शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही ‘नागूूबाई’चे रहिवासी चार दिवस रस्त्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 05:23 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही सलग चौथ्या दिवशी ‘नागूबाई निवास’च्या रहिवाशांना सोमवारही रस्त्यावरच काढावा लागला.

डोंबिवली : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही सलग चौथ्या दिवशी ‘नागूबाई निवास’च्या रहिवाशांना सोमवारही रस्त्यावरच काढावा लागला. या रहिवाशांच्या पर्यायी निवा-याची व्यवस्था व्हावी, याकरिता केडीएमसी प्रशासनासह महापौर राजेंद्र देवळेकरांनी दिवसभर प्रयत्न करूनही तांत्रिक मुद्यांची पूर्तता न झाल्याने बीएसयूपीच्या घरांमध्ये किंवा पांडुरंगवाडीच्या रात्रनिवारा केंद्रात सोमवारीही रहिवाशांना प्रवेश मिळाला नाही.‘ह’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे हे दिवसभर इमारतीमधील सामान बाहेर काढण्यात व्यस्त होते, तर संध्याकाळनंतर मात्र त्यांनी पोकलेन लावून इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रहिवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. रहिवासी एकत्र आले व त्यांनी पालिकेच्या अधिका-यांना जाब विचारला. पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तात्पुरत्या निवा-याचे काय झाले? त्याची पूर्तता कधी होणार? इमारत पाडण्याआधी याची उत्तरे आम्हाला मिळायला हवी. त्याखेरीज, आम्ही इमारत जमीनदोस्त करू देणार नाही, असा पवित्रा रहिवाशांनी घेतल्याने तणाव वाढला होता. रहिवासी प्रसाद भानुशाली यांनी सांगितले की, पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी सकाळी अधिकारी वानखेडे व नगरसेवक आमच्यासमवेत बसून पर्यायी निवा-याची पूर्तता करणार होते. मात्र, त्याचे नेमके काय झाले. ते संध्याकाळ झाली तरी आम्हाला कळले नाही. संध्याकाळी साडेपाचनंतर अचानक वानखेडे यांनी पोकलेन आणले आणि दोन मजल्यांवरील गॅलरी पाडल्या. अजूनही बहुतांश घरांमध्ये पंखे, दिवाण, कपाट असे सामान आहे. ते काढण्यापूर्वीच इमारत कशी पाडणार, असा आम्हा रहिवाशांना पडलेला सवाल आहे. पर्यायी निवाºयाची सोय झालेली नाही. घरांतील सर्व सामान बाहेर काढलेले नाही, अशा परिस्थिती आम्ही कारवाई करू देणार नाही, असे ते म्हणाले. सोमवारीही रस्त्यावरच राहावे लागणार असल्याने समस्या गंभीर होत असल्याची प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली.रहिवाशांच्या निवास दाखल्यांच्या प्रती मुख्यालयात दिल्या आहेत. आता त्यांच्या तात्पुरत्या निवाºयासंदर्भात मुख्यालयातील अधिकारी जो निर्णय घेतील, त्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करेन.- अरुण वानखेडे, ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी, केडीएमसीनागूबाई निवासमधील अत्यंत गरजू अशा रहिवाशांना तात्पुरता निवारा देण्यासाठी महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दिवसभर आयुक्तांसमवेत चर्चाही झाल्या. तांत्रिक बाबींमुळे अंतिम निर्णय झाला नसला, तरी दिलासा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.- राजेंद्र देवळेकर,महापौर, कल्याण-डोंबिवली

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे