. तसेच उध्दव ठाकरे, आदीत्य ठाकरे, राजन विचारे आणि  राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनच रोशनी हिच्या जीवाला धोका असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. त्यातही या महिलेची प्रकृती चांगली असून केवळ तिच्या आधारे सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. त्यामुळे तिला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दुसरीकडे मीनाक्षी शिंदे आव्हाड यांनी टीव्ट करीत समाचार घेतला आहे. राजकारण बाजूला राहूद्या एक म्हणून विचार करा, स्त्रीचे पूर्णत्व हे मातृत्व असते. तिला लाथा बुक्यांनी माहराण झाली हे महाराष्ट्राला माहिती आहे. ताई रोशनी तुमची बहीन आहे कमीत कमी तिची तक्रार तर नोंदवून घ्यायला सांगा असा सल्ला त्यांनी दिला आहे. बाकी खरच तिला संरक्षण द्यायला सांगा नाही तर सगळ्या पोलीस स्टेशनचा स्टाफ कमी आहे, अजून एक कमी होईल, आधीच ५०० पोलीस बंदोबस्त करत आहेत, हे संरक्षण गुडांना दिले गेले असून एक बंधुकधारी पोलीस असे ५०० पोलीस बाहेर आहेत. घोडंबदर सगळे टर्न बंद केले का तर तिथे उभे ठेवायला पोलीसच नाहीत, ५०० पोलीस शिंदे गटाला संरक्षण देण्यासाठी ताई तुमच्या बरोबर किती पोलीस आहेत, रोशनीला मारत असतांना बघायला, असा सवालाही त्यांनी उपस्थित केला आहे. एकूणच आता वातावरण आणखी तापणार असल्याचेच यावरुन दिसत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv Senaशिवसेना