शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

धान्य न घेतल्याने शेतकरी व्यथित, भात पेटवण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 01:08 IST

भात पेटवण्याचा इशारा : खरेदी-विक्री संघाचे मार्केटिंग फेडरेशनला साकडे

मुरबाड : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला असल्याने मिळालेल्या तुटपुंज्या पिकाची बाजारात विक्र ी करण्यासाठी गेलेल्या शेतकºयाचा भात खरेदी करण्यास केंद्राने नकार दिल्याने व्यथित झालेल्या दीपक ठाकरे या शेतकºयाने तहसीलदार कार्यालयासमोर भात पेटवून देण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. यामुळे खरेदी-विक्री संचालक मंडळात खळबळ उडाली असून अध्यक्ष मधुकर केदार व उपाध्यक्ष जगन्नाथ घुडे, प्रकाश पवार यांनी ते धान्य खरेदी करण्याचे आदेश मिळावेत, म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला साकडे घातले आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना मुरबाड खरेदी-विक्र ी संघाकडून मात्र शेतकºयांचे ते आदेश पायदळी तुडवले जात असल्याचा प्रकार ठाकरे यांच्यासंदर्भात घडला. ठाकरे यांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. ते शंभर ते दीडशे पोती भात पिकवतात. त्यातील आपल्या परिवारासाठी लागणारे धान्य साठवून ठेवतात व काही धान्य हे विक्र ी करून आपला घरखर्च भागवतात. परंतु, यावर्षी अवकाळी पावसाने शेतकºयांचे नुकसान झाले. खळ्यातील धान्य हे भिजल्याने भाताला बुरशी आल्यामुळे ते थोड्या प्रमाणात काळसर पडले आहे. मात्र, त्यातील दाणा हा पांढरा असताना हे धान्य खाजगी व्यापारी कवडीमोलाने घेतात. तेच धान्य सरकारच्या खरेदी-विक्री संघाला विकले जाते. ठाकरे यांनी धान्य संघाच्या खरेदी केंद्रात नेले असता ते काळे पडले आहे, त्याला बुरशी आली आहे, अशी कारणे देत ते खरेदी करण्यास भातखरेदी केंद्राने नकार दिला. यामुळे व्यथित झालेल्या ठाकरे यांनी धान्य इतरत्र फेकून देण्यापेक्षा ते तहसीलदार कार्यालयासमोर पेटवून देणार असल्याचे निवेदन तहसीलदार, खरेदी-विक्र ी संघ व मुरबाड पोलीस ठाणे यांना सादर केले.शेतकºयांमधील असंतोष लक्षात घेता खरेदी-विक्री संघाने सरसकट भातखरेदी करण्याचे आदेश मिळण्यासाठी तहसीलदारांमार्फत राज्य सरकार व अन्न नागरी पुरवठा विभाग तसेच ग्राहक संरक्षण विभाग व मार्केटिंग फेडरेशन यांना साकडेघातले आहे. 

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी