शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

७१ वर्षांनंतरही उल्हासनगर भकासच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 00:43 IST

आज वर्धापन दिन : विकासाच्या नावाने बोंब

सदानंद नाईक ।उल्हासनगर : शहर स्थापनेला शनिवारी ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, इतक्या वर्षांत विकासाच्या नावे बोंब असून शहर भकास झाल्याचे चित्र दिसत आहे. शहराचा ऐतिहासिक शिलालेख तरणतलाव येथे ठेवण्यात आला असून वर्धापनदिनी शिलालेखाची आठवण नेत्यांना होते.

देशाच्या फाळणीवेळी विस्थापित झालेल्या बहुसंख्य सिंधी बांधवांना कल्याणशेजारील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीच्या बॅरेक व खुल्या जागेवर वसविण्यात आले. विस्थापितांच्या वस्तीचे देशाचे पहिले गव्हर्नर सी. गोपालचारी यांनी ८ आॅगस्ट १९४९ रोजी उल्हास नदीवरून उल्हासनगर नामकरण केले. उद्या शहर ७१ वर्षांचे होत आहे. व्यापारी हबमुळे शहराचे नाव राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. मात्र, इतर शहरांच्या तुलनेत विकास होण्याऐवजी भकासच झाले आहे. महापालिकेला टी. चंद्रशेखर, आर.डी. शिंदे, रामनाथ सोनवणे, मनोहर हिरे, सुधाकर देशमुख यांच्यासारख्या आक्रमक आयुक्तांची गरज आहे. मात्र, महापालिकेला बहुतांश आयुक्त हे केबिनमध्ये बसून गाडा हाकणारे मिळाल्याने शहराचा विकास खुंटल्याची टीका होत आहे. तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिकारी महापालिकेला देत नसल्याने वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांच्या ८० टक्के जागा रिक्त आहेत. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढल्याने शहर विकासापासून दूर आहे.शहरातील प्रसिद्ध जीन्स मार्केटला केव्हाच घरघर लागली असून इतर मार्केटची दुरवस्था झाली आहे. बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया ठप्प पडली असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वालधुनी नदीकिनारी अतिक्रमण वाढले आहे. राजकीय नेत्यांचा पालिका कारभारात हस्तक्षेप वाढल्याने कोणताही अधिकारी प्रतिनियुक्तीवर येत नाही, अशी येथील परिस्थिती आहे. स्थानिक अधिकाºयांची मक्तेदारी वाढून ते राजकीय नेत्यांच्या हातचे बाहुले बनल्याची टीका होत आहे.शिलालेखाचे होणार पूजनशहराचे नामांतर झालेल्या ऐतिहासिक शिलालेखाचे दरवर्षीप्रमाणे पूजन करणार असल्याची माहिती वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी दिली. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार कोरोनामुळे कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर