शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

‘भांडवली अर्थव्यवस्थेच्या भल्यासाठी नोटाबंदीचा घाट’

By admin | Updated: February 16, 2017 01:45 IST

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी लोकांवर अचानक बंधनकारक केली, असे सांगितले जात असले तरी यामागचा खरा डाव भांडवली

ठाणे : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी लोकांवर अचानक बंधनकारक केली, असे सांगितले जात असले तरी यामागचा खरा डाव भांडवली अर्थव्यवस्थेचा फायदा करून देणे हा असावा, असे मत ज्येष्ठ लेखक आणि अर्थसमीक्षक संजीव चांदोरकर यांनी व्यक्त केले. समता विचार प्रसारक संस्था आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेच्या समारोप सत्रात ‘नोटाबंदीचा ताळेबंद’ या विषयावर ते बोलत होते. खरेतर, सरकारने नोटाबंदी नव्हे, तर नोटाबदल केला. एक हजारच्या जागी दोन हजाराच्या नोटा चलनात आणून सरकारने काय साधले? या देशातील सुमारे ८५ टक्के जनता कॅश आधारित व्यवहार करीत असताना त्या जनतेला कॅशलेस व्यवहाराकडे जबरदस्तीने ढकलणे लोकशाहीत बसणारे ठरते का, असा सवालही चांदोरकर यांनी केला. सर्वसामान्य लोक कॅशमध्ये व्यवहार करतात, म्हणजे ते काळा पैसा निर्माण करतात, असे मानणे सर्वथा चुकीचे असून आयकरप्राप्त उत्पन्न नसणारे सर्वसामान्य या देशात सुमारे ८० टक्के लोक असून त्यांना असुरक्षित करणारे धोरण नोटाबदलीतून साधले गेले, असे ते पुढे म्हणाले. कॅशलेस व्यवहारात प्रत्येक विनिमयाची किंमत चुकवावी लागते. साधा डेबिट आणि क्रेडिटकार्ड यातील फरकही ठाऊक नसणारी बहुसंख्य जनता या देशात असताना अशा तथाकथित सुधारणांसाठी २०१६ चा मुहूर्त योग्य होता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. इंटरनेट, नियमित वीजपुरवठा यांची देशात आजही वानवा असताना ही उठाठेव अनाठायी होती. मोबाइल कंपन्या, क्रेडिटकार्ड कंपन्या, इंटरनेट कंपन्या यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय झाला असावा. कारण, कॅशलेस व्यवहारांमुळे उपलब्ध होणारा ‘ग्राहक व्यवहार डेटा’ या कंपन्यांसाठी लाखमोलाचा असणार आहे. या संपूर्ण प्रक्रि येत भारतीय रिझर्व्ह बँकेचे अवमूल्यन झाले, हीदेखील चिंताजनक बाब असल्याचे चांदोरकारांनी पुढे नमूद केले. अध्यक्षस्थानी श्री समर्थ सेवक मंडळाचे अविनाश कोरडे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन, तर सुनील दिवेकर यांनी शेवटी आभारप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)