शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आधारवाडीची आग अजून आठवडाभर, धुराचा त्रासही चार दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 03:33 IST

आधारवाडी डम्पिंगला ग्राऊंडला शनिवारपासून आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने विशेष टीम तयार केली आहे.

कल्याण : आधारवाडी डम्पिंगला ग्राऊंडला शनिवारपासून आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने विशेष टीम तयार केली आहे. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या आगीचे स्वरुप इतर आगीपेक्षा वेगळे असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी किमान आठ दिवसाचा अवधी लागेल. तसेच नागरिकांना चार दिवस धुराचा त्रास सहन करावा लागेल, अशी माहिती आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी दिली.डम्पिंगच्या आगीवरुन कल्याण-डोंबिवलीत राजकीय रण पेटले असून आयुक्तांना हटविण्याची मागणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाना न भेटता आयुक्तांन दिवसभर डम्पिंगची आग विझवण्याच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर यासंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कामाचा तपशील दिला. यापूर्वी २००९ आणि २०१६ ला डम्पिंगला आग लागल्याचा संदर्भही देण्यात आला.आयुक्त वेलरासू यांनी सांगितले, डम्पिंगच्या आगीचा पहिला कॉल शनिवारी आला. आग विझवण्यासाठी भिवंडी, नवी मुंबई महापालिकेतून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. तसेच काही पाण्याचे टँकर मागविले गेले. पण डम्पिंग ग्राऊंडचा परिसर मोठा आहे. नगरपरिषद असल्यापासून तेथे कचरा टाकला जात आहे. आजमितीस त्याठिकाणी २५ मीटर कचºयाचा डोंगर आहे. १५ एकर जागेत हे डम्पिंग ग्राऊंड असल्याने आगीवर इतक्या लवकर नियंत्रण मिळविता येणार नाही. किमान आठ दिवस त्यासाठी काम करावे लागेल. सध्या खाडीत पाईप टाकून पाणी घेतले जात आहे. तसेच आधारवाडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी घेऊन आग विझविली जात आहे. डम्पिंगची आग विझविण्यासाठी रस्ता तयार केला आहे. नदी, खाडी आणि साठेनगर या तिन्ही बाजूने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्या कामासाठी तीन उपायुक्त आणि तीन कार्यकारी अभियंत्याची टीम कार्यरत आहे. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचे काम करीत आहेत.>प्रशासन आगीविषयी गंभीरकाही लोकांची रविवारी भेट घेतली तेव्हा दम्याचा त्रास असलेले दोन जण भेटले. त्यांना धुराचा त्रास अधिक झाला. त्यांना धुरापासून दूर हलविण्याचा सल्ला दिला. त्याचा विपर्यास करुन काहींनी आयुक्तांनी स्थलांतर करायला सांगितले असे पसरविले. वास्तविक पाहता त्यात काहीच वाईट उद्देश नव्हता. कोणी कोणाचे बोलणे कसे घेईल, हे सांगणे कठीण आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे प्रशासन गंभीर नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. आगीच्या धुराचा आणि डम्पिंगचा प्रचंड त्रास नागरिकांना होतो, हे मला मान्य आहे. नागरिकांनी आत्तापर्यंत जसे प्रशासनाला सहकार्य केले. त्याप्रमाणे आणखी आठ दिवस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.>आग मिथेन वायूमुळे?डम्पिंगला आग का लागली, याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाºयांच्या मते, कचरा प्रचंड असल्याने त्यातून उन्हाळ््यात मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार होतो.तो ज्वलनशील असल्याने सूर्यकिरणाच्या संपर्कात आल्यावर पेट घेतो. त्यामुळे आग लागते. असे असले, तरी आगाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पाण्याचा मारा करुन आग विझविली जात असली, तरी ती अत्यंत खोलवर असल्याने पाण्याचा मारा थांबताच पुन्हा उग्र स्वरुप धारण करते. त्याचबरोबर वाहत्या वाºयामुळे आगीचे स्वरुप भीषण होेते. म्हणून पाण्याचा मारा सतत सुरु ठेवण्यात आल्याचे आयुक्त वेलरासू यांनी सांगितले.