शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

पालघर जिल्ह्यात आजही कुपोषण वाढतेच आहे

By admin | Updated: January 30, 2017 01:32 IST

गेल्या अनेक दशकांपासून या जिल्ह्याला वेढून टाकणारे कुपोषण अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात असलेल्या मोखाडा, जव्हार, तलासरी, वाडा, विक्रमगड, डहाणू

पालघर : गेल्या अनेक दशकांपासून या जिल्ह्याला वेढून टाकणारे कुपोषण अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात असलेल्या मोखाडा, जव्हार, तलासरी, वाडा, विक्रमगड, डहाणू या सर्व जिल्ह्यात असलेल्या आरोग्य केंद्रांतील कुपोषित बालकांची आकडेवारी हेच सत्य सांगते आहे.कुपोषण आटोक्यात आणण्यासाठी आणलेल्या अंगणवाडी, आशा सेविका, पोषण आहार व आरोग्य विषयक योजना आखल्या जातात. परंतु त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा निर्माण केली जात नाही. त्यामुळे योजना उत्तम, निधीची तरतूद भरपूर परंतु त्याचा वापर कसा होतो याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे कुपोषितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. कुपोषणाच्या समस्येचे खरे मूळ बेरोजगारी, अज्ञान, बालविवाह हे आहे. परंतु त्यावर कोणताही इलाज केला जात नाही. रोहयोची कामे मागूनही महिनोंमहिने मिळत नाहीत. त्यामुळे स्थलांतर होते त्याचा परिणाम मुलांवर होतो. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात पुरेसे डॉक्टर नाहीत. काही ठिकाणी नर्सपण नाहीत. तर अनेक ठिकाणी औषधेही नाहीत. जिथे आहेत तिथे ती गरज नसलेली अथवा कालबाह्य झालेली त्यामुळे त्यांचा काहीही उपयोग होत नाही.पोषण आहाराची योजना सरकार राबवते परंतु हा आहार शिजविण्याची भांडी नाहीत, ज्या बचत गटांना आहार शिजविण्याचे कंत्राट दिले त्यांना सहासहा महिने पैसे नाहीत. वेतन नाही. अशा स्थितीत पोषण आहार द्यायचा तरी कसा? असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे.गेली तीन वर्षे आश्रमशाळांतील आहार शिजविण्याकरीता लागणाऱ्या भांड्यांचे कंत्राट लालफितीत आहे. त्यामुळे फुटक्या भांड्यात स्वयंपाक होतो आहे. मध्यंतरी मंत्री, आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. आरोग्यमंत्रीही तीन वेळा येऊन गेले. परंतु दिलेली आश्वासने प्रत्यक्षात आलीच नाही. स्थिती जैसे थे राहिली त्यामुळे कुपोषणावर नियंत्रण मिळवता आले नाही. असे यंत्रणातील अधिकारीच सांगतात. यावर लवकर इलाज केला नाहीतर पुन्हा एकदा कुपोषित बालकांच्या आणि मातांच्या मृत्यूचे कांड सुरू होण्याची शक्यता जाणवते आहे. आतातरी नेत्यांना आणि मंत्र्यांना पाझर फुटावा अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)