शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

शिक्षणाच्या हक्काखालील ठाणे जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीमधील ११७३ बालकांच्या शालेय प्रवेशासाठी मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:08 IST

RTE : आरटीई कायद्याखाली निवड झालेल्या या बालकांना पहिली ते सीनिअर केजी म्हणजे पूर्व प्राथमिक या वर्गात प्रवेश दिले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या व बालकाच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई म्हणजे शिक्षणाचा हक्क कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले जात आहेत. आता प्रतिक्षा यादीतील एक हजार ८९४ विद्यार्थ्यांची या प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यांना २३ आँक्टोबरपर्यंत दिलेल्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र फक्त ७१८ बालकांनी या मुदतीत प्रवेश घेतले. तर उर्वरित एक हजार १७३ बालकांना २९ आँक्टोंबरपर्यंत प्रवेश घेण्याची वाढीव मुदत देण्यात आली आहे. 

          या आरटीई कायद्याखाली निवड झालेल्या या बालकांना पहिली ते सीनिअर केजी म्हणजे पूर्व प्राथमिक या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. लाँटरी सोडत द्वारे निवड झालेल्या नऊ हजार ३२६ बालकांपैकी दिलेल्या मुदतीत पाच हजार ६७७ बालकांनी प्रवेश घेतले आहेत. यानंतर आता प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीनंतर ही आता वाढीव मुदत देऊन प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना प्रवेश घेण्याची शाळा एसएमएसद्वारे कळवण्यात येणार आहे.   

      या शालेय प्रवेशासाठी संधी देऊन लाँटरी सोडतमधील तीन हजार ४९७ बालकांनी दिलेल्या शाळेत जाऊन प्रवेश घेतलेले नाही. आताही प्रतिक्षा यादीतील एक हजार १७३ बालकांनी प्रवेश घेतलेला नाही. या बालकांच्या पालकांनी तत्काळ शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे. पालकांनी एसएमएसची वाट न  पाहता पालकांनी पोर्टलवर जाऊन प्रवेशाचा दिनांक येथे प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून प्रवेश घेण्या च्या दिनांकची माहिती करून घ्यावी आणि त्वरीत संबंधीत शाळेत जाऊन बालकाचा प्रवेशघेण्याचे आवाहन केले आहे. 

प्रवेश न घेतलेले अंबरनाथ तर - १४५ बालकांचा समावेश आहे. याप्रमाणेच भिवंडी मनपा क्षेत्रातील १४६, भिवंडी तालुक्यातील ११, कल्याणचे -६६८, केडीएमसी क्षेत्रातील १०६, नवी मुंबईचे ३६६, शहापूरचे ३३, मीरा भाईंदरचा एक, ठाणेचे २६१ आणि उल्हासनगरच्या ३६ बालकांचा प्रवेश २९ आँक्टोंबरपर्यंत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा