शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

मोहिमेवर साडेतीन कोटींचा खर्च, दुहेरी लेनचा नवीन पूल बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 04:01 IST

पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले.

- प्रशांत मानेकल्याण : पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले. पत्रीपुलाच्या या पाडकामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च झाले.कमीतकमी वेळेत पूल पाडण्याचे आमचे उद्दिष्ट होते, जेणेकरून मेगाब्लॉकचा रस्ते वाहतुकीवर जास्त परिणाम होऊ नये. अनेक लोकल, मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन क्रेनच्या साहाय्याने हे काम करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक एस.के. तिवारी यांनी दिली. या मोहिमेसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला. जुना पूल धोकादायक झाल्याचे तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. हा पूल दुरु स्त करून वापरावा, अशा स्थितीतही नव्हता. त्यामुळे पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएसआरडीसी आता याठिकाणी नवीन पूल बांधणार असून तो दोन लेनचा असणार आहे. त्याला रेल्वेने मंजुरी दिली असून बांधकामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती तिवारी यांनी दिली. या मोहिमेत एस.के. अग्रवाल, आर.के. गोयल, राजीव मिश्रा, डॉ. ए.के. सिंग यांच्यासह ३०० कर्मचारी आणि ५० अभियंत्यांचे विशेष योगदान मिळाल्याचे तिवारी यांनी सांगितले.अखेर पूल पाडण्यात आलाअंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर रेल्वेच्या सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. २० जुलैला केलेल्या तपासणीत पत्रीपूल धोकादायक असल्याचे समोर आले. त्यामुळे आधी अवजड वाहतुकीसाठी आणि २२ आॅगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूल कायमस्वरूपी बंद करण्यात आला.मुंब्रा बायपासचे काम पूर्ण झाल्याने २५ सप्टेंबर रोजी पत्री पुलावरचा डांबरी रस्ता उखडण्यात आला. हा पूल अडीच महिने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अखेर, रविवारी हा पूल पाडण्याचे काम करण्यात आले.दरम्यान, केडीएमसीचा नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर २००४ सालीच जुना पूल पाडण्यात येणार होता; पण त्याला तब्बल १४ वर्षे विलंब लागला, अशीही माहिती अधिकारी सूत्रांनी दिली.रेल्वेने नोंदवला विक्रमरेल्वेचे दुरुस्तीकाम असो, अथवा पूल उभारणीची कामे, यासाठी १० ते १२ तासांचे ब्लॉक घेतले जात असताना पत्रीपुलाच्या पाडकामासाठी रेल्वेने केवळ सहा तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. प्रत्यक्षात, त्याआधीच पुलाचे पाडकाम करण्यात आले. मेगाब्लॉकची वेळ संपण्यापूर्वी तब्बल ५५ मिनिटे आधी लोकलसेवा सुरू करून रेल्वेने एक प्रकारे विक्रमच नोंदवला आहे.कोंडी सुटण्यासाठी लवकरच पुलांची निर्मितीकल्याण-डोंबिवलीला सद्य:स्थितीत भेडसावणारी वाहतूककोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी नव्याने बांधल्या जाणाऱ्या पत्रीपुलासह पलावा येथेही पूल बांधला जाणार आहे. एमएसआरडीसी या पुलांचे बांधकाम करणार आहे. जुन्या पत्रीपुलाच्या ठिकाणी लवकरच नवीन पूल बांधायला घेतला जाणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.खा. शिंदे यांच्यासह माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, गटनेते दशरथ घाडीगावकर, रमेश जाधव आदींनी पुलाच्या पाडकामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार शिंदे बोलत होते. कल्याण-शीळचे सहापदरीमार्गाचे कामदेखील लवकरच सुरू होईल. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा मिळेल, अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kalyanकल्याण