शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

...तर संपूर्ण ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:27 IST

व्हॉल्व्हमनचे पगार रखडले : स्थायी समिती गठीत न झाल्याने अडचण

ठाणे : स्थायी समिती गठीत न झाल्याचा मोठा फटका आता ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला बसण्याची शक्यता आहे. मुंब्य्रातील कंत्राटी स्वरूपातील व्हॉल्व्हमनचा दोन महिन्यांपासून पगारच झाला नसल्याचे समोर आले आहे. स्थायी समिती गठीत न झाल्याने त्यासंदर्भातील ठराव पालिका प्रशासनाकडे न आल्याने ही देणी देणे शक्य नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. केवळ मुंब्राच नाही, तर शहरातील सर्वच प्रभाग समित्यांत हा प्रकार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे हे कामगार काम सोडण्याच्या मन:स्थितीत असून, तसे झाल्यास ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापालिका हद्दीत वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानुसार या प्रत्येक ठिकाणचे पाण्याचे व्हॉल्व्ह सुरू करण्याचे काम महापालिकेने खाजगी ठेकेदाराला दिले आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच घोडबंदर भागातील जलवाहिन्यांवर एक हजारहून अधिक व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. ते ठरावीक वेळेत उघडून पुन्हा बंद करण्याचे काम या कंत्राटी कामगारांकडून केले जाते.अनेक प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षास्थायी समितीचे मागील वर्षभरापासून पुन्हा भिजत घोंगडे पडले आहे. स्थायी समिती गठीत न झाल्याने अनेक प्रस्ताव थेट महासभेत मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहेत. त्यात स्थायी समिती गठीत न झाल्याने अर्थसंकल्पावरदेखील आता महासभेत चर्चा होत आहे. परंतु,आता याचा फटका महापालिकेच्या विविध कामांनादेखील कसा बसू लागला आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी नियोजनासाठी प्रशासनाकडून दरवर्षी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येते. यंदाही प्रशासनाने त्यासंबंधीचे प्रस्ताव तयार केले आहेत. मात्र, स्थायी समिती गठीत झालेली नसल्यामुळे ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडून पडू नये आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा, यासाठी प्रशासन जुन्याच ठेकेदारांकडून काम करून घेत आहे.स्थायी समिती गठीत होत नसल्यामुळे नवीन ठेकेदाराची नियुक्ती रखडली असून यामुळेच कंत्राटी कामगारांचे पगार होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे यांच्याशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

टॅग्स :thaneठाणे