शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पालिकेच्या स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या भिंतीवरच लघुशंका, अंबरनाथमधील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:20 IST

नगरपालिका स्वच्छ भारत अभियानातंर्गत लाखो रूपये खर्च करून शहरात विविध उपक्र म राबवत आहे.

अंबरनाथ : नगरपालिका स्वच्छ भारत अभियानातंर्गत लाखो रूपये खर्च करून शहरात विविध उपक्र म राबवत आहे. नगरपालिका भिंती रंगवून स्वच्छतेसाठी संदेश देत असताना दुसरीकडे काही फेरीवाले आणि रिक्षाचालक लघुशंका करून रंगवलेल्या भिंती खराब करत आहेत.यावर्षीही नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भाग घेत शहरात विविध उपक्र म राबवण्यास सुरूवात केली आहे. शहरातील महात्मा गांधी विद्यालय,उड्डाणपूल तसेच शहरातील काही भिंतीवर स्वच्छ भारत अंतर्गत भिंतीवर थुंकू नये, शहर स्वच्छ ठेवा,उघड्यावर थुंकू नये असे अनेक प्रकारचे संदेश देत भिंती रंगवल्या आहेत.प्लास्टिकचा वापर टाळा, स्वच्छ अंबरनाथ, सुंदर अंबरनाथ, हरित अंबरनाथ असे विविध संदेश लिहून भिंतींना आकर्षक रंगरंगोटी केली आहे. या कामासाठी अंबरनाथ नगरपालिकेने यंदा २५ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे.त्यामुळे नगरपालिका एकीकडे लाखोंचा निधी खर्च करत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करतआहे.मात्र दुसरीकडे शहरातील स्टेशन परिसरातीलच रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांकडून याच स्वच्छता, जनजागृतीचे संदेश लिहीलेल्या भिंतीवर लघुशंका केली जाते. या प्रकाराने सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा व्यक्तींवर कारवाईची मागणी होत आहे.पालिकेचे होतेय दुर्लक्षअंबरनाथ नगरपालिकेच्या समोर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या भिंतीला लागूनच रिक्षातळ आहे. याच भिंतीवर स्वच्छतेचे संदेश लिहीले आहेत. मात्र या रिक्षातळावरील चालक स्वच्छतेचे संदेश लिहिलेल्या भिंतीवर लघुशंका करत असतात. हीच परिस्थिती शहरातील इतर भागातही असून अनेक रिक्षाचालक, फेरीवाल्यांकडून नगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्यात येत आहे. मात्र याबाबत नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याचे समोर येत आहे. 

टॅग्स :thaneठाणे