शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

दिव्यात रोगराईची भीती; शेकडो घरांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:50 IST

सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने दिवा भागातील अनेकांचे संसार उघड्यावर

ठाणे : सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने दिवा भागातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सोमवारी तिसºया दिवशीही या भागात अनेकांच्या घरात पाणी होते. तब्बल ७२ तासांनंतरही शेकडो घरांमध्ये पाणी असल्याने ते काढण्याची ताकदही रहिवाशांमध्ये उरली नाही. ठाणे महापालिकेने रविवारी या भागातील सुमारे ८५०० रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले. परंतु, उघड्यावर पडलेला संसार परत कोण जोडणार, असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत. पाच लाख लोकसंख्येच्या या भागात महापालिकेच्या स्थापनेपासून आरोग्य केंद्रच न उभारल्याने पुराचे पाणी ओसरले, तरी आरोग्याचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण होणार आहे.शुक्रवारी रात्रीपासून ठाण्यासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. याचा सर्वाधिक फटका दिवा भागाला बसला आहे. दिव्यातील अनेक भागांत शनिवारपासून पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे येथील साबेगाव, साळवीनगर, बी.आर.नगर, सिद्धिविनायकनगर, बेडेकरनगर, मुंब्रादेवी कॉलनी आदींसह इतर भागांतील शेकडो घरे पाण्याखाली गेली. रविवारी दिव्यातील अनेक घरांत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होते.सोमवारी पावसाने उसंत घेतली असली, तरी या भागात पाणीचपाणी होते. शाळकरी मुलांचे अभ्यासाचे साहित्य पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ते सुकवण्याचे प्रयत्न पाल्य आणि पालकांकडून सुरू होते. कोणी घरातील पाणी बाहेर काढत होते, तर कोणी भिजलेला संसार पाहून अश्रू ढाळत होते.दरम्यान, निलेश पाटील यांच्यासारख्या काही स्थानिक समाजसेवकांच्या माध्यमातून या रहिवाशांना नाश्ता, जेवण आदींची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी या भागातून एनडीआरएफची टीम रवाना करण्यात आली. मात्र, सायंकाळपासून पाणी ओसरू लागल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे या भागात मेडिकल कॅम्प घेण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पालिकेने दिली.वीजही गायब : दिव्याच्या विविध भागांत ७२ तासांनंतरही पाणी ओसरले नसल्याने या भागातील अनेक रहिवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत. दुसरीकडे शनिवारपासून या भागातील वीजपुरवठाही गायब झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस