शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

आधारवाडीची आग अजून आठवडाभर, धुराचा त्रासही चार दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 03:33 IST

आधारवाडी डम्पिंगला ग्राऊंडला शनिवारपासून आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने विशेष टीम तयार केली आहे.

कल्याण : आधारवाडी डम्पिंगला ग्राऊंडला शनिवारपासून आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने विशेष टीम तयार केली आहे. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या आगीचे स्वरुप इतर आगीपेक्षा वेगळे असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी किमान आठ दिवसाचा अवधी लागेल. तसेच नागरिकांना चार दिवस धुराचा त्रास सहन करावा लागेल, अशी माहिती आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी दिली.डम्पिंगच्या आगीवरुन कल्याण-डोंबिवलीत राजकीय रण पेटले असून आयुक्तांना हटविण्याची मागणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाना न भेटता आयुक्तांन दिवसभर डम्पिंगची आग विझवण्याच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर यासंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कामाचा तपशील दिला. यापूर्वी २००९ आणि २०१६ ला डम्पिंगला आग लागल्याचा संदर्भही देण्यात आला.आयुक्त वेलरासू यांनी सांगितले, डम्पिंगच्या आगीचा पहिला कॉल शनिवारी आला. आग विझवण्यासाठी भिवंडी, नवी मुंबई महापालिकेतून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. तसेच काही पाण्याचे टँकर मागविले गेले. पण डम्पिंग ग्राऊंडचा परिसर मोठा आहे. नगरपरिषद असल्यापासून तेथे कचरा टाकला जात आहे. आजमितीस त्याठिकाणी २५ मीटर कचºयाचा डोंगर आहे. १५ एकर जागेत हे डम्पिंग ग्राऊंड असल्याने आगीवर इतक्या लवकर नियंत्रण मिळविता येणार नाही. किमान आठ दिवस त्यासाठी काम करावे लागेल. सध्या खाडीत पाईप टाकून पाणी घेतले जात आहे. तसेच आधारवाडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी घेऊन आग विझविली जात आहे. डम्पिंगची आग विझविण्यासाठी रस्ता तयार केला आहे. नदी, खाडी आणि साठेनगर या तिन्ही बाजूने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्या कामासाठी तीन उपायुक्त आणि तीन कार्यकारी अभियंत्याची टीम कार्यरत आहे. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचे काम करीत आहेत.>प्रशासन आगीविषयी गंभीरकाही लोकांची रविवारी भेट घेतली तेव्हा दम्याचा त्रास असलेले दोन जण भेटले. त्यांना धुराचा त्रास अधिक झाला. त्यांना धुरापासून दूर हलविण्याचा सल्ला दिला. त्याचा विपर्यास करुन काहींनी आयुक्तांनी स्थलांतर करायला सांगितले असे पसरविले. वास्तविक पाहता त्यात काहीच वाईट उद्देश नव्हता. कोणी कोणाचे बोलणे कसे घेईल, हे सांगणे कठीण आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे प्रशासन गंभीर नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. आगीच्या धुराचा आणि डम्पिंगचा प्रचंड त्रास नागरिकांना होतो, हे मला मान्य आहे. नागरिकांनी आत्तापर्यंत जसे प्रशासनाला सहकार्य केले. त्याप्रमाणे आणखी आठ दिवस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.>आग मिथेन वायूमुळे?डम्पिंगला आग का लागली, याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाºयांच्या मते, कचरा प्रचंड असल्याने त्यातून उन्हाळ््यात मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार होतो.तो ज्वलनशील असल्याने सूर्यकिरणाच्या संपर्कात आल्यावर पेट घेतो. त्यामुळे आग लागते. असे असले, तरी आगाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पाण्याचा मारा करुन आग विझविली जात असली, तरी ती अत्यंत खोलवर असल्याने पाण्याचा मारा थांबताच पुन्हा उग्र स्वरुप धारण करते. त्याचबरोबर वाहत्या वाºयामुळे आगीचे स्वरुप भीषण होेते. म्हणून पाण्याचा मारा सतत सुरु ठेवण्यात आल्याचे आयुक्त वेलरासू यांनी सांगितले.