शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी बार्टी व सारथी प्रमाणे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम संस्था स्थापन करा

By नितीन पंडित | Updated: January 30, 2024 18:22 IST

सपा आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या योजना या परतफेडीच्या कर्जयोजना असून त्याचा लाभ अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थांच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी बार्टी, महाज्योती,अमृत या संस्थाच्या धर्तीवर भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम संशोधन,प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था स्थापन करावी अशी मागणी भिवंडीचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

अल्पसंख्यांक समाजतील विद्यार्थी व युवक - युवतींच्या उन्नतीसाठी १९५६ मध्ये ‘मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन केले.मंडळाच्यावतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना आणि उद्योग-व्यवसायासाठी मुदत कर्ज योजना राबवल्या जातात.मंडळाची ३० कोटी शासन हमी ९ जानेवारी२०२४ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे ५०० कोटी केली आहे.मात्र मंडळाच्या योजना कर्ज योजना म्हणून कायम आहेत.त्यामध्ये जामीनदार शासकीय नोकरदार असावा लागतो किंवा स्थावर मालमत्ता तारण ठेवावी लागते.या अटींची पूर्तता करणे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना अशक्य आहे.त्यामुळे कर्ज योजनांचा लाभ घेण्यापासून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी वंचित राहात आहेत,असे आमदार शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.

सारथी,बार्टी,महाज्योती या संस्था त्या,त्या समाजघटकातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी शिष्यवृत्ती, ट्रेनिंग आदी उपक्रम राबवतात.पीएच.डी.करणाऱ्या तसेच परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शिष्यवृत्ती देतात.या प्रकारचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना कोणत्याही शासन योजनेतून मिळत नाही.अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण नाही.परिणामी, बहुतांशी विद्यार्थी शिक्षणापासून आणि पर्यायाने विकासापासून वंचित राहत आहेत.त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांवर आणि युवक- युवतींवर अन्याय होत असल्याची भावना समाजात असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.त्यामुळे सारथी,बार्टी,महाज्योती, आणि अमृत या स्वायत्त संस्थांप्रमाणे ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था’ स्थापन करावी आणि अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी