शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सदोष दरवाजांमुळे ‘बारवी’ भरलेले नसतानाही विसर्ग सुरू, केवळ ७१ टक्के पाणीसाठा

By पंकज पाटील | Updated: July 30, 2024 08:27 IST

यंदा धरण भरायला उशीर लागणार

पंकज पाटील, लाेकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात आता ७१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मात्र, धरण पूर्ण भरलेले नसतानाही त्याच्या दरवाजांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये धरण ओव्हरफ्लो झाले की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता धरणाच्या दरवाजांमध्ये दोष निर्माण झाल्यानेच पाण्याचा हा विसर्ग आपोआप सुरू असल्याचे उघड झाले आहे. या नादुरुस्त दरवाजांमुळे यंदा धरण भरण्यास उशीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरणाच्या ११ दरवाजांपैकी चार दरवाजांमध्ये काही दोष निर्माण झाला आहे. या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत. 

दोष तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

धरण भरल्यावर दरवाजावर पाण्याचा दाब निर्माण होऊन ते आपोआप उघडतात. कोणतेही यांत्रिक उपकरण वापरावे लागत नाही. पाणीसाठा वाढत असताना काही दरवाजांमध्ये किंचितसा दोष निर्माण झाल्याने चार दरवाजांमधून पाणी बाहेर पडू लागले आहे. त्यातील एका दरवाजातून जास्त प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्यामुळे धरण भरण्यास विलंब लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २९ जुलै रोजी धरण ९० टक्के भरले होते. मात्र, यंदा दमदार पाऊस होऊनही धरणात अजूनही ७१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजांमध्ये निर्माण झालेला दोष तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Damधरण