शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

ठाणे काँलेजचे लाखोंच्या किमतीचे बेंच पावसात भिजून  खराब होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:39 IST

लाखो रुपये किंमतीचे शेकडो बेंचेस इमारतीच्या गच्चीवर हमालांतर्फे अस्तव्यस्त ठेवले आहेत. या दरम्यान बहुतांशी तुटले आहेत. छत असलेल्या गच्चीवर चौबाजूंनी पावसाचे पाणी शिरुन बेंचेस खराब होण्याची भीती, या कालेजचे प्राध्यापक बिपीन धुमाळे यांनी व्यक्त केली आहे. 

ठाणे : विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी विद्या प्रसारक मंडळाचे ठाणे कॉलेज प्रशासनाने जबरदस्ती ताब्यात घेतले आहे. त्यातील लाखो रुपये किंमतीचे शेकडो बेंचेस इमारतीच्या गच्चीवर हमालांतर्फे अस्तव्यस्त ठेवले आहेत. या दरम्यान बहुतांशी तुटले आहेत. छत असलेल्या गच्चीवर चौबाजूंनी पावसाचे पाणी शिरुन बेंचेस खराब होण्याची भीती, या कालेजचे प्राध्यापक बिपीन धुमाळे यांनी व्यक्त केली आहे. 

शेकड्यांनी बेंचेस ठेवलेल्या गच्चीवर छप्पर आहे. पण गच्ची दोन्ही बाजूंनी उघडी आहे. एक मोठा पाऊस बेंचेस भिजवून टाकणार आहे. या बेंचेसची किंमत लाखो रुपये आहे. बेंचेस तुटायलाही लागले आहेत. रस्त्यावरची भेळेची गाडी ताब्यात घेतात तसे  महाविद्यालय ताब्यात घेण्यात आले आहे. शैक्षणिक संस्था ताब्यात घ्या म्हणून आदेश देणाऱ्या या नोकरशहा विरोधात हा एका शैक्षणिक  संस्थेचा आक्रोश असल्याचे धुमाळे यांनी लोकमतला सांगितले. या सत्तालोलुप अधिकारशाहीची ही मिजास सर्वथा चुकीची असल्याचे ही ते कळकळीने सांगतात.          विद्या प्रसारक मंडळाचा परिसर हा "ज्ञानद्वीप " नावाने प्रसिद्ध आहे. ठाण्याचे सांस्कृतिक संचित या संस्थेने घडवले आहे. साधारणतः 15 हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यांच्या निकालाचे काम सुरू असताना अचानक अशी कार्यवाही प्रशासनाने करावयास नको होती.  डॉ. बेडेकरांची व त्यांच्या कुटुंबाची सामाजिक बांधीलकी संपूर्ण ठाण्यातील जनता जाणते. त्यांनी उभं केलेलं हे शैक्षणिक संकुल संस्कार व मूल्यशिक्षणाचे मानबिंदू आहे. मात्र याचा कुठलाही विचार न करता अधिकारांचा गैरवापर करून तारतम्य विहीन वागणुकीचा निषेध केला गेला पाहिजे, असे ही ते संतापून सांगत आहेत.  

    इतिहासाच्या पुस्तकात प्लेगची साथ व इंग्रजी सोजिरांची जुलमी वागणूक वाचली होती. तीच मिजास जर आपल्या प्रशासनात बसलेल्या लोकांची असेल तर शिक्षणाचे व शिक्षण संस्थाचे पावित्र्य टिकणार नाही. 'विद्या ददाति विनयं" असं लहानपणी वाचलं होते. विद्या विनय देते म्हणे, मात्र विद्यासंपन्न, धनसंपन्न व अधिकार संपन्न व्यक्तींनी आपल्याच पुढच्या पिढीची आधुनिक तीर्थक्षेत्रे असलेल्या शिक्षण संस्थांची काळजी मोठ्या विनयाने घ्यावी ही सामान्य नागरिकांची इच्छा असते. या मूलभूत जीवन मूल्यालाच पायदळी तुडवले जात असेल तर भविष्य खूप चांगले आहे, असे म्हणता येणार नाही,  असे याच जोशी बेडेकर महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डाळ. प्रशांत धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे