शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘भांडवली अर्थव्यवस्थेच्या भल्यासाठी नोटाबंदीचा घाट’

By admin | Updated: February 16, 2017 01:45 IST

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी लोकांवर अचानक बंधनकारक केली, असे सांगितले जात असले तरी यामागचा खरा डाव भांडवली

ठाणे : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी लोकांवर अचानक बंधनकारक केली, असे सांगितले जात असले तरी यामागचा खरा डाव भांडवली अर्थव्यवस्थेचा फायदा करून देणे हा असावा, असे मत ज्येष्ठ लेखक आणि अर्थसमीक्षक संजीव चांदोरकर यांनी व्यक्त केले. समता विचार प्रसारक संस्था आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेच्या समारोप सत्रात ‘नोटाबंदीचा ताळेबंद’ या विषयावर ते बोलत होते. खरेतर, सरकारने नोटाबंदी नव्हे, तर नोटाबदल केला. एक हजारच्या जागी दोन हजाराच्या नोटा चलनात आणून सरकारने काय साधले? या देशातील सुमारे ८५ टक्के जनता कॅश आधारित व्यवहार करीत असताना त्या जनतेला कॅशलेस व्यवहाराकडे जबरदस्तीने ढकलणे लोकशाहीत बसणारे ठरते का, असा सवालही चांदोरकर यांनी केला. सर्वसामान्य लोक कॅशमध्ये व्यवहार करतात, म्हणजे ते काळा पैसा निर्माण करतात, असे मानणे सर्वथा चुकीचे असून आयकरप्राप्त उत्पन्न नसणारे सर्वसामान्य या देशात सुमारे ८० टक्के लोक असून त्यांना असुरक्षित करणारे धोरण नोटाबदलीतून साधले गेले, असे ते पुढे म्हणाले. कॅशलेस व्यवहारात प्रत्येक विनिमयाची किंमत चुकवावी लागते. साधा डेबिट आणि क्रेडिटकार्ड यातील फरकही ठाऊक नसणारी बहुसंख्य जनता या देशात असताना अशा तथाकथित सुधारणांसाठी २०१६ चा मुहूर्त योग्य होता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. इंटरनेट, नियमित वीजपुरवठा यांची देशात आजही वानवा असताना ही उठाठेव अनाठायी होती. मोबाइल कंपन्या, क्रेडिटकार्ड कंपन्या, इंटरनेट कंपन्या यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय झाला असावा. कारण, कॅशलेस व्यवहारांमुळे उपलब्ध होणारा ‘ग्राहक व्यवहार डेटा’ या कंपन्यांसाठी लाखमोलाचा असणार आहे. या संपूर्ण प्रक्रि येत भारतीय रिझर्व्ह बँकेचे अवमूल्यन झाले, हीदेखील चिंताजनक बाब असल्याचे चांदोरकारांनी पुढे नमूद केले. अध्यक्षस्थानी श्री समर्थ सेवक मंडळाचे अविनाश कोरडे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन, तर सुनील दिवेकर यांनी शेवटी आभारप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)