शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

दुसऱ्या लाटेच्या भीतीने महिला रिक्षाचालकांना धडकी; घरखर्चाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 00:48 IST

बँकेच्या तगाद्यासह पाेलीस, आरटीओची भीती

ठाणे : बँकेकडून येणारे धमकीवजा कर्जवसुलीचे फोन, भरमसाट आलेले वीजबिल, शाळेची फी आणि घरखर्च यांचा ताळमेळ कसा बसवायचा, या विवंचनेत असतानाच पुन्हा कोरोनाची भयाण परिस्थिती उभी राहू पाहत आहे. त्यामुळे रोज होणाऱ्या अवघ्या २००-३०० रुपयांच्या कमाईतून संसाराचा गाडा कसा हाकायचा, अशा विवंचनेत ठाण्यातील अबोली महिला रिक्षाचालक पडल्या आहेत.            

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. महाराष्ट्रातसुद्धा तिची शक्यता वर्तविली जात असल्याने यामुळे निर्माण होणाऱ्या कठीण परिस्थितीचा सामना कसा करायचा, याची जुळवणी त्या करू लागल्या आहेत. ठाण्यात सुमारे एक हजार महिला रिक्षाचालक आहेत. महिलांना आर्थिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी सरकारकडून रिक्षापरवाना आणि बँकेकडून कर्जाच्या रिक्षा पुरविल्या आहेत. या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यातील बहुतांश महिला विधवा, गरीब, घटस्फोटित व इतर समस्यांनी पिडलेल्या आहेत. परंतु, कोरोनाचा संसर्ग आणि बँकेच्या अमानवी कर्जवसुलीने त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. कोरोनामुळे सहासात महिने सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्याचा रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला. आता हळूहळू शिथिलता आल्याने रिक्षांची वाहतूक सुरू झाली आहे. परंतु, रेल्वेची सुविधा सुरू नसल्याने त्याचा रिक्षावाहतुकीवर परिणाम होऊन रोज २००-३०० रुपयांची कमाई होत आहे. एवढ्यात रिक्षाचा गॅस, वाहतूक पोलीस आणि आरटीओची कारवाई, बँकेचे हप्ते, शाळेची फी, लाइटबिल, औषधपाणी, घरभाड्यासह कुटुंबाचे पोट कसे भरायचे, याची चिंता त्यांना सतावत आहे.

लॉकडाऊनमध्ये बँकेचे काही हप्ते थकल्याने बँकेकडून फोन येत असून थेट लायकी काढली जाते. मुलगा शाळेत गेलेला नसतानाही शाळेची संपूर्ण फी भरावी लागते. वाढीव वीजबिल आले आहे. पोलिसांची कारवाई, गाडीचे मेंटेनन्स आणि घरखर्च रोज आठनऊ तास रिक्षा चालवून त्यामधून मिळणाऱ्या २०० ते ३०० रुपयांत कसे भागवायचे? - मीरा धायजे, अबोली रिक्षाचालक, ठाणे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याauto rickshawऑटो रिक्षा