शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

चार कोटींचा निधी परत जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 01:11 IST

विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार नगरसेवकांकडून सुरू असते. परंतु जिल्ह्यातील दोन नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे सुमारे चार कोटींचा निधी पडून आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार नगरसेवकांकडून सुरू असते. परंतु जिल्ह्यातील दोन नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे सुमारे चार कोटींचा निधी पडून आहे. मागणी व कामांचे प्रस्ताव प्राप्त नसल्यामुळे तो यंदाही परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जिल्ह्यात अंबरनाथ नगरपालिका असून कुळगाव-बदलापूर नगर परिषद आहे. याशिवाय, मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे सुमारे १२ कोटींचा निधी आहे. त्याचे तीन टप्प्यांत वाटप होण्याची अपेक्षा आहे. त्यातील शेवटच्या टप्प्याच्या सुमारे चार कोटींच्या मागणीसाठी संबंधित नगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायतींकडून अद्याप विकासकामांचे प्रस्ताव आलेले नसल्याची गंभीर बाब नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीस उघड झाली आहे. यामुळे यंदाही हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या टप्प्यातील सुमारे चार कोटी रुपयांचे वितरण करण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याची बाब डीपीसीच्या बैठकीत उघड झाली. पण, मार्चअखेरपर्यंत नगरपालिका, नगर परिषदांच्या प्रशासनाकडून प्रस्ताव येणे शक्य नाही. या निष्काळजीमुळे राखीव १२ कोटींमधील वितरित होणाऱ्या आठ कोटींपैकी चार कोटी वाटप झाले. उर्वरित चार कोटी रुपये मात्र अद्याप पडून आहेत. नगरोत्थानाच्या नावाखाली डीपीसीद्वारे दिल्या जाणाºया या निधीची मागणी चार कोटी याप्रमाणे तीन टप्प्यांत होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षापासून हा निधी नगरपालिका, नगरपंचायतींना मिळत आहे. नावीन्यपूर्णसारख्या नवीन योजना राबवण्यासाठी हा निधी दोन वर्षांपासून राखीव ठेवला जातो. मागील वर्षाचा निधीदेखील मार्चनंतर शासनजमा झाल्याचे निदर्शनास आले. यंदाही सुमारे चार कोटी रुपये संबंधित नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनजमा होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.>कामे मंजूर, निविदा नाही!नगरपालिका, नगरपंचायतींसाठी सुमारे १२ वर्षांपासून हेड तयार करण्यात आले होते. त्यात केवळ हजार रुपये जमा होत असत. पण, आता नगरोत्थानाच्या नावे दोन वर्षांपासून १२ कोटी रुपये ठेवले जात आहेत.पण, या निधीची मागणी होत नसल्याची खंत जिल्हा नियोजन अधिकारी खंडारे यांनी डीपीसी सभागृहात व्यक्त केली. या निधीतून मागील वर्षी कामे मंजूर केली, पण या कामांच्या निविदा संंबंधित नगरपालिकांच्या प्रशासनाने काढल्याच नाहीत. यामुळे निधी खर्च झाला नाही. यावर्षीदेखील १२ कोटी ठेवण्यात आले.त्यातील आठ कोटी द्यायचे आहेत. त्यातील चार कोटी दिले, पण उर्वरित चार कोटी शासनजमा होण्यापूर्वी प्रस्ताव पाठवण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या नियोजनात मिळणाºया वाढीव निधीतून आवश्यक ठिकाणी फायर ब्रिगेडसाठी निधी देण्याची चर्चा डीपीसीत झाली आहे.