शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बळिराजा देतोय अवकाळीला तोंड, एसआरटीसाठी पुढाकार घेऊ : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 10:28 IST

नेरळ येथील सगुणा बाग येथे एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळा व परिसंवादात सोमवारी ते बोलत होते.  

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : सध्या अवकाळी तसेच पिकांवरील रोग अशा दुष्टचक्राला बळिराजा तोंड देत पुढे जातोय. हे दुष्टचक्र थांबण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञानाची गरज असून, एसआरटी म्हणजेच सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक हे अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आहे. याद्वारे शेतकऱ्यांना फायदा होतोय, ही निश्चितच बदलाची नांदी आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे यासाठी राज्य शासन नक्कीच पुढाकार घेईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नेरळ येथील सगुणा बाग येथे एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळा व परिसंवादात सोमवारी ते बोलत होते.  यावेळी मंचावर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खा. श्रीरंग (आप्पा) बारणे, देवगिरी कल्याण आश्रम बारीपाडा, धुळेचे प्रांत अध्यक्षा चैतराम पवार, आ.महेंद्र थोरवे,आ. भरत गोगावले, कृषिरत्न शेतकरी सगुणा बाग चंद्रशेखर (दादा) भडसावळे,  जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोकरा प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय कोळेकर, एसआरटी शेतकरी परशुराम आगिवले, अनिल निवळकर, चित्रकार राकेश देवरुखकर यांचा सन्मान करण्यात आला.

५२ शेतकऱ्यांचा सन्मानयावेळी ५२ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. अनिल निवळकर यांची संकल्पना आणि राकेश देवरुखकर यांनी काढलेल्या भूमातेच्या चित्राचे  मुख्यमंत्री व विशेष पाहुण्यांच्या हस्ते  अनावरण करण्यात आले. तसेच सगुणा फाउंडेशन डॉट एनजीओ या संकेतस्थळाचे प्रतीकात्मक उदघाटन करण्यात आले. 

शासकीय पाठबळ मिळाल्यास बदल घडेलयावेळी कृषिभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी एसआरटीचे महत्त्व विशद केले. मला राजकारणातील जास्त कळात नाही, पण काही महिन्यांपूर्वी क्रांतिकारी निर्णय घेऊन  बदल घडवून आणला.  एसआरटीला शासकीय पाठबळ मिळाल्यास शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडेल असेही ते म्हणाले. 

आज रासायनिक शेती फोफावली आहे. अवकाळीवर मात करण्यासाठी शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान गरजेचे आहे. भडसावळे यांनी हे तंत्र विकसित केले याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. शेती हा कृषी यज्ञ आहे, तो अखंड धगधगता ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री