शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील शेतकऱ्यांनी मांडली आमदारांकडे कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 01:26 IST

बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता वाहिनीचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु त्याची दखल न घेतल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.

वाडा : तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्चदाबाची वीजवाहिनी जात असून, या वाहिनीसाठी मनोरे उभारणीचे काम महापारेषणने हाती घेतले आहे. या वाहिनीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, ते देशोधडीला लागणार आहेत. बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता वाहिनीचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु त्याची दखल न घेतल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत आमदार सुनील भुसारा यांच्याकडे शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. या अनुषंगाने भुसारा यांनी शनिवारी गावात येऊन शेतकरी आणि महापारेषणचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.२२० केव्ही तारापूर-बोरिवली आणि बोईसर-घोडबंदर-लीलो कुडूस अशी उच्चदाबाची विद्युतवाहिनी जात आहे. वाडा, वसई व पालघर या तालुक्यांतील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे. हे करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता वाहिनीसाठी मनोरे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातच २०१६ मध्ये बनवलेल्या नकाशाप्रमाणे हे काम न करता महापारेषणने मनमानी कारभार करत आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरू केले. यात डाकिवली गावातील अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. येथील बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या शेतातून वाहिनी जात असल्यामुळे त्यांचे लागवड क्षेत्र संपुष्टात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी आमदारांना सांगितले. भुसारा यांच्यासमवेत राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेलचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा पालघर जिल्हा परिषदेचे गटनेते नरेश आकरे, तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, युवा नेते सुरेश पवार, निखिल पष्टे, कुमार सावंत, नायब तहसीलदार सुनील लहांगे, महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत चौगुले आदी उपस्थित हाेते.उच्चस्तरीय बैठकीत ताेडगा काढण्याचे आश्वासनलाेहाेपे गावापासून पुढे वनविभागाच्या जागेतून ही वाहिनी नेल्यास किंवा डाकिवली गावाला वळसा घालून नदीकाठावरून नेल्यास लागवड क्षेत्र बाधित हाेणार नाही, हेही शेतकऱ्यांनी आ. भुसारा यांच्या लक्षात आणून दिले. मंत्रालयात यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावून यावर मार्ग काढून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन आ. भुसारा यांनी शेतकऱ्यांना दिले.