शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

मोहिमेवर साडेतीन कोटींचा खर्च, दुहेरी लेनचा नवीन पूल बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 04:01 IST

पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले.

- प्रशांत मानेकल्याण : पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले. पत्रीपुलाच्या या पाडकामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च झाले.कमीतकमी वेळेत पूल पाडण्याचे आमचे उद्दिष्ट होते, जेणेकरून मेगाब्लॉकचा रस्ते वाहतुकीवर जास्त परिणाम होऊ नये. अनेक लोकल, मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन क्रेनच्या साहाय्याने हे काम करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक एस.के. तिवारी यांनी दिली. या मोहिमेसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला. जुना पूल धोकादायक झाल्याचे तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. हा पूल दुरु स्त करून वापरावा, अशा स्थितीतही नव्हता. त्यामुळे पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएसआरडीसी आता याठिकाणी नवीन पूल बांधणार असून तो दोन लेनचा असणार आहे. त्याला रेल्वेने मंजुरी दिली असून बांधकामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती तिवारी यांनी दिली. या मोहिमेत एस.के. अग्रवाल, आर.के. गोयल, राजीव मिश्रा, डॉ. ए.के. सिंग यांच्यासह ३०० कर्मचारी आणि ५० अभियंत्यांचे विशेष योगदान मिळाल्याचे तिवारी यांनी सांगितले.अखेर पूल पाडण्यात आलाअंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर रेल्वेच्या सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. २० जुलैला केलेल्या तपासणीत पत्रीपूल धोकादायक असल्याचे समोर आले. त्यामुळे आधी अवजड वाहतुकीसाठी आणि २२ आॅगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूल कायमस्वरूपी बंद करण्यात आला.मुंब्रा बायपासचे काम पूर्ण झाल्याने २५ सप्टेंबर रोजी पत्री पुलावरचा डांबरी रस्ता उखडण्यात आला. हा पूल अडीच महिने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अखेर, रविवारी हा पूल पाडण्याचे काम करण्यात आले.दरम्यान, केडीएमसीचा नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर २००४ सालीच जुना पूल पाडण्यात येणार होता; पण त्याला तब्बल १४ वर्षे विलंब लागला, अशीही माहिती अधिकारी सूत्रांनी दिली.रेल्वेने नोंदवला विक्रमरेल्वेचे दुरुस्तीकाम असो, अथवा पूल उभारणीची कामे, यासाठी १० ते १२ तासांचे ब्लॉक घेतले जात असताना पत्रीपुलाच्या पाडकामासाठी रेल्वेने केवळ सहा तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. प्रत्यक्षात, त्याआधीच पुलाचे पाडकाम करण्यात आले. मेगाब्लॉकची वेळ संपण्यापूर्वी तब्बल ५५ मिनिटे आधी लोकलसेवा सुरू करून रेल्वेने एक प्रकारे विक्रमच नोंदवला आहे.कोंडी सुटण्यासाठी लवकरच पुलांची निर्मितीकल्याण-डोंबिवलीला सद्य:स्थितीत भेडसावणारी वाहतूककोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी नव्याने बांधल्या जाणाऱ्या पत्रीपुलासह पलावा येथेही पूल बांधला जाणार आहे. एमएसआरडीसी या पुलांचे बांधकाम करणार आहे. जुन्या पत्रीपुलाच्या ठिकाणी लवकरच नवीन पूल बांधायला घेतला जाणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.खा. शिंदे यांच्यासह माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, गटनेते दशरथ घाडीगावकर, रमेश जाधव आदींनी पुलाच्या पाडकामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार शिंदे बोलत होते. कल्याण-शीळचे सहापदरीमार्गाचे कामदेखील लवकरच सुरू होईल. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा मिळेल, अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kalyanकल्याण