शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोविडच्या खर्चासाठी महापालिकांना जास्त अनुदान देण्याची फडणवीस यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 19:41 IST

फडणवीस यांनी पालिकेच्या तळमजल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मीरा भाईंदर मधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्युचे प्रमाण जास्त असल्याने त्यावर नियंत्रण करणे व व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे म्हटले.

लोकमत न्युज नेटवर्कमीरारोड - महापालिका ह्या आर्थिक दृष्टय़ा सक्षम नसुन कोविड साठीचा सर्व खर्च पालिकांना करावा लागतोय. राज्य शासनाने 7 -8 कोटी रुपये दिले असले तरी ते अपुरे आहेत. त्यामुळे महापालिकांना जास्तीत जास्त अनुदान सारकारने द्यावे अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाईंदर येथे पत्रकार परिषदेत केली. फडणवीस यांनी मीरा भाईंदर मधील कोरोना रुग्णांच्या तक्रारी मांडत पालिकेतील सत्ताधारी भाजपाला एकप्रकारे घरचा आहेरच दिला .  फडणवीस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार रविंद्र चव्हाण, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, महापौर ज्योत्सना हासनाळे, आयुक्त डॉ. विजय राठोड, सभागृह नेते रोहिदास पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे,  तसेच भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी आदिंसह भाईंदरच्या भिमसेन जोशी रुग्णालयात जाऊन आढावा घेतला. त्या नंतर महापालिकेत त्यांनी संबंधितां सोबत बैठक घेऊन शहरातील कोरोना संसर्गाची माहिती घेतली. आयुक्तांनी यावेळी पालिकेने केलेल्या व्यवस्थेचे सादरीकरण केले . फडणवीस यांनी पालिकेच्या तळमजल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मीरा भाईंदर मधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्युचे प्रमाण जास्त असल्याने त्यावर नियंत्रण करणे व व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे म्हटले. आमचे सरकार असताना टेंबा रुग्णालय ताब्यात घेतले व व्यवस्था उभी केली जो शहराला आज मोठा आधार आहे. बाकी खाजगी रुग्णालयं आहेत.पण ज्या व्यवस्था आहेत त्या सुधारण्याची गरज असुन ऑक्सीजन बेड वाढवण्याची गरज आहे.  समन्वयाचा अभाव असुन चाचण्यांची तपासणी दुप्पट केली पाहिजे. चाचण्यांचे अहवाल 24 तासात आले पाहिजेत. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी देखील एकास 20 झाली तर प्रसार रोखता येईल.पालिका आयुक्त सांगतात की खाटा उपलब्ध आहेत. पण एक महिला भेटली तीचे पतीला जोशी रुग्णालयात 10 - 12 तास दाखल केले नाही व त्यात त्याचा मृत्यु झाला. एका पत्रकारास लक्षणं असुन देखील रुग्णालयात दाखल केलेले नाही. पालिके कडे जागा आहे आणि लोकांना जागा मिळत नसेल व मृत्यु होणो बरोबर नाही.  त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करुन यंत्रणा उभारा असे आयुक्तांना सांगीतले आहे.पालिकेच्या अलगीकरण कक्षात देखील वेळेवर जेवण मिळत नाही, स्वच्छता नाही आदी तक्रारी आहेत. मनुष्यबळाची कमतरता असुन ती दुर करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. खाजगी रुग्णालयातुन जास्त शूल्क वसुल केले जात असल्या बद्दल आयुक्तांनी समिती नेमुन बिलांचे ऑडिट करण्याचे आश्वासन दिल्याचे फडणवीस म्हणाले.