शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

आधारवाडी ते जेल रस्त्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:51 IST

केडीएमसीने आधारवाडी ते कारागृहादरम्यानच्या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यात बाधित होणाऱ्या उमा भावे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने कामाला स्थगिती दिली होती.

कल्याण : केडीएमसीने आधारवाडी ते कारागृहादरम्यानच्या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यात बाधित होणाऱ्या उमा भावे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने कामाला स्थगिती दिली होती. परंतु, ती स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे २१ वर्षानंतर रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती केडीएमसीच्या विधी विभागाने दिली.आधारवाडी ते कारागृह या रस्त्याच्या विकासाला महापालिकेने मंजुरी दिली होती. हा रस्ता १८ मीटर रुंद करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, या रस्त्याच्या लगत राहणाºया भावे यांनी १९९७ मध्ये कल्याण न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याविरोधात महापालिका प्रशासन अपिलात गेले होते. न्यायालयात महापालिकेच्या बाजूने निकाल लागला. त्याविरोधात भावे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. तेथे न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. या निकालाविरोधात भावे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने दीड वर्षापूर्वी रस्त्याच्या विकासकामाला स्थगिती दिली होती. दीड वर्षानंतर ही स्थगिती उठवली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या विधी विभागासई-मेलद्वारे कळवले आहे. त्यामुळे रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. २१ वर्षांपासून भावे यांनी महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा दिला. मात्र, महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्याने या रस्त्याचा विकास होणार आहे.दरम्यान, हा लढा देत असताना भावे यांचे दरम्यानच्या काळात निधन झाले. आता ही याचिका त्यांचा मुलगा अनंत भावे चालवत होता, अशी माहिती विधी विभागाने दिली.>भावे यांच्या घरावर बुलडोझरसर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठवताच महापालिकेचे कारवाई पथक मंगळवारी तेथे पोहचले. भावे यांचे घर बुलडोझरद्वारे पाडण्यास सुरुवात केली. भावे कुटुंबियांनी सांगितले की, न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला नाही. पण महापालिकेने किमान एक दिवसाची मुभा द्यायला हवी होती. महापालिकेने शौचालयही तोडले. त्यामुळे घरातील चार महिला कुठे जातील. पर्यायी घर कुठे मिळणार? महापालिकेने जराही माणुसकी दाखवली नाही.