शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सदोष दरवाजांमुळे ‘बारवी’ भरलेले नसतानाही विसर्ग सुरू, केवळ ७१ टक्के पाणीसाठा

By पंकज पाटील | Updated: July 30, 2024 08:27 IST

यंदा धरण भरायला उशीर लागणार

पंकज पाटील, लाेकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात आता ७१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मात्र, धरण पूर्ण भरलेले नसतानाही त्याच्या दरवाजांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये धरण ओव्हरफ्लो झाले की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता धरणाच्या दरवाजांमध्ये दोष निर्माण झाल्यानेच पाण्याचा हा विसर्ग आपोआप सुरू असल्याचे उघड झाले आहे. या नादुरुस्त दरवाजांमुळे यंदा धरण भरण्यास उशीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरणाच्या ११ दरवाजांपैकी चार दरवाजांमध्ये काही दोष निर्माण झाला आहे. या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत. 

दोष तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

धरण भरल्यावर दरवाजावर पाण्याचा दाब निर्माण होऊन ते आपोआप उघडतात. कोणतेही यांत्रिक उपकरण वापरावे लागत नाही. पाणीसाठा वाढत असताना काही दरवाजांमध्ये किंचितसा दोष निर्माण झाल्याने चार दरवाजांमधून पाणी बाहेर पडू लागले आहे. त्यातील एका दरवाजातून जास्त प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्यामुळे धरण भरण्यास विलंब लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २९ जुलै रोजी धरण ९० टक्के भरले होते. मात्र, यंदा दमदार पाऊस होऊनही धरणात अजूनही ७१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजांमध्ये निर्माण झालेला दोष तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Damधरण