शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

फडणवीस महाराष्ट्राचे नव्हेतर गुजरातचे करतात काम; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

By सदानंद नाईक | Updated: November 15, 2022 16:42 IST

कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यावर चौफेर टीका केली.

उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यावर चौफेर टीका केली. फडणवीस हे महाराष्ट्राचे नव्हेतर गुजरातचे मुख्यमंत्री तर महाराष्ट्राचे प्रभारी मंत्री असल्यानेच राज्यातील उधोग गुजरातला जात असल्याची टीका अंधारी यांनी केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात शिवसेना ठाकरे गटा तर्फे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन सोमवारी सायंकाळी केले होते. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली. शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप, पदाधिकारी अल्ताफ शेख, कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, उपजिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, सुभाष जाधव, राष्ट्रवादीचे सदा पाटील, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, दिलीप मालवणकर आदीजन यावेळी उपस्थित होते. सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या सरकारवर चौफेर टीका करून यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वाला हात घालण्याचा महापाप केले असून ५ ते ६ महिन्यात निवडणुकीचे संकेत अंधारे यांनी दिले. तसेच स्थानिक शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचा बालु असे नाव घेत शिवसैनिक नसलेल्याला शिवसेना पदाधिकार्यांनी जीवाचे रान करून तीन वेळा निवडून दिल्याचे सांगितले. मात्र बालु याचे पुढे काय होणार? असा प्रश्नचिन्हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर केला.

 महाराष्ट्राच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या फडणवीस व शिंदे सरकार यांची विश्वासार्हता गेली असून खरे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. तर शिंदे भाजपचे प्यादे बनल्याचे अंधारे यांनी सांगितले. भाषण दरम्यान शिवसैनिक ५० खोके एकदम ओके, गद्दार आदी घोषणाबाजी होत होती. महाराष्ट्र मधील परिस्थितीत पाहता देवेंद्र फडणवीस गुजरातचे मुख्यमंत्री तर महाराष्ट्राचे प्रभारी मंत्री असल्याने राज्यातील अनेक उधोग गुजरातला जात असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली.

सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्यासह पक्षाचे रामदास कदम यांच्या बेताल वक्तव्यावर गुन्हा न होता. माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गर्दीत महिलेला बाजूला केले म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो. फडणवीस राज्याचे नव्हेतर भाजपचे गृहमंत्री सारखे वागत आहेत. त्यांनी धुतराष्टाची भूमिका वठवू नये. असेही सुनावले. तसेच लवकरच बाजी पलटणार असल्याचे संकेत अंधारे यांनी दिल्यावर शिवसैनिकांनी शिंदे गटा विरोधात घोषणाबाजी केली.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारे