शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस गाड्यांना हवाय कर्जत, दिवा स्थानकात थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी उपनगरी लोकलची दारे ...

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी उपनगरी लोकलची दारे अजूनही बंदच आहेत. त्यातच दुसरीकडे काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना कर्जत स्थानकात थांबा नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. गडक, कोणार्क, हैदराबाद, सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्यांना कर्जत, तर दिवा स्थानकात कोकण रेल्वेवरील सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

रेल्वेने एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढवली असली तरी त्यांचे थांबे मात्र वाढविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढवूनही प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, कसारा, तर रायगड जिल्ह्यातील कर्जत ही लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी महत्त्वाची स्थानके आहेत. दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक गाड्यांना कर्जत स्थानकात थांबा नाही. त्यामुळे कल्याण ते कर्जत- खोपोलीदरम्यानच्या प्रवाशांना कल्याण स्थानक गाठून या गाड्यांनी आपला इच्छित स्थळी प्रवास करावा लागत आहे. त्यात त्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. शिवाय कोरोनाकाळात तर हा प्रवास अवघड झाला आहे. दुसरीकडे दिवा जंक्शन हे स्थानक तर कोकण रेल्वेचे प्रवेशद्वार आहे. या स्थानकात कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे; पण रेल्वे प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

------

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

मुंबईतून सध्या उत्तर भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रेदश, बिहार, दुसरीकडे पश्चिम बंगालपर्यंत गाड्या धावत आहेत. दक्षिणेकडे चेन्नई, हैदराबाद, बंगळुरूपर्यंत गाड्या धावत आहेत. कोकण रेल्वेमार्गावर कोकण तसेच गोवा, केरळपर्यंत एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत, तसेच राज्यांतर्गतही गाड्या सुरू झाल्या आहेत.

------------------

कर्जतला या गाड्या थांबणार कधी?

हैदराबाद एक्स्प्रेस

कोयना एक्स्प्रेस

सिद्धेश्वर एक्स्प्रेस

कोणार्क एक्स्प्रेस

गडक एक्स्प्रेस

-------------

कर्जत स्थानकात डेक्कन एक्स्प्रेसचा अधिकृत थांबा होता. कोविडकाळात आताच पुन्हा गाडी सुरू झाल्यानंतर मात्र हा थांबा काढण्यात आला आहे. त्यातही कल्याण- पुणे मार्गावर कर्जत स्थानक महत्त्वाचे असून खोपोली, बदलापूर ते नेरळ पट्ट्याला जोडणारे स्थानक, अशी त्याची ख्याती आहे. त्यामुळे या स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे तत्काळ सुरू करायला हवेतच.

-पंकज ओसवाल, रेल्वे प्रवाशांच्या समस्येवर आवाज उठवणारे कार्यकर्ते

------

कोविडकाळात अनेक गाड्या सुरू झाल्या आहेत; परंतु त्यांना कर्जतचा थांबा दिलेला नाही. कर्जतला मोठी बाजारपेठ असून, दररोज पुण्याला जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची गैरसोय होत आहे. जास्तीत जास्त गाड्या या स्थानकात थांबायला हव्यात.

-नितीन परमार, उपाध्यक्ष उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ

------------

कोविडकाळात लांब पल्ल्याच्या सगळ्या मार्गांवर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. पूर्वीसारखे थांबे नजीकच्या काळात पुन्हा सुरू होतील. वरिष्ठ पातळीवरून गाड्यांचे थांबे विविध अहवाल घेऊन ठरवण्यात येतात. त्यानुसार अनलॉकचे टप्पे जसजसे जाहीर होत जातील, तसतसे बदल निश्चितच केले जातील; परंतु आताच काही सांगता येणार नाही.

-रेल्वे अधिकारी

------------