शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

‘समृद्धी’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: March 17, 2017 06:05 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामध्ये कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी बाधित होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी

कल्याण/म्हारळ : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामध्ये कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी बाधित होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी शहाड येथून कल्याण येथील खडकपाड्याजवळील प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत सरकारचा जोरदार निषेध केला.समृद्धी महामार्गात कल्याण, भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. त्यापैकी कल्याण तालुक्यातील उशीद, फळेगाव, रुंदे, उतणे, गुरवली, निंबवली, राया, दानबाव, चिंचवली येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जागा महामार्ग व स्मार्ट सिटीत बाधित होत आहे. त्याविरोधात वारंवार शेतकऱ्यांना वारंवार बैठका, सभा घेऊनही सरकारी अधिकाऱ्यांनी रस्त्यासाठी सीमांकन, मोजणी सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी आमच्या जमिनी आम्हाला द्यायच्या नाहीत, तर प्रशासन का जबरदस्ती करून ही कामे करत आहे, असा संतप्त सवाल या वेळी शेतकऱ्यांनी केला. जमीन बचाव संघर्ष समिती, ठाणे जिल्ह्याच्या वतीने काढलेल्या या मोर्चात समन्वयक व कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, माजी आमदार गोटीराम पवार, माजी खासदार सुरेश टावरे, प्रमोद हिंदुराव, परशुराम पितांबरे, जयराम मेहेर, पद्मश्री जाधव, विश्वनाथ जाधव, वसंत लोणे, चंद्रकांत भोईर, भाऊ गोंधळे, अरविंद चौधरींसह हजारो शेतकरी उपस्थित होते. या मोर्चात महिलांची संख्याही लक्षणीय होती. पोलिसांनी हा मोर्चा प्रांत कार्यालयाच्या गेटवर अडवला. तेथेच नेत्यांनी सरकारविरोधात भाषणे दिली. त्यानंतर, संघर्ष समितीतर्फे प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांना निवेदन देण्यात आले. त्यात समृद्धी महामार्ग व नवनगर प्रकल्प रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या पूर्वी मौजे राया, गुरवली, निंबवली व चिंचवली या गावांत महामार्गाच्या सर्वेक्षणावेळी शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीहल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. त्या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच सर्वेक्षणाच्या वेळी शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचबरोबर नागपूर-मुंबई जोडणारे नागपूर-धुळे-मुंबई आणि नागपूर-औरंगाबाद-सिन्नर-घोटी-मुंबई हे दोन महामार्ग असताना या नवीन महामार्गांचा अट्टहास सरकार का करत आहे, असा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी जमीन बचाव संघर्ष समितीने दिला. (प्रतिनिधी/वार्ताहर)