शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

डोळ्याला पाणी दिसते मात्र प्यायला मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:50 IST

ग्रामस्थांनी मांडली व्यथा : योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

भातसानगर : शहापूर तालुक्यात अशी अनेक गावे, पाडे आहेत की, ज्या गावपाड्यांतून दूरवर पाणी डोळ्यांना दिसते, मात्र ते प्यायला मिळत नसल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील पाणीटंचाई केवळ नियोजन नसल्याने पाहायला मिळत आहे. आज ज्या पाणीयोजनांवरील निधी खर्च करूनही पूर्ण झालेल्या नाहीत, अशा कंत्राटदारांकडून खर्च झालेले पैसे वसूल करून केलेल्या कामांची प्रत तपासून पाहिल्यास बराच फरक पडू शकतो.

आज तानसा, वैतरणा या धरण परिसरांत ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यांना या धरणातून पाणी उचलण्यास परवानगी नाही. तालुक्यातील सर्वच टंचाईग्रस्त गावपाड्यांना भातसा धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. तानसा धरण परिसरातील अंबतपाडा, टोकरेपाडा, चिंचेचापाड्यात गेल्यास व दूरवर नजर टाकल्यास तानसातील पाणी दिसते. मात्र, ते या गावातील नागरिकांना प्यायला मिळत नाही. तीन टँकरने पाणीपुरवठा होतो, तो तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तानसा धरणातून नाही, तर १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भातसा धरणातून. आज या वाड्यापाड्यांमध्ये विहिरी असूनही एकाही विहिरीला पाणी नसल्याने नागरिक लांबून खड्ड्यांतून पाणी आणत आहेत. अधूनमधून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र तो पुरेसा नाही. सध्या तालुक्यातील सर्वच गावपाडे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाणीटंचाई पुढील वर्षी जाणवू नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना होणे गरजेचे आहे.आज आमच्या पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडल्यास ती दूर होईल.- अविनाश भोईर, ग्रामपंचायत सदस्यआता पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांची टंचाईपासून सुटका होईल.- एम.बी. आव्हाड,उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी