शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘समृद्धी’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: March 17, 2017 06:05 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामध्ये कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी बाधित होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी

कल्याण/म्हारळ : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामध्ये कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी बाधित होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी शहाड येथून कल्याण येथील खडकपाड्याजवळील प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत सरकारचा जोरदार निषेध केला.समृद्धी महामार्गात कल्याण, भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. त्यापैकी कल्याण तालुक्यातील उशीद, फळेगाव, रुंदे, उतणे, गुरवली, निंबवली, राया, दानबाव, चिंचवली येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जागा महामार्ग व स्मार्ट सिटीत बाधित होत आहे. त्याविरोधात वारंवार शेतकऱ्यांना वारंवार बैठका, सभा घेऊनही सरकारी अधिकाऱ्यांनी रस्त्यासाठी सीमांकन, मोजणी सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी आमच्या जमिनी आम्हाला द्यायच्या नाहीत, तर प्रशासन का जबरदस्ती करून ही कामे करत आहे, असा संतप्त सवाल या वेळी शेतकऱ्यांनी केला. जमीन बचाव संघर्ष समिती, ठाणे जिल्ह्याच्या वतीने काढलेल्या या मोर्चात समन्वयक व कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, माजी आमदार गोटीराम पवार, माजी खासदार सुरेश टावरे, प्रमोद हिंदुराव, परशुराम पितांबरे, जयराम मेहेर, पद्मश्री जाधव, विश्वनाथ जाधव, वसंत लोणे, चंद्रकांत भोईर, भाऊ गोंधळे, अरविंद चौधरींसह हजारो शेतकरी उपस्थित होते. या मोर्चात महिलांची संख्याही लक्षणीय होती. पोलिसांनी हा मोर्चा प्रांत कार्यालयाच्या गेटवर अडवला. तेथेच नेत्यांनी सरकारविरोधात भाषणे दिली. त्यानंतर, संघर्ष समितीतर्फे प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांना निवेदन देण्यात आले. त्यात समृद्धी महामार्ग व नवनगर प्रकल्प रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या पूर्वी मौजे राया, गुरवली, निंबवली व चिंचवली या गावांत महामार्गाच्या सर्वेक्षणावेळी शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीहल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. त्या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच सर्वेक्षणाच्या वेळी शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचबरोबर नागपूर-मुंबई जोडणारे नागपूर-धुळे-मुंबई आणि नागपूर-औरंगाबाद-सिन्नर-घोटी-मुंबई हे दोन महामार्ग असताना या नवीन महामार्गांचा अट्टहास सरकार का करत आहे, असा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी जमीन बचाव संघर्ष समितीने दिला. (प्रतिनिधी/वार्ताहर)