शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

बारमालक-पालिका आमनेसामने, एनओसीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:05 IST

कोठारी कम्पाऊंडच्या अनियमिततेचे मुद्दे उपस्थित करून लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला अडचणीत आणल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी ठाण्यातील बार-हॉटेलवर कारवाई केली जाईल

ठाणे : कोठारी कम्पाऊंडच्या अनियमिततेचे मुद्दे उपस्थित करून लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला अडचणीत आणल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी ठाण्यातील बार-हॉटेलवर कारवाई केली जाईल, हा अंदाज खरा ठरला असून अग्नीशमन दलाची एनओसी सादर करण्यासाठी पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरूवात केली असून आठवडाभरात कागदपत्रे सादर करावी लागतील. ती न केल्यास दसºयानंतर पालिका सील ठोकण्याची शक्यता आहे.पालिकेच्या या नोटिसांमुळे हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. आधीच नोटाबंदी, जीएसटी आणि मध्यंतरीच्या काळात ५०० मीटरच्या हद्दीच्या निकालामुळे अडचणीत आलेले बार-हॉटेल आता कुठे गजबजू लागले असताना पुढील आठवड्यात सील ठोकले गेले तर या व्यवसायाचे कंबरडे मोडेल, अशी त्यांची भावना आहे. राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी काढलेल्या परित्रकानुसार एकदा अग्नीशमन विभागाची एनओसी घेतली तर तिचे पुन्हा नूतनीकरण करण्याची गरज नाही. त्यामुळे पालिकेची ही कारवाई बेकायदा आहे. त्याविरोधात आम्ही दाद मागू असा पवित्रा हॉटेल मालकांच्या संघटनेने घेतल्याने दोन्ही व्यवस्था आमनेसामने उभ्या आहेत.पालिकेने २००६ मधील महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक कायद्याचा हवाला देत अग्नीशमन विभागाची एनओसी बंधनकारक आहे, ती नसेल तर हॉटेलांना परवाने देऊ नयेत, या नियमावर बोट ठेवले आहे. ठाण्यातील ९० टक्के बार-हॉटेलांकडे अशी एनओसी नाही. त्यांनी बेकायदा बांधकाम केले आहे. त्याबद्दल त्यांना पूर्वीच नोटिसा दिल्या होत्या, पण नंतर राजकीय दबावापोटी कारवाई थांबवली. आता रितसर नोटिसा पाठवल्याने साºया गोष्टी कायद्याच्या कक्षेत येतील आणि उद्या बारमालक कोर्टात गेले तरी कारवाईचा पालिकेचा निर्णय उचलून धरला जाईल, अशी माहिती पालिका अधिकाºयांनी दिली.सरकाने नेमलेल्या यंत्रणेमार्फत बारमालकांनी फायर आॅडिट करून घ्यावे, असे पत्रक दोन वर्षांपूर्वी अग्नीशमनच्या संचालकांनी काढल्याने पालिकेची आताची कारवाई बेकायदा आहे, असा दावा करून हे परिपत्रक पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना देण्यात आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका