शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

मोहिमेवर साडेतीन कोटींचा खर्च, दुहेरी लेनचा नवीन पूल बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 04:01 IST

पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले.

- प्रशांत मानेकल्याण : पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले. पत्रीपुलाच्या या पाडकामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च झाले.कमीतकमी वेळेत पूल पाडण्याचे आमचे उद्दिष्ट होते, जेणेकरून मेगाब्लॉकचा रस्ते वाहतुकीवर जास्त परिणाम होऊ नये. अनेक लोकल, मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन क्रेनच्या साहाय्याने हे काम करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक एस.के. तिवारी यांनी दिली. या मोहिमेसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला. जुना पूल धोकादायक झाल्याचे तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. हा पूल दुरु स्त करून वापरावा, अशा स्थितीतही नव्हता. त्यामुळे पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएसआरडीसी आता याठिकाणी नवीन पूल बांधणार असून तो दोन लेनचा असणार आहे. त्याला रेल्वेने मंजुरी दिली असून बांधकामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती तिवारी यांनी दिली. या मोहिमेत एस.के. अग्रवाल, आर.के. गोयल, राजीव मिश्रा, डॉ. ए.के. सिंग यांच्यासह ३०० कर्मचारी आणि ५० अभियंत्यांचे विशेष योगदान मिळाल्याचे तिवारी यांनी सांगितले.अखेर पूल पाडण्यात आलाअंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर रेल्वेच्या सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. २० जुलैला केलेल्या तपासणीत पत्रीपूल धोकादायक असल्याचे समोर आले. त्यामुळे आधी अवजड वाहतुकीसाठी आणि २२ आॅगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूल कायमस्वरूपी बंद करण्यात आला.मुंब्रा बायपासचे काम पूर्ण झाल्याने २५ सप्टेंबर रोजी पत्री पुलावरचा डांबरी रस्ता उखडण्यात आला. हा पूल अडीच महिने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अखेर, रविवारी हा पूल पाडण्याचे काम करण्यात आले.दरम्यान, केडीएमसीचा नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर २००४ सालीच जुना पूल पाडण्यात येणार होता; पण त्याला तब्बल १४ वर्षे विलंब लागला, अशीही माहिती अधिकारी सूत्रांनी दिली.रेल्वेने नोंदवला विक्रमरेल्वेचे दुरुस्तीकाम असो, अथवा पूल उभारणीची कामे, यासाठी १० ते १२ तासांचे ब्लॉक घेतले जात असताना पत्रीपुलाच्या पाडकामासाठी रेल्वेने केवळ सहा तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. प्रत्यक्षात, त्याआधीच पुलाचे पाडकाम करण्यात आले. मेगाब्लॉकची वेळ संपण्यापूर्वी तब्बल ५५ मिनिटे आधी लोकलसेवा सुरू करून रेल्वेने एक प्रकारे विक्रमच नोंदवला आहे.कोंडी सुटण्यासाठी लवकरच पुलांची निर्मितीकल्याण-डोंबिवलीला सद्य:स्थितीत भेडसावणारी वाहतूककोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी नव्याने बांधल्या जाणाऱ्या पत्रीपुलासह पलावा येथेही पूल बांधला जाणार आहे. एमएसआरडीसी या पुलांचे बांधकाम करणार आहे. जुन्या पत्रीपुलाच्या ठिकाणी लवकरच नवीन पूल बांधायला घेतला जाणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.खा. शिंदे यांच्यासह माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, गटनेते दशरथ घाडीगावकर, रमेश जाधव आदींनी पुलाच्या पाडकामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार शिंदे बोलत होते. कल्याण-शीळचे सहापदरीमार्गाचे कामदेखील लवकरच सुरू होईल. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा मिळेल, अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kalyanकल्याण