शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाचे हत्यार, तिसऱ्या  दिवशीही उपोषण सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:46 IST

फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाईच्या विरोधात स्फूर्ती ठाणो जिल्हा फेरीवाला संघटनेच्या सोमवार पासून बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. तिसऱ्या दिवसानंतरही त्यांच्या उपोषणाला मात्र पालिकेने दाद दिली नाही.

ठळक मुद्देसलग तिसऱ्या दिवशीही फेरीवाल्यांचे आंदोलन सुरुचपालिकेचा एकही अधिकारी अद्याप फिरकला नाहीफेरीवाला धोरण तत्काळ राबविण्याची केली मागणी

ठाणे - एल्फीस्टन रेल्वे पादचारी दुर्घटनेनंतर संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात, स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. येथील फेरीवाल्यांवर कारवाई देखील सुरु झाली आहे. ठाण्यातही अशा प्रकारे फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यातही जोपर्यंत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तो पर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करु नये असे आदेश असतांना देखील त्याची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप करीत स्फूर्ती ठाणे जिल्हा फेरीवाला संघटनेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. परंतु तिसऱ्या  दिवशी देखील त्यांच्या उपोषणाची दखल मात्र कोणीच घेतली नाही.मागील काही दिवसापासून स्टेशन परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात ठाणे महापालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. परंतु अद्यापही फेरीवाला धोरण राबविले का जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाला अनुसरुन महापालिका क्षेत्रात फेरीवाला समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच २००९ च्या धोरणानुसार हॉकर्स झोन पूर्ण करुन फेरीवाल्यांची नोंदणी होत नाही तो पर्यंत सध्या शहरातील फेरीवाल्यांना पूर्ववत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील नियमित व्यवसाय करणारे तसेच बायोमेट्रीक सर्व्हे झालेल्या त्यांच्याकडून प्रमाणपत्र शुल्क ९०० रुपये आकारलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई करुन त्यांचा माल कोणतीही पोचपावती न देता जप्त केला जात आहे. विशेष म्हणजे हा जप्त केलेला माल त्या फेरीवाल्यांना न देता परस्पर दलालांमार्फत तिराहित व्यक्तीला विकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एकूणच अशा चुकीच्या पध्दतीने पालिकेचा कारभार सुरु असल्याने या निशेध करण्यासाठी आणि फेरीवाल्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून परमार्थ निकेतन, कचराळी तलाव, महापालिका मुख्यालय येथे बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. परंतु उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी देखील पालिका प्रशासनाच्या वतीने त्यांना कोणत्याही अधिकाऱ्याने भेटण्यास वेळ दिली नाही. परंतु जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आमचे उपोषण सुरुच राहणार असल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणेcommissionerआयुक्त