शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्याला पाणी दिसते मात्र प्यायला मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:50 IST

ग्रामस्थांनी मांडली व्यथा : योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

भातसानगर : शहापूर तालुक्यात अशी अनेक गावे, पाडे आहेत की, ज्या गावपाड्यांतून दूरवर पाणी डोळ्यांना दिसते, मात्र ते प्यायला मिळत नसल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील पाणीटंचाई केवळ नियोजन नसल्याने पाहायला मिळत आहे. आज ज्या पाणीयोजनांवरील निधी खर्च करूनही पूर्ण झालेल्या नाहीत, अशा कंत्राटदारांकडून खर्च झालेले पैसे वसूल करून केलेल्या कामांची प्रत तपासून पाहिल्यास बराच फरक पडू शकतो.

आज तानसा, वैतरणा या धरण परिसरांत ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यांना या धरणातून पाणी उचलण्यास परवानगी नाही. तालुक्यातील सर्वच टंचाईग्रस्त गावपाड्यांना भातसा धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. तानसा धरण परिसरातील अंबतपाडा, टोकरेपाडा, चिंचेचापाड्यात गेल्यास व दूरवर नजर टाकल्यास तानसातील पाणी दिसते. मात्र, ते या गावातील नागरिकांना प्यायला मिळत नाही. तीन टँकरने पाणीपुरवठा होतो, तो तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तानसा धरणातून नाही, तर १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भातसा धरणातून. आज या वाड्यापाड्यांमध्ये विहिरी असूनही एकाही विहिरीला पाणी नसल्याने नागरिक लांबून खड्ड्यांतून पाणी आणत आहेत. अधूनमधून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र तो पुरेसा नाही. सध्या तालुक्यातील सर्वच गावपाडे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाणीटंचाई पुढील वर्षी जाणवू नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना होणे गरजेचे आहे.आज आमच्या पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडल्यास ती दूर होईल.- अविनाश भोईर, ग्रामपंचायत सदस्यआता पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांची टंचाईपासून सुटका होईल.- एम.बी. आव्हाड,उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी