शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

सदोष दरवाजांमुळे ‘बारवी’ भरलेले नसतानाही विसर्ग सुरू, केवळ ७१ टक्के पाणीसाठा

By पंकज पाटील | Updated: July 30, 2024 08:27 IST

यंदा धरण भरायला उशीर लागणार

पंकज पाटील, लाेकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात आता ७१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मात्र, धरण पूर्ण भरलेले नसतानाही त्याच्या दरवाजांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये धरण ओव्हरफ्लो झाले की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता धरणाच्या दरवाजांमध्ये दोष निर्माण झाल्यानेच पाण्याचा हा विसर्ग आपोआप सुरू असल्याचे उघड झाले आहे. या नादुरुस्त दरवाजांमुळे यंदा धरण भरण्यास उशीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरणाच्या ११ दरवाजांपैकी चार दरवाजांमध्ये काही दोष निर्माण झाला आहे. या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत. 

दोष तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

धरण भरल्यावर दरवाजावर पाण्याचा दाब निर्माण होऊन ते आपोआप उघडतात. कोणतेही यांत्रिक उपकरण वापरावे लागत नाही. पाणीसाठा वाढत असताना काही दरवाजांमध्ये किंचितसा दोष निर्माण झाल्याने चार दरवाजांमधून पाणी बाहेर पडू लागले आहे. त्यातील एका दरवाजातून जास्त प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्यामुळे धरण भरण्यास विलंब लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २९ जुलै रोजी धरण ९० टक्के भरले होते. मात्र, यंदा दमदार पाऊस होऊनही धरणात अजूनही ७१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजांमध्ये निर्माण झालेला दोष तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Damधरण