शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दिव्यात रोगराईची भीती; शेकडो घरांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:50 IST

सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने दिवा भागातील अनेकांचे संसार उघड्यावर

ठाणे : सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने दिवा भागातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सोमवारी तिसºया दिवशीही या भागात अनेकांच्या घरात पाणी होते. तब्बल ७२ तासांनंतरही शेकडो घरांमध्ये पाणी असल्याने ते काढण्याची ताकदही रहिवाशांमध्ये उरली नाही. ठाणे महापालिकेने रविवारी या भागातील सुमारे ८५०० रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले. परंतु, उघड्यावर पडलेला संसार परत कोण जोडणार, असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत. पाच लाख लोकसंख्येच्या या भागात महापालिकेच्या स्थापनेपासून आरोग्य केंद्रच न उभारल्याने पुराचे पाणी ओसरले, तरी आरोग्याचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण होणार आहे.शुक्रवारी रात्रीपासून ठाण्यासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. याचा सर्वाधिक फटका दिवा भागाला बसला आहे. दिव्यातील अनेक भागांत शनिवारपासून पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे येथील साबेगाव, साळवीनगर, बी.आर.नगर, सिद्धिविनायकनगर, बेडेकरनगर, मुंब्रादेवी कॉलनी आदींसह इतर भागांतील शेकडो घरे पाण्याखाली गेली. रविवारी दिव्यातील अनेक घरांत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होते.सोमवारी पावसाने उसंत घेतली असली, तरी या भागात पाणीचपाणी होते. शाळकरी मुलांचे अभ्यासाचे साहित्य पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ते सुकवण्याचे प्रयत्न पाल्य आणि पालकांकडून सुरू होते. कोणी घरातील पाणी बाहेर काढत होते, तर कोणी भिजलेला संसार पाहून अश्रू ढाळत होते.दरम्यान, निलेश पाटील यांच्यासारख्या काही स्थानिक समाजसेवकांच्या माध्यमातून या रहिवाशांना नाश्ता, जेवण आदींची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी या भागातून एनडीआरएफची टीम रवाना करण्यात आली. मात्र, सायंकाळपासून पाणी ओसरू लागल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे या भागात मेडिकल कॅम्प घेण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पालिकेने दिली.वीजही गायब : दिव्याच्या विविध भागांत ७२ तासांनंतरही पाणी ओसरले नसल्याने या भागातील अनेक रहिवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत. दुसरीकडे शनिवारपासून या भागातील वीजपुरवठाही गायब झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस