शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

फडणवीस महाराष्ट्राचे नव्हेतर गुजरातचे करतात काम; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

By सदानंद नाईक | Updated: November 15, 2022 16:42 IST

कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यावर चौफेर टीका केली.

उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यावर चौफेर टीका केली. फडणवीस हे महाराष्ट्राचे नव्हेतर गुजरातचे मुख्यमंत्री तर महाराष्ट्राचे प्रभारी मंत्री असल्यानेच राज्यातील उधोग गुजरातला जात असल्याची टीका अंधारी यांनी केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात शिवसेना ठाकरे गटा तर्फे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन सोमवारी सायंकाळी केले होते. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली. शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप, पदाधिकारी अल्ताफ शेख, कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, उपजिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, सुभाष जाधव, राष्ट्रवादीचे सदा पाटील, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, दिलीप मालवणकर आदीजन यावेळी उपस्थित होते. सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या सरकारवर चौफेर टीका करून यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वाला हात घालण्याचा महापाप केले असून ५ ते ६ महिन्यात निवडणुकीचे संकेत अंधारे यांनी दिले. तसेच स्थानिक शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचा बालु असे नाव घेत शिवसैनिक नसलेल्याला शिवसेना पदाधिकार्यांनी जीवाचे रान करून तीन वेळा निवडून दिल्याचे सांगितले. मात्र बालु याचे पुढे काय होणार? असा प्रश्नचिन्हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर केला.

 महाराष्ट्राच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या फडणवीस व शिंदे सरकार यांची विश्वासार्हता गेली असून खरे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. तर शिंदे भाजपचे प्यादे बनल्याचे अंधारे यांनी सांगितले. भाषण दरम्यान शिवसैनिक ५० खोके एकदम ओके, गद्दार आदी घोषणाबाजी होत होती. महाराष्ट्र मधील परिस्थितीत पाहता देवेंद्र फडणवीस गुजरातचे मुख्यमंत्री तर महाराष्ट्राचे प्रभारी मंत्री असल्याने राज्यातील अनेक उधोग गुजरातला जात असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली.

सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्यासह पक्षाचे रामदास कदम यांच्या बेताल वक्तव्यावर गुन्हा न होता. माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गर्दीत महिलेला बाजूला केले म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो. फडणवीस राज्याचे नव्हेतर भाजपचे गृहमंत्री सारखे वागत आहेत. त्यांनी धुतराष्टाची भूमिका वठवू नये. असेही सुनावले. तसेच लवकरच बाजी पलटणार असल्याचे संकेत अंधारे यांनी दिल्यावर शिवसैनिकांनी शिंदे गटा विरोधात घोषणाबाजी केली.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारे