शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

फडणवीस महाराष्ट्राचे नव्हेतर गुजरातचे करतात काम; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

By सदानंद नाईक | Updated: November 15, 2022 16:42 IST

कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यावर चौफेर टीका केली.

उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यावर चौफेर टीका केली. फडणवीस हे महाराष्ट्राचे नव्हेतर गुजरातचे मुख्यमंत्री तर महाराष्ट्राचे प्रभारी मंत्री असल्यानेच राज्यातील उधोग गुजरातला जात असल्याची टीका अंधारी यांनी केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात शिवसेना ठाकरे गटा तर्फे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन सोमवारी सायंकाळी केले होते. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली. शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप, पदाधिकारी अल्ताफ शेख, कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, उपजिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, सुभाष जाधव, राष्ट्रवादीचे सदा पाटील, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, दिलीप मालवणकर आदीजन यावेळी उपस्थित होते. सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या सरकारवर चौफेर टीका करून यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वाला हात घालण्याचा महापाप केले असून ५ ते ६ महिन्यात निवडणुकीचे संकेत अंधारे यांनी दिले. तसेच स्थानिक शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचा बालु असे नाव घेत शिवसैनिक नसलेल्याला शिवसेना पदाधिकार्यांनी जीवाचे रान करून तीन वेळा निवडून दिल्याचे सांगितले. मात्र बालु याचे पुढे काय होणार? असा प्रश्नचिन्हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर केला.

 महाराष्ट्राच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या फडणवीस व शिंदे सरकार यांची विश्वासार्हता गेली असून खरे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. तर शिंदे भाजपचे प्यादे बनल्याचे अंधारे यांनी सांगितले. भाषण दरम्यान शिवसैनिक ५० खोके एकदम ओके, गद्दार आदी घोषणाबाजी होत होती. महाराष्ट्र मधील परिस्थितीत पाहता देवेंद्र फडणवीस गुजरातचे मुख्यमंत्री तर महाराष्ट्राचे प्रभारी मंत्री असल्याने राज्यातील अनेक उधोग गुजरातला जात असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली.

सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्यासह पक्षाचे रामदास कदम यांच्या बेताल वक्तव्यावर गुन्हा न होता. माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गर्दीत महिलेला बाजूला केले म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो. फडणवीस राज्याचे नव्हेतर भाजपचे गृहमंत्री सारखे वागत आहेत. त्यांनी धुतराष्टाची भूमिका वठवू नये. असेही सुनावले. तसेच लवकरच बाजी पलटणार असल्याचे संकेत अंधारे यांनी दिल्यावर शिवसैनिकांनी शिंदे गटा विरोधात घोषणाबाजी केली.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारे