शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

मलंगगड परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:21 IST

दीपक केसरकर यांचे आश्वासन; नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी

अंबरनाथ : मलंगगड परिसरातील भातशेतीचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे. केसरकर यांनी मंगळवारी मलंगगड परिसरात शेतीची पाहणी करून शेतकºयांच्या अडचणी जाणून घेतल्या.अंबरनाथ तालुक्यात यंदा अवकाळी पावसाने एकूण ९३ गावांतील २७९९.६२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये सहा हजार ९१७ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यातही मलंगगड आणि नेवाळी परिसरातील बहुतांशी जमीन ही संरक्षण विभागाच्या नावावर आहे. याच जमिनी ताब्यात घेण्यावरून दोन वर्षांपूर्वी नेवाळी आंदोलनही पेटले होते. या जमिनी अनेक वर्षांपासून मूळ मालक असलेले शेतकरी कसत आहेत. यंदा अवकाळी पावसाने या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन नावावर नसल्याने भरपाई मिळणार कशी? असा प्रश्न शेतकºयांना पडला होता. त्यावर शासकीय जमिनी कसत असलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याबाबतची चर्चा झाली असून मलंगगड परिसरातील शेतकºयांनाही यामध्ये गृहीत धरले जाईल, असे आश्वासन यावेळी केसरकर यांनी दिले. यावेळी माजी आमदार विनोद घोसाळकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, उपतालुकाप्रमुख रामचंद्र मढवी, चैनू जाधव, संदीप पाटील आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना संपवण्याची खेळी अयशस्वी!यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला संपवण्याची भाजपची खेळी होती. माझ्या स्वत:च्या मतदारसंघात गोव्याचे भाजपचे मंत्री प्रचार करत होते, तसेच राज्यात अनेक ठिकाणी भाजपने अपक्ष उमेदवार उभे केले होते. त्यामुळे अपक्षांच्या जीवावर सरकार स्थापन करत शिवसेनेला संपवण्याची भाजपची खेळी होती. ती अयशस्वी ठरल्याचे केसरकर म्हणाले. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला. राणे यांना पक्षात घेणेदेखील शिवसेना संपवण्यासाठीची भाजपची खेळी होती. मात्र, राणे जिथे जातात त्यांचे सरकार जाते. शिवसेनेने राणे यांना मुख्यमंत्री केले तेव्हा शिवसेनेची सत्ता गेली, राणे काँग्रेसमध्ये गेले अन् काँग्रेसची सत्ता गेली. आता भाजपचेही तेच झाल्याचे केसरकर म्हणाले.