शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेच्या भीतीने महिला रिक्षाचालकांना धडकी; घरखर्चाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 00:48 IST

बँकेच्या तगाद्यासह पाेलीस, आरटीओची भीती

ठाणे : बँकेकडून येणारे धमकीवजा कर्जवसुलीचे फोन, भरमसाट आलेले वीजबिल, शाळेची फी आणि घरखर्च यांचा ताळमेळ कसा बसवायचा, या विवंचनेत असतानाच पुन्हा कोरोनाची भयाण परिस्थिती उभी राहू पाहत आहे. त्यामुळे रोज होणाऱ्या अवघ्या २००-३०० रुपयांच्या कमाईतून संसाराचा गाडा कसा हाकायचा, अशा विवंचनेत ठाण्यातील अबोली महिला रिक्षाचालक पडल्या आहेत.            

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. महाराष्ट्रातसुद्धा तिची शक्यता वर्तविली जात असल्याने यामुळे निर्माण होणाऱ्या कठीण परिस्थितीचा सामना कसा करायचा, याची जुळवणी त्या करू लागल्या आहेत. ठाण्यात सुमारे एक हजार महिला रिक्षाचालक आहेत. महिलांना आर्थिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी सरकारकडून रिक्षापरवाना आणि बँकेकडून कर्जाच्या रिक्षा पुरविल्या आहेत. या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यातील बहुतांश महिला विधवा, गरीब, घटस्फोटित व इतर समस्यांनी पिडलेल्या आहेत. परंतु, कोरोनाचा संसर्ग आणि बँकेच्या अमानवी कर्जवसुलीने त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. कोरोनामुळे सहासात महिने सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्याचा रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला. आता हळूहळू शिथिलता आल्याने रिक्षांची वाहतूक सुरू झाली आहे. परंतु, रेल्वेची सुविधा सुरू नसल्याने त्याचा रिक्षावाहतुकीवर परिणाम होऊन रोज २००-३०० रुपयांची कमाई होत आहे. एवढ्यात रिक्षाचा गॅस, वाहतूक पोलीस आणि आरटीओची कारवाई, बँकेचे हप्ते, शाळेची फी, लाइटबिल, औषधपाणी, घरभाड्यासह कुटुंबाचे पोट कसे भरायचे, याची चिंता त्यांना सतावत आहे.

लॉकडाऊनमध्ये बँकेचे काही हप्ते थकल्याने बँकेकडून फोन येत असून थेट लायकी काढली जाते. मुलगा शाळेत गेलेला नसतानाही शाळेची संपूर्ण फी भरावी लागते. वाढीव वीजबिल आले आहे. पोलिसांची कारवाई, गाडीचे मेंटेनन्स आणि घरखर्च रोज आठनऊ तास रिक्षा चालवून त्यामधून मिळणाऱ्या २०० ते ३०० रुपयांत कसे भागवायचे? - मीरा धायजे, अबोली रिक्षाचालक, ठाणे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याauto rickshawऑटो रिक्षा