शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पालघर जिल्ह्यात आजही कुपोषण वाढतेच आहे

By admin | Updated: January 30, 2017 01:32 IST

गेल्या अनेक दशकांपासून या जिल्ह्याला वेढून टाकणारे कुपोषण अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात असलेल्या मोखाडा, जव्हार, तलासरी, वाडा, विक्रमगड, डहाणू

पालघर : गेल्या अनेक दशकांपासून या जिल्ह्याला वेढून टाकणारे कुपोषण अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात असलेल्या मोखाडा, जव्हार, तलासरी, वाडा, विक्रमगड, डहाणू या सर्व जिल्ह्यात असलेल्या आरोग्य केंद्रांतील कुपोषित बालकांची आकडेवारी हेच सत्य सांगते आहे.कुपोषण आटोक्यात आणण्यासाठी आणलेल्या अंगणवाडी, आशा सेविका, पोषण आहार व आरोग्य विषयक योजना आखल्या जातात. परंतु त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा निर्माण केली जात नाही. त्यामुळे योजना उत्तम, निधीची तरतूद भरपूर परंतु त्याचा वापर कसा होतो याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे कुपोषितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. कुपोषणाच्या समस्येचे खरे मूळ बेरोजगारी, अज्ञान, बालविवाह हे आहे. परंतु त्यावर कोणताही इलाज केला जात नाही. रोहयोची कामे मागूनही महिनोंमहिने मिळत नाहीत. त्यामुळे स्थलांतर होते त्याचा परिणाम मुलांवर होतो. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात पुरेसे डॉक्टर नाहीत. काही ठिकाणी नर्सपण नाहीत. तर अनेक ठिकाणी औषधेही नाहीत. जिथे आहेत तिथे ती गरज नसलेली अथवा कालबाह्य झालेली त्यामुळे त्यांचा काहीही उपयोग होत नाही.पोषण आहाराची योजना सरकार राबवते परंतु हा आहार शिजविण्याची भांडी नाहीत, ज्या बचत गटांना आहार शिजविण्याचे कंत्राट दिले त्यांना सहासहा महिने पैसे नाहीत. वेतन नाही. अशा स्थितीत पोषण आहार द्यायचा तरी कसा? असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे.गेली तीन वर्षे आश्रमशाळांतील आहार शिजविण्याकरीता लागणाऱ्या भांड्यांचे कंत्राट लालफितीत आहे. त्यामुळे फुटक्या भांड्यात स्वयंपाक होतो आहे. मध्यंतरी मंत्री, आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. आरोग्यमंत्रीही तीन वेळा येऊन गेले. परंतु दिलेली आश्वासने प्रत्यक्षात आलीच नाही. स्थिती जैसे थे राहिली त्यामुळे कुपोषणावर नियंत्रण मिळवता आले नाही. असे यंत्रणातील अधिकारीच सांगतात. यावर लवकर इलाज केला नाहीतर पुन्हा एकदा कुपोषित बालकांच्या आणि मातांच्या मृत्यूचे कांड सुरू होण्याची शक्यता जाणवते आहे. आतातरी नेत्यांना आणि मंत्र्यांना पाझर फुटावा अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)