शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

लढत २०१५ : सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला; युतीचा विचका?

By admin | Updated: October 14, 2015 02:34 IST

केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असलीतरी पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर जागावाटपावरून युतीचा विचका झाला आहे. १९९५, २००० प्रमाणे यंदाही

प्रशांत माने, कल्याणकेंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असलीतरी पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर जागावाटपावरून युतीचा विचका झाला आहे. १९९५, २००० प्रमाणे यंदाही (२०१५) शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने युती तुटल्याची चर्चा आहे. परंतु, याची औपचारीक घोषणा अद्यापपर्यंत झालेली नाही. दुसरीकडे झालेली आघाडी काँग्रेस - राष्ट्रवादीला तारेल का? तर लाट ओसरलेल्या मनसेचा करिष्मा यंदा चालेल का? हे देखील या निवडणुकीत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.२००२ मध्ये वगळलेल्या २७ गावांचा या निवडणुकीपूर्वी पुन्हा केडीएमसीत समावेश झाला आहे. नव्या प्रभाग रचनेत प्रभागांची संख्या १०७ वरून १२२ वर पोहोचली आहे. नव्या १५ प्रभागांची वाढ झाली आहे. 122जागांमध्ये बहुमतासाठी ६१ हून अधिक जागा मिळविणे आवश्यक असल्याने सर्वच पक्षांचा ‘कस’ लागणार आहे. भाजपला मागील २०१० च्या निवडणुकीत केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. दरम्यानच्या काळात या नऊ पैकी दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे काही नगरसेवक लागले असलेतरी यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यापुढे ‘जागा वाढविणे’ हे मोठे आव्हान असणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मोदी लाटेत भाजपाला भरभरून मते मिळाली आहेत. याचा फायदा महापालिकेच्या निवडणुकीत होतो का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात आणि राज्यातील सत्ता गमावलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष या निवडणुकीत आघाडी करून लढत आहेत. याचा फायदा या दोघांना किती होईल? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारूण पराभव झाला आहे. यात मनसेची लाट ओसरल्याचे चित्र असताना राज ठाकरे नावाचा करिष्मा यंदा कितपत चालेल? हा देखील संशोधनाचा विषय आहे.