शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यात रोगराईची भीती; शेकडो घरांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:50 IST

सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने दिवा भागातील अनेकांचे संसार उघड्यावर

ठाणे : सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने दिवा भागातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सोमवारी तिसºया दिवशीही या भागात अनेकांच्या घरात पाणी होते. तब्बल ७२ तासांनंतरही शेकडो घरांमध्ये पाणी असल्याने ते काढण्याची ताकदही रहिवाशांमध्ये उरली नाही. ठाणे महापालिकेने रविवारी या भागातील सुमारे ८५०० रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले. परंतु, उघड्यावर पडलेला संसार परत कोण जोडणार, असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत. पाच लाख लोकसंख्येच्या या भागात महापालिकेच्या स्थापनेपासून आरोग्य केंद्रच न उभारल्याने पुराचे पाणी ओसरले, तरी आरोग्याचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण होणार आहे.शुक्रवारी रात्रीपासून ठाण्यासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. याचा सर्वाधिक फटका दिवा भागाला बसला आहे. दिव्यातील अनेक भागांत शनिवारपासून पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे येथील साबेगाव, साळवीनगर, बी.आर.नगर, सिद्धिविनायकनगर, बेडेकरनगर, मुंब्रादेवी कॉलनी आदींसह इतर भागांतील शेकडो घरे पाण्याखाली गेली. रविवारी दिव्यातील अनेक घरांत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होते.सोमवारी पावसाने उसंत घेतली असली, तरी या भागात पाणीचपाणी होते. शाळकरी मुलांचे अभ्यासाचे साहित्य पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ते सुकवण्याचे प्रयत्न पाल्य आणि पालकांकडून सुरू होते. कोणी घरातील पाणी बाहेर काढत होते, तर कोणी भिजलेला संसार पाहून अश्रू ढाळत होते.दरम्यान, निलेश पाटील यांच्यासारख्या काही स्थानिक समाजसेवकांच्या माध्यमातून या रहिवाशांना नाश्ता, जेवण आदींची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी या भागातून एनडीआरएफची टीम रवाना करण्यात आली. मात्र, सायंकाळपासून पाणी ओसरू लागल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे या भागात मेडिकल कॅम्प घेण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पालिकेने दिली.वीजही गायब : दिव्याच्या विविध भागांत ७२ तासांनंतरही पाणी ओसरले नसल्याने या भागातील अनेक रहिवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत. दुसरीकडे शनिवारपासून या भागातील वीजपुरवठाही गायब झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस