शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयकाअभावी दिल्लीत महाराष्ट्रातून कमी अर्ज, सांस्कृतिक समितीसंदर्भात डॉ. प्रकाश खांडगे आणि नंदेश उमप यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 09:42 IST

उत्सव ७५ अंतर्गत टाऊन हॉल येथे सोमवारी ‘संगीत आणि लोकसंगीत’ यावर परिसंवाद झाला. यावेळी उमप म्हणाले की, अर्जांची छाननी करताना मणिपूरमधून ७५ अर्ज आले होते. महाराष्ट्रातील केवळ पाच आले.

ठाणे : सांस्कृतिक संस्थांना अनुदान देणाऱ्या केंद्र सरकारच्या केंद्रीय समितीकडे महाराष्ट्रातून फार कमी अर्ज जातात.  महाराष्ट्रात सांस्कृतिक संस्थांचा योग्य समन्वय नसल्यामुळे अर्जांची संख्या अत्यल्प असते, अशी खंत लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी व्यक्त केली. ज्यावेळी या समितीकडे अर्ज येतात, त्यातून इतर राज्यांतील सांस्कृतिक संस्थांचा आणि कलावंतांचा समन्वय पाहायला मिळतो. महाराष्ट्रातून येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा दोघांनी व्यक्त केली. उत्सव ७५ अंतर्गत टाऊन हॉल येथे सोमवारी ‘संगीत आणि लोकसंगीत’ यावर परिसंवाद झाला. यावेळी उमप म्हणाले की, अर्जांची छाननी करताना मणिपूरमधून ७५ अर्ज आले होते. महाराष्ट्रातील केवळ पाच आले. कदाचित मणिपूरमध्ये हेवेदावे नसावे. जे आमच्या महाराष्ट्रात आहेत. एकमेकांना मदत करायला हवी. एवढे मुक्त विचार का नाही? उमप यांच्या दाव्याला दुजोरा देत डॉ. खांडगे म्हणाले की, त्या कमिटीवर मीही आधी होतो. महाराष्ट्रातून किती संस्थांना अनुदान मिळते हे मी पाहिले. त्यावेळी ज्यांनी अर्ज केले त्यापैकी तीन ते चार संस्था बोगस होत्या. ज्येष्ठ गायक पं. सुरेश बापट यांनी सुरुवातीला बंदिशी सादर केली. शास्त्रीय गायिका श्रुती गोखले यांनी आपल्या गायनाचा प्रवास उलगडला. धर्मवीर चित्रपटातील देवीचे गाणे करण्याचा हट्ट मी पकडला होता आणि ते करण्याची संधी मला मिळाली. माझा जन्म या ठाण्यात झाल्याचा मला अभिमान आहे, असे संगीतकार महेश ओगले यांनी सांगितले. 

परिस्थितीनुसार संगीत द्यावे लागते!एखाद्या गाण्याला संगीत देताना थोडीफार तडजाेड करावी लागते. तडजाेड न करता आपण त्यातून शिकू या असा विचार केला तर नवीन शिकायला मिळते. कधी कधी परिस्थितीनुसारही गाण्याला संगीत द्यावे लागते, हे सांगताना टाइमपास चित्रपटाचा किस्सा ओगले यांनी सांगितला.

टॅग्स :thaneठाणे