शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

धक्कादायक! जत्रेत मटण विक्रीसाठी आणलेले ६५ बकरे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 23:01 IST

या बाबत मटण विक्रेते अब्दुल माबुद कुरेशी यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे

भिवंडीतालुक्यातील ग्रामीण भागात सध्या जत्रा यात्रा उत्सव सुरू झाले असून प्रत्येक गावात या यात्रा जत्रा उत्सवा निमित्त कोंबडे बकरे मोठया प्रमाणावर कापले जातात. तालुक्यातील गुंदवली गावातील गावदेवीची जत्रा बुधवारी असल्याने गावातील मटण विक्रेता अब्दुल माबुद कुरेशी यांनी मंगळवारी कोनगाव बकरा मार्केट येथून ६ लाख रुपयांचे ५९ बकरे व १० मेंढे आणून रात्री आपल्या दुकाना शेजारी असलेल्या गाळ्यात चारापाणी देऊन बांधून ठेवले होते. सकाळी सहा वाजता त्यांचा मुलगा दुकानात आला, त्यावेळी त्याने गाळ्याचे शटर उघडले असता त्यामधील ६५ बकरे मृतावस्थेत आढळून आले. तर चार जिवंत राहिलेले बकरे सुध्दा मलूल होऊन पडल्याचे दिसले.

या बाबत मटण विक्रेते अब्दुल माबुद कुरेशी यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .या बाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ देवश्री जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन मृत बकरे शेलार येथील पशुचिकित्सलय या ठिकाणी शवविच्छेदना साठी आणले असून त्यांचे पृथकरण तपासून नक्की बकरे कशाने मृत झाले हे निष्पन्न होणार असल्याचे सांगत त्यानंतर सर्व मृत बकरे यांची शास्त्रोक्त पद्धतीने व्हिलेवाट लावण्या बाबत योग्य ते मार्गदर्शन केले जाणार असल्याचे डॉ देवश्री जोशी यांनी स्पष्ट केले .दरम्यान ऐन धंद्याच्या वेळी आशा पद्धतीने नुकसान झाल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे .तर पोलीस या बाबत कोणावर संशय आहे का त्या दिशेने तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी