शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

वर्गखोल्यांच्या कामाचे १३ कोटी रुपये परत जाण्याची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:56 IST

ठाणे जि.प.ला मिळाला निधी : १७ कोटी मिळाले, त्यातील ३ कोटी ८९ लाखांचा खर्च

-  सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील शाळांच्या वर्ग बांधकामासाठी नऊ कोटी २५ लाख रुपये व शाळा दुरुस्तीसाठी सुमारे आठ कोटींचा निधी ठाणे जिल्हा परिषदेला मंजूर झाला आहे. या १७ कोटींतून आतापर्यंत केवळ तीन कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या वर्गखोल्यांच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित सुमारे १३ कोटी रुपये खर्च न करता पडून आहेत. तो निधी परत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेच्या निष्काळजी व दुर्लक्षामुळे नऊ महिन्यांच्या कालावधीत शाळा बांधकामाचा निधी खर्च झाला नाही. आतापर्यंत केवळ ८९ वर्गखोल्या बांधकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. सुमारे सव्वानऊ कोटींपैकी केवळ तीन कोटी ८९ लाखांची कामे हाती घेतली; तीही अजून कागदावरच आहे. त्यांच्या वर्कआॅर्डर काढण्यासाठी आणखी काही दिवस जाणार आहेत.

शाळांचा हा निधी वेळीच खर्च होऊन गावपाड्यांतील शेतकरी, गोरगरिबांची मुले या नव्या प्रशस्त शाळेत शिकावीत, अशी अपेक्षा आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्याकडे गांभीर्याने पाहिजे जात नसल्याची खंत खासदार कपिल पाटील, खा. राजन विचारे, आमदार किसन कथोरे, सुभाष भोईर आदी लोकप्रतिनिधींनी व्यक्त करून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांना चांगलेच धारेवर धरले.

जिल्हा परिषदेच्या शाळांचा सुमारे दोन कोटी ५८ लाखांचा निधी मागील वर्षीदेखील परत गेल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. यावर्षीदेखील प्रशासनाच्या निष्काळजीमुळे तब्बल सहा कोटी रुपये परत जाण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. डीपीसीने जिल्ह्यातील शाळांच्या वर्गखोल्या बांधकामांसाठी सव्वानऊ कोटी रुपये व शाळा दुरुस्तीच्या कामांसाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला मंजूर केला आहे.

या सुमारे १७ कोटी रुपयांच्या निधीतून केवळ तीन कोटी ८९ लाख रुपयांच्या वर्गखोल्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. उर्वरित १३ कोटींतील वर्गखोल्यांचे बांधकाम व शाळा दुरुस्तीचा निधी पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळेच आता हा निधी परत जाण्याची भीती आहे.केवळ प्रशासकीय मान्यता; अद्याप एस्टिमेट, निविदा काढणे बाकीनऊ कोटी २५ लाखांच्या वर्गखोल्या बांधकामास प्रशासकीय मान्यता दिल्याचा दावा सीईओंनी केला. पण, केवळ प्रशासकीय मान्यतेने काम होत नाही. त्यानंतर या कामांचे इस्टिमेट तयार केले जाते. निविदा काढायच्या आहेत. या प्रक्रियेनंतर वर्कआॅर्डर निघेल.यास विलंब होणार असल्यामुळे मार्चपर्यंत उर्वरित निधी खर्च होणार नसल्याची खंत लोकप्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे. आठ महिन्यांच्या कालावधीत उत्तरशीव येथील जिल्हा परिषदेचे काम केवळ दोन टक्के झाल्याचे आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले.दोन कोटी सात लाख रुपयांच्या या कामांची मुदत एक महिन्याने संपणार आहे. काम मात्र दोन टक्केही झाले नाही. या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्याच्या घरात शिकवले जात असल्याचेही भोईर यांनी स्पष्ट करून जिल्हा परिषदेच्या कामकाजावर जोरदार ताशेरे ओढले.

टॅग्स :Schoolशाळा