शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

सदोष दरवाजांमुळे ‘बारवी’ भरलेले नसतानाही विसर्ग सुरू, केवळ ७१ टक्के पाणीसाठा

By पंकज पाटील | Updated: July 30, 2024 08:27 IST

यंदा धरण भरायला उशीर लागणार

पंकज पाटील, लाेकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात आता ७१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मात्र, धरण पूर्ण भरलेले नसतानाही त्याच्या दरवाजांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये धरण ओव्हरफ्लो झाले की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता धरणाच्या दरवाजांमध्ये दोष निर्माण झाल्यानेच पाण्याचा हा विसर्ग आपोआप सुरू असल्याचे उघड झाले आहे. या नादुरुस्त दरवाजांमुळे यंदा धरण भरण्यास उशीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरणाच्या ११ दरवाजांपैकी चार दरवाजांमध्ये काही दोष निर्माण झाला आहे. या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत. 

दोष तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

धरण भरल्यावर दरवाजावर पाण्याचा दाब निर्माण होऊन ते आपोआप उघडतात. कोणतेही यांत्रिक उपकरण वापरावे लागत नाही. पाणीसाठा वाढत असताना काही दरवाजांमध्ये किंचितसा दोष निर्माण झाल्याने चार दरवाजांमधून पाणी बाहेर पडू लागले आहे. त्यातील एका दरवाजातून जास्त प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्यामुळे धरण भरण्यास विलंब लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २९ जुलै रोजी धरण ९० टक्के भरले होते. मात्र, यंदा दमदार पाऊस होऊनही धरणात अजूनही ७१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजांमध्ये निर्माण झालेला दोष तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Damधरण