शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महसूल मंत्र्यांच्या आश्वासना नंतर देखील ठोस कार्यवाही नाही; मीरा भाईंदरच्या ब्रिटिशकालीन इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी विरुद्ध कारवाईची मागणी

By धीरज परब | Updated: July 11, 2024 19:15 IST

 यामध्ये अनेक लोकांच्या स्वमालकीच्या व सरकारी जमिनीचाही समावेश आहे . सदर कंपनी मीरा भाईंदर येथील नागरिकांकडून व विकासकाकडून एनओसी देण्यासाठी लाखो-करोडो रुपये वसूल करते . 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये गृहनिर्माण संस्थांना कन्व्हेन्स तेच विकासकांना बांधकाम परवानगी साठी ब्रिटिशकालीन कंपनी दि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी कडून ना हरकत पत्राच्या आड बेकायदा लाखो - करोडो रुपये वसूल केले जात असताना महसूलमंत्री यांनी आश्वासन देऊन सुद्धा ठोस कार्यवाही केली गेली नसल्याचा आरोप करत या प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कारवाईची मागणी विधानसभेत लक्षवेधी सूचना द्वारे केली आहे .  

मीरा भाईंदर शहरातील जवळपास ९ हजार एकर जमिन तत्कालिन जिल्हाधिकारी झेंडे यांनी सन २००८ मध्ये बेकादेशीरपणे 'दि इस्टेट इन्व्हेस्टमेंटर कंपनी प्रा. लि. च्या नावे केली . यामध्ये अनेक लोकांच्या स्वमालकीच्या व सरकारी जमिनीचाही समावेश आहे . सदर कंपनी मीरा भाईंदर येथील नागरिकांकडून व विकासकाकडून एनओसी देण्यासाठी लाखो-करोडो रुपये वसूल करते . 

येथील जमिनींचा खरेदी-विक्री व्यवहार व गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल तर महसूल विभागाकडून सदर कंपनीची एनओसी मागितली जाते . कंपनीच्या एनओसी शिवाय कोणताही व्यवहार केला जात नाही . त्यामुळे स्वातंत्र्यांनंतर ही मीरा-भाईंदर शहर अद्याप 'लगान' पासून स्वातंत्र न झाल्याने स्थानिक नागरिक, जमिनधारक यांच्यात तीव्र संतापाची व असुरक्षिततेची भावना आहे . उक्त प्रकरणी स्थानिक नागरीकांसह सर्व पक्षीय लोकप्रतिनीधी यांनी शासनाकडे केलेल्या तक्रारी व सदर कंपनीच्या वसूली पासून मुक्त करण्याची व दोर्षीवर कठोर कारवाई करण्याची होत असलेली मागणी अजूनही गांभीर्याने घेतली जात नाही . 

डिसेंबर, २०२३ मध्ये विधानसभेत हा मुद्दा आला असता महसूल मंत्री यांनी याबाबत तातडीने चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सभागृहात आश्वासन दिले होते . तथापी अद्याप या प्रकरणी कोणतीच ठोस कार्यवाही होत नाही . परिणामी नागरिकांत शासनाप्रती निर्माण झालेली नैराश्याची व असंतोषाची भावना पाहता शासनाने तातडीने इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी बाबत  ठोस निर्णयात्मक कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे आ . सरनाईक यांनी म्हटले आहे .