शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

मलंगगड परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:21 IST

दीपक केसरकर यांचे आश्वासन; नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी

अंबरनाथ : मलंगगड परिसरातील भातशेतीचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे. केसरकर यांनी मंगळवारी मलंगगड परिसरात शेतीची पाहणी करून शेतकºयांच्या अडचणी जाणून घेतल्या.अंबरनाथ तालुक्यात यंदा अवकाळी पावसाने एकूण ९३ गावांतील २७९९.६२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये सहा हजार ९१७ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यातही मलंगगड आणि नेवाळी परिसरातील बहुतांशी जमीन ही संरक्षण विभागाच्या नावावर आहे. याच जमिनी ताब्यात घेण्यावरून दोन वर्षांपूर्वी नेवाळी आंदोलनही पेटले होते. या जमिनी अनेक वर्षांपासून मूळ मालक असलेले शेतकरी कसत आहेत. यंदा अवकाळी पावसाने या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन नावावर नसल्याने भरपाई मिळणार कशी? असा प्रश्न शेतकºयांना पडला होता. त्यावर शासकीय जमिनी कसत असलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याबाबतची चर्चा झाली असून मलंगगड परिसरातील शेतकºयांनाही यामध्ये गृहीत धरले जाईल, असे आश्वासन यावेळी केसरकर यांनी दिले. यावेळी माजी आमदार विनोद घोसाळकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, उपतालुकाप्रमुख रामचंद्र मढवी, चैनू जाधव, संदीप पाटील आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना संपवण्याची खेळी अयशस्वी!यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला संपवण्याची भाजपची खेळी होती. माझ्या स्वत:च्या मतदारसंघात गोव्याचे भाजपचे मंत्री प्रचार करत होते, तसेच राज्यात अनेक ठिकाणी भाजपने अपक्ष उमेदवार उभे केले होते. त्यामुळे अपक्षांच्या जीवावर सरकार स्थापन करत शिवसेनेला संपवण्याची भाजपची खेळी होती. ती अयशस्वी ठरल्याचे केसरकर म्हणाले. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला. राणे यांना पक्षात घेणेदेखील शिवसेना संपवण्यासाठीची भाजपची खेळी होती. मात्र, राणे जिथे जातात त्यांचे सरकार जाते. शिवसेनेने राणे यांना मुख्यमंत्री केले तेव्हा शिवसेनेची सत्ता गेली, राणे काँग्रेसमध्ये गेले अन् काँग्रेसची सत्ता गेली. आता भाजपचेही तेच झाल्याचे केसरकर म्हणाले.