शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

लेखा आक्षेपांच्या पूर्ततेसाठी पाच पथके केली स्थापन, अधिकाऱ्यांकडून होणार वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 01:17 IST

केडीएमसीच्या लेखापरीक्षणानुसार २००२ पासून २०१६ पर्यंत सात हजार ६०४ आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. या लेखा आक्षेपांची पूर्तता संबंधित खात्यांनी न केल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.

कल्याण : केडीएमसीच्या लेखापरीक्षणानुसार २००२ पासून २०१६ पर्यंत सात हजार ६०४ आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. या लेखा आक्षेपांची पूर्तता संबंधित खात्यांनी न केल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. या आक्षेपांची पूर्तता करण्याचे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी देतानाच पाच लेखा पथके तयार केली आहेत. आक्षेप घेतलेल्या प्रकरणातील रक्कम वसूल न झाल्यास ती संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात येणार आहे.महापालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत २०१५-१६ लेखापरीक्षणाचा अहवाल मंजुरीसाठी ठेवला होता. या अहवालास मंजुरी देण्यापूर्वी प्रशासकीय अहवाल तयार करण्याची मागणी शिवसेना सदस्य वामन म्हात्रे यांनी केली. त्यावेळी प्रशासनाने अहवाल तयार करण्याचे आदेश सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिले आहेत. मुख्य लेखापरीक्षक दिनेश थोरात यांनी तयार केला अहवाल तयार केला होता. बुधवारी हा अहवाल मंजुरीसाठी येताच अन्य सदस्यांनी लेखा आक्षेपांची पूर्तता केली जात नाही, तसेच ही पूर्तता न करणा-या अधिकारी-कर्मचाºयांकडून त्याची वसुली होत नसल्यामुळे पालिकेचे नुकसान होत आहे. याप्रकरणी संबंधितांविरोधात कारवाईही होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हा अहवाल मंजूर करून महासभेसमोर मंजुरीसाठी पाठवण्याची मागणी केली. आक्षेपांची पूर्तता होत नसल्याप्रकरणी वामन म्हात्रे यांनी मागील आठवड्यात करविभागाच्या आढावा बैठकीपूर्वी एक पत्र देऊन याकडे लक्ष वेधले होते.आयुक्तांनी २१ नोव्हेंबरला यासंदर्भात परिपत्रक काढले होते. आक्षेपांची पूर्तता न केल्याने वसूलपात्र रक्कम अडकून राहते. त्यासाठी पाच पथके तयार केली असून त्यांना सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळे ही वसूलपात्र रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकते, याकडे लक्ष वेधले आहे. संबंधित पथकांद्वारे ्रपर्तता केली नाही, तर वसूलपात्र रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाईल, असे परिपत्रकात नमूद आहे.१९८३ पासूनच्या लेखापरीक्षण अहवालानुसार, आतापर्यंत नोंदलेल्या आक्षेपांचा आकडा हा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वसूलपात्र रक्कम ही चार अब्ज रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी ५० टक्के रक्कम वसूल झाली तरी महापालिकेच्या तिजोरीत दोन अब्ज इतकी रक्कम जमा होऊ शकते.२०१५-१६ च्या लेखापरीक्षणातील आक्षेप काय आहेत?कॅशबुक ठेवलेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर जादा व्याज दिले गेले आहे. धनादेश न वटल्याने नागरी सुविधा केंद्रातील वसूल रकमांचे आकडे फुगलेले आहेत. धनादेश न वटल्याने महापालिकेचे किमान सहा कोटींचे नुकसान झाले आहे.सात व्यावसायिकांकडून स्थानिक संस्था करांची वसुली केलेली नाही. त्यामुळे २६ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. मोहने येथे पाण्याची टाकी उभारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ८९ लाख होती. ही रक्कम दिलेली आहे. मात्र, पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झालेले नाही.जेंडर बजेटसाठी सहा कोटी रुपये ठेवले होते. त्यापैकी केवळ ९४ लाख रुपये खर्च झालेले आहे. उर्वरित निधी का खर्च केला गेला नाही. महापालिकेने ई-गव्हर्नन्स प्रणालीअंतर्गत माय नेट प्रणाली अवलंबिली. त्यामध्ये १२ प्रणाली घेण्यात आल्या. त्यापैकी सात प्रणालीच कार्यरत असून पाच प्रणाली कार्यरत नाही.घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात कच-यापासून बायोगॅस प्रकल्प, खत प्रकल्प, वीजनिर्मिती, प्लास्टिक पुनर्वापर प्रक्रिया राबवली पाहिजे, तरच कचरा वाहतुकीवर होणारा खर्च कमी होऊ शकतो. लेखापरीक्षणासाठी मोड्युलर आॅडिट प्रणालीचा अवलंब केला पाहिजे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका