शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महसूल मंत्र्यांच्या आश्वासना नंतर देखील ठोस कार्यवाही नाही; मीरा भाईंदरच्या ब्रिटिशकालीन इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी विरुद्ध कारवाईची मागणी

By धीरज परब | Updated: July 11, 2024 19:15 IST

 यामध्ये अनेक लोकांच्या स्वमालकीच्या व सरकारी जमिनीचाही समावेश आहे . सदर कंपनी मीरा भाईंदर येथील नागरिकांकडून व विकासकाकडून एनओसी देण्यासाठी लाखो-करोडो रुपये वसूल करते . 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये गृहनिर्माण संस्थांना कन्व्हेन्स तेच विकासकांना बांधकाम परवानगी साठी ब्रिटिशकालीन कंपनी दि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी कडून ना हरकत पत्राच्या आड बेकायदा लाखो - करोडो रुपये वसूल केले जात असताना महसूलमंत्री यांनी आश्वासन देऊन सुद्धा ठोस कार्यवाही केली गेली नसल्याचा आरोप करत या प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कारवाईची मागणी विधानसभेत लक्षवेधी सूचना द्वारे केली आहे .  

मीरा भाईंदर शहरातील जवळपास ९ हजार एकर जमिन तत्कालिन जिल्हाधिकारी झेंडे यांनी सन २००८ मध्ये बेकादेशीरपणे 'दि इस्टेट इन्व्हेस्टमेंटर कंपनी प्रा. लि. च्या नावे केली . यामध्ये अनेक लोकांच्या स्वमालकीच्या व सरकारी जमिनीचाही समावेश आहे . सदर कंपनी मीरा भाईंदर येथील नागरिकांकडून व विकासकाकडून एनओसी देण्यासाठी लाखो-करोडो रुपये वसूल करते . 

येथील जमिनींचा खरेदी-विक्री व्यवहार व गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल तर महसूल विभागाकडून सदर कंपनीची एनओसी मागितली जाते . कंपनीच्या एनओसी शिवाय कोणताही व्यवहार केला जात नाही . त्यामुळे स्वातंत्र्यांनंतर ही मीरा-भाईंदर शहर अद्याप 'लगान' पासून स्वातंत्र न झाल्याने स्थानिक नागरिक, जमिनधारक यांच्यात तीव्र संतापाची व असुरक्षिततेची भावना आहे . उक्त प्रकरणी स्थानिक नागरीकांसह सर्व पक्षीय लोकप्रतिनीधी यांनी शासनाकडे केलेल्या तक्रारी व सदर कंपनीच्या वसूली पासून मुक्त करण्याची व दोर्षीवर कठोर कारवाई करण्याची होत असलेली मागणी अजूनही गांभीर्याने घेतली जात नाही . 

डिसेंबर, २०२३ मध्ये विधानसभेत हा मुद्दा आला असता महसूल मंत्री यांनी याबाबत तातडीने चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सभागृहात आश्वासन दिले होते . तथापी अद्याप या प्रकरणी कोणतीच ठोस कार्यवाही होत नाही . परिणामी नागरिकांत शासनाप्रती निर्माण झालेली नैराश्याची व असंतोषाची भावना पाहता शासनाने तातडीने इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी बाबत  ठोस निर्णयात्मक कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे आ . सरनाईक यांनी म्हटले आहे .