शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाचे हत्यार, तिसऱ्या  दिवशीही उपोषण सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:46 IST

फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाईच्या विरोधात स्फूर्ती ठाणो जिल्हा फेरीवाला संघटनेच्या सोमवार पासून बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. तिसऱ्या दिवसानंतरही त्यांच्या उपोषणाला मात्र पालिकेने दाद दिली नाही.

ठळक मुद्देसलग तिसऱ्या दिवशीही फेरीवाल्यांचे आंदोलन सुरुचपालिकेचा एकही अधिकारी अद्याप फिरकला नाहीफेरीवाला धोरण तत्काळ राबविण्याची केली मागणी

ठाणे - एल्फीस्टन रेल्वे पादचारी दुर्घटनेनंतर संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात, स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. येथील फेरीवाल्यांवर कारवाई देखील सुरु झाली आहे. ठाण्यातही अशा प्रकारे फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यातही जोपर्यंत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तो पर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करु नये असे आदेश असतांना देखील त्याची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप करीत स्फूर्ती ठाणे जिल्हा फेरीवाला संघटनेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. परंतु तिसऱ्या  दिवशी देखील त्यांच्या उपोषणाची दखल मात्र कोणीच घेतली नाही.मागील काही दिवसापासून स्टेशन परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात ठाणे महापालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. परंतु अद्यापही फेरीवाला धोरण राबविले का जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाला अनुसरुन महापालिका क्षेत्रात फेरीवाला समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच २००९ च्या धोरणानुसार हॉकर्स झोन पूर्ण करुन फेरीवाल्यांची नोंदणी होत नाही तो पर्यंत सध्या शहरातील फेरीवाल्यांना पूर्ववत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील नियमित व्यवसाय करणारे तसेच बायोमेट्रीक सर्व्हे झालेल्या त्यांच्याकडून प्रमाणपत्र शुल्क ९०० रुपये आकारलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई करुन त्यांचा माल कोणतीही पोचपावती न देता जप्त केला जात आहे. विशेष म्हणजे हा जप्त केलेला माल त्या फेरीवाल्यांना न देता परस्पर दलालांमार्फत तिराहित व्यक्तीला विकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एकूणच अशा चुकीच्या पध्दतीने पालिकेचा कारभार सुरु असल्याने या निशेध करण्यासाठी आणि फेरीवाल्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून परमार्थ निकेतन, कचराळी तलाव, महापालिका मुख्यालय येथे बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. परंतु उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी देखील पालिका प्रशासनाच्या वतीने त्यांना कोणत्याही अधिकाऱ्याने भेटण्यास वेळ दिली नाही. परंतु जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आमचे उपोषण सुरुच राहणार असल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणेcommissionerआयुक्त