शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

डोळ्याला पाणी दिसते मात्र प्यायला मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:50 IST

ग्रामस्थांनी मांडली व्यथा : योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

भातसानगर : शहापूर तालुक्यात अशी अनेक गावे, पाडे आहेत की, ज्या गावपाड्यांतून दूरवर पाणी डोळ्यांना दिसते, मात्र ते प्यायला मिळत नसल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील पाणीटंचाई केवळ नियोजन नसल्याने पाहायला मिळत आहे. आज ज्या पाणीयोजनांवरील निधी खर्च करूनही पूर्ण झालेल्या नाहीत, अशा कंत्राटदारांकडून खर्च झालेले पैसे वसूल करून केलेल्या कामांची प्रत तपासून पाहिल्यास बराच फरक पडू शकतो.

आज तानसा, वैतरणा या धरण परिसरांत ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यांना या धरणातून पाणी उचलण्यास परवानगी नाही. तालुक्यातील सर्वच टंचाईग्रस्त गावपाड्यांना भातसा धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. तानसा धरण परिसरातील अंबतपाडा, टोकरेपाडा, चिंचेचापाड्यात गेल्यास व दूरवर नजर टाकल्यास तानसातील पाणी दिसते. मात्र, ते या गावातील नागरिकांना प्यायला मिळत नाही. तीन टँकरने पाणीपुरवठा होतो, तो तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तानसा धरणातून नाही, तर १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भातसा धरणातून. आज या वाड्यापाड्यांमध्ये विहिरी असूनही एकाही विहिरीला पाणी नसल्याने नागरिक लांबून खड्ड्यांतून पाणी आणत आहेत. अधूनमधून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र तो पुरेसा नाही. सध्या तालुक्यातील सर्वच गावपाडे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाणीटंचाई पुढील वर्षी जाणवू नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना होणे गरजेचे आहे.आज आमच्या पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडल्यास ती दूर होईल.- अविनाश भोईर, ग्रामपंचायत सदस्यआता पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांची टंचाईपासून सुटका होईल.- एम.बी. आव्हाड,उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी