शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

शेतकरी स्वत:हून ‘समृद्धी’साठी तयार, राज यांचा दावा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:46 IST

डोंबिवली : समृद्धी महामार्गाबाबत सरकार सकारात्मक असल्याने शेतकरी स्वत:ची जमीन देण्यासाठी स्वत:हून पुढे येत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

डोंबिवली : समृद्धी महामार्गाबाबत सरकार सकारात्मक असल्याने शेतकरी स्वत:ची जमीन देण्यासाठी स्वत:हून पुढे येत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी समृध्दी महामार्गाच्या कामात सरकार स्थानिकांना विश्वासात घेत नसून या महामार्गाच्या आडून वेगळया विदर्भाची चूल मांडली जात असल्याचा आरोप केला होता. डोंबिवलीत एका खाजगी रूग्णालयाच्या कार्यक्रमाला रविवारी पालकमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांना या आरोपांबाबत विचारता त्यांनी स्थानिकांना विश्वासात घेऊनच महामार्गाचे काम केले जात असल्याचे सांगितले. त्यांचे समाधान झाल्याशिवाय महामार्गाचे काम सुरू होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. जनतेच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत, त्यांना योग्य मोबदला मिळाला हवा, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये अशी भूमिका दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आहे. त्या भूमिकेची पुरेपूर अंमलबजावणी केली जाईल. कोणावर अन्याय होणार नाही, असेच मुख्यमंत्र्याचेही धोरण असून स्थानिकांचे समाधान झाल्याशिवाय पुढे कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.>केडीएमसीला खडे बोलखाजगी रूग्णालयांप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आरोग्य सेवा सुधारणे आवश्यक असल्याचे खडे बोल पालकमंत्री शिंदे यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत अप्रत्यक्षपणे केडीएमसीला सुनावले. जर काम होत नसेल तर राज्य सरकार निश्चितच त्यांचा विचार करेल, असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. ठाण्यात युध्दपातळीवर आरोग्य सेवा सुधारण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य असल्याचे त्यांनी खाजगी रूग्णालयाच्या कार्यक्रमात सांगितले. ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल ज्या धडाडीने काम करतात, तशाच कामाची अपेक्षा केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडून आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्र येऊन काम केले पाहिजे. शहराचा विकास हाच केंद्रबिंदू मानून काम झाले पाहिजे, असे त्यांनी सुचवले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली