शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

अपक्षांच्या मतांच्या टक्केवारीत भिवंडीत चढउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:38 IST

लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून यंदा १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राजकीय पक्षांचे आठ उमेदवार आहेत, तर सात अपक्ष उमेदवार आहेत

भिवंडी : लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून यंदा १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राजकीय पक्षांचे आठ उमेदवार आहेत, तर सात अपक्ष उमेदवार आहेत. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या भिवंडीत २००९ मध्ये एकूण १६ उमेदवारांपैकी सहा अपक्ष उमेदवार रिंगणात होते. तर, २०१४ च्या निवडणुकीत १३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी तीन अपक्ष उमेदवार होते.नेहमी निवडणुकीत नाराजीतून अथवा बंडखोरीतून अपक्ष म्हणून उमेदवार पुढे येताना दिसतात. मात्र, भिवंडीत तसे दिसून येत नाही. २००९ च्या निवडणुकीत अपक्षांना विजयी उमेदवाराच्या मार्जिनपेक्षा जास्त मते मिळाली. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना सुमार मते मिळाली.२००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे व भाजपचे जगन्नाथ पाटील यांच्यात मुख्य लढत झाली. त्यामध्ये भाजपचे जगन्नाथ पाटील यांना एक लाख ४१ हजार ४२५ मते मिळाली, तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना एक लाख ८२ हजार ७८९ मते मिळाली. ४१ हजार ३६४ मताधिक्याने टावरे विजयी झाले. त्यावेळी अपक्षांना मिळून एकूण ९५ हजार ४८५ मते मिळाली होती. मात्र, या अपक्षांमधील उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी ७७ हजार ७६९ अशी विजयी उमेदवाराच्या मार्जिनपेक्षाही जास्तीची मते घेतली, तर समाजवादीचे उमेदवार आर.आर. पाटील यांनी ३२ हजार ७६७ मते मिळवून या मार्जिनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही पहिली निवडणूक असल्याने त्याचा अंदाज घेऊन २०१४ च्या दुसऱ्या निवडणुकीत उमेदवारांचा सहभाग होता.२०१४ च्या दुसºया निवडणुकीत एकूण १३ उमेदवार निवडणुकीत उभे होते. त्यावेळी तीन उमेदवार अपक्ष होते. त्यावेळी भाजपचे कपिल पाटील आणि काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांच्यात लढत झाली. कपिल पाटील यांना चार लाख ११ हजार ७० मते मिळाली. तर, विश्वनाथ पाटील यांना तीन लाख एक हजार ६२० मते मिळाली आहेत. कपिल पाटील हे एक लाख नऊ हजार ४५० च्या मताधिक्याने निवडून आले. तर, अपक्षांना नऊ हजार ९९९ मते मिळाली होती. ती विजयी उमेदवाराच्या मार्जिनच्या कोसो दूर होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी