शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

पालिकेच्या स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या भिंतीवरच लघुशंका, अंबरनाथमधील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:20 IST

नगरपालिका स्वच्छ भारत अभियानातंर्गत लाखो रूपये खर्च करून शहरात विविध उपक्र म राबवत आहे.

अंबरनाथ : नगरपालिका स्वच्छ भारत अभियानातंर्गत लाखो रूपये खर्च करून शहरात विविध उपक्र म राबवत आहे. नगरपालिका भिंती रंगवून स्वच्छतेसाठी संदेश देत असताना दुसरीकडे काही फेरीवाले आणि रिक्षाचालक लघुशंका करून रंगवलेल्या भिंती खराब करत आहेत.यावर्षीही नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भाग घेत शहरात विविध उपक्र म राबवण्यास सुरूवात केली आहे. शहरातील महात्मा गांधी विद्यालय,उड्डाणपूल तसेच शहरातील काही भिंतीवर स्वच्छ भारत अंतर्गत भिंतीवर थुंकू नये, शहर स्वच्छ ठेवा,उघड्यावर थुंकू नये असे अनेक प्रकारचे संदेश देत भिंती रंगवल्या आहेत.प्लास्टिकचा वापर टाळा, स्वच्छ अंबरनाथ, सुंदर अंबरनाथ, हरित अंबरनाथ असे विविध संदेश लिहून भिंतींना आकर्षक रंगरंगोटी केली आहे. या कामासाठी अंबरनाथ नगरपालिकेने यंदा २५ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे.त्यामुळे नगरपालिका एकीकडे लाखोंचा निधी खर्च करत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करतआहे.मात्र दुसरीकडे शहरातील स्टेशन परिसरातीलच रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांकडून याच स्वच्छता, जनजागृतीचे संदेश लिहीलेल्या भिंतीवर लघुशंका केली जाते. या प्रकाराने सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा व्यक्तींवर कारवाईची मागणी होत आहे.पालिकेचे होतेय दुर्लक्षअंबरनाथ नगरपालिकेच्या समोर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या भिंतीला लागूनच रिक्षातळ आहे. याच भिंतीवर स्वच्छतेचे संदेश लिहीले आहेत. मात्र या रिक्षातळावरील चालक स्वच्छतेचे संदेश लिहिलेल्या भिंतीवर लघुशंका करत असतात. हीच परिस्थिती शहरातील इतर भागातही असून अनेक रिक्षाचालक, फेरीवाल्यांकडून नगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्यात येत आहे. मात्र याबाबत नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याचे समोर येत आहे. 

टॅग्स :thaneठाणे