शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

कल्याण-डोंबिवलीत विकास कामावर २ हजार ४९७ कोटी खर्च , विकास नाही तर कर नाही आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:18 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेची सध्या आर्थिक कोंडी झाली असून हा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला असला तरी महापालिकेने गेल्या वीस वर्षात २ हजार ४९७ कोटी रुपये विविध विकास कामांवर खर्च केले आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे. या दोन्ही शहरांमधील नागरी समस्या तशाच आ वासून उभ्या असल्याने ही रक्कम नेमकी कशावर खर्च झाली,

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेची सध्या आर्थिक कोंडी झाली असून हा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला असला तरी महापालिकेने गेल्या वीस वर्षात २ हजार ४९७ कोटी रुपये विविध विकास कामांवर खर्च केले आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे. या दोन्ही शहरांमधील नागरी समस्या तशाच आ वासून उभ्या असल्याने ही रक्कम नेमकी कशावर खर्च झाली, असा सवाल नागरिक करीत असून त्याचे उत्तर असे आहे की, वरील रकमेपैकी ४५ टक्के रक्कम ही लोकप्रतिनिधी, नोकरशहा यांच्या भ्रष्टाचारात हडप झाली तर उर्वरीत ४५ टक्के रक्कम ही कामगारांचे वेतन व पदाधिकाºयांचे भत्ते व दालनांच्या सुशोभिकरणावर खर्च झाल्याची माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी हा दावा केला आहे.१९९६ ते २०१६ या २० वर्षात विविध विकास कामावर किती खर्च झाला याचा लेखाजोखाच घाणेकर यांनी उघड केला आहे. ही एकूण रक्कम २ हजार ४९७ कोटी रुपये इतकी आहे. एवढी रक्कम खर्च केली तर विकास कुठे आहे. नागरीकांकडून नागरी सुविधांविषयी बोंब का केली जाते. याचे आॅडिट होणे आवश्यक आहे. झालेल्या आॅडीटविषयीच यामुळे शंका उपस्थित केली जात आहे. महापालिकेत कुठल्याही कामाकरिता कामाच्या एकूण रकमेच्या ४५ टक्के रक्कम नगरसेवक व अधिकारी यांना वाटावी लागते. टक्केवारीने महापालिका पोखरली आहे. साहजिकच एक रुपयातील ४५ पैसे वाटण्यात गेले तर कंत्राटदार उरलेल्या ५५ पैशांत कामे करतात व स्वत:चा नफा कमावतात. त्यामुळे कामांचा दर्जा खालावतो. त्यामुळे २ हजार ४९७ कोटी खर्च होऊनही निकृष्ट दर्जाची कामे टिकली नाही व पुन:पुन्हा तीच कामे वर्षानुवर्षे केली जात आहेत. हा पैसा नागरीकांनी भरलेल्या कराचा होता. कर भरून त्यांना सोयी सुविधा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे, याकडे घाणेकर यांनी लक्ष वेधले आहे.या व्यतिरिक्त पालिका कर्मचारी व अधिकारी यांच्या वेतनावर अर्थसंकल्पातील एकूण रक्कमेपैकी दरवर्षी ४५ टक्के रक्कम खर्च केली जाते. वेतन,वाहनभत्ता व मोबाईलचा खर्च महापालिका करते. महापालिकेतील राजकीय पदाधिकाºयांचा वाहन भत्ता देते. प्रत्येक सदस्याला महिन्याकाठी मानधन दिले जाते. त्याचबरोबर पदाधिकारी बदलला की त्याच्या दालनाच्या दुरुस्तीवर व सुशोभिकरणावर खर्च करते. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय व जुन्या इमारतीत वारंवार बांधकाम बदल करण्यात आले आहे. त्याच्या परवानग्या महापालिकेने घेतलेल्या नाहीत.याविषयी घाणेकर यांनी सोशल मीडियावर जनजागृती सुरु केली आहे.२० वर्षात विकास कामांवर झालेला खर्चबांधकाम विभाग-३८३ कोटी पाच लाख रुपयेरस्ते दुरुस्ती-२३४ कोटी पाच लाख रुपयेगटारे व शौचालय दुरुस्ती-४० कोटी एक लाख रुपयेनवे रस्ते बनविणे-२२३ कोटी ३५ लाख रुपयेनवीन उद्याने-१२ कोटी ६३ लाख रुपयेपाणीपुरवठा विभाग-९१० कोटी ७६ लाख रुपयेएमआयडीसी व एमडब्लूएसएसबी यांना पाणीपुरवठ्या पोटी दिलेली रक्कम-४५९ कोटी ८९ कोटी रुपयेटँकर भाडे-१७ कोटी एक लाख रुपये.पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती-९० कोटी ९७ लाख रुपयेनालेसफाई-३३ कोटी ३७ लाख रुपये