शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी बार्टी व सारथी प्रमाणे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम संस्था स्थापन करा

By नितीन पंडित | Updated: January 30, 2024 18:22 IST

सपा आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या योजना या परतफेडीच्या कर्जयोजना असून त्याचा लाभ अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थांच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी बार्टी, महाज्योती,अमृत या संस्थाच्या धर्तीवर भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम संशोधन,प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था स्थापन करावी अशी मागणी भिवंडीचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

अल्पसंख्यांक समाजतील विद्यार्थी व युवक - युवतींच्या उन्नतीसाठी १९५६ मध्ये ‘मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन केले.मंडळाच्यावतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना आणि उद्योग-व्यवसायासाठी मुदत कर्ज योजना राबवल्या जातात.मंडळाची ३० कोटी शासन हमी ९ जानेवारी२०२४ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे ५०० कोटी केली आहे.मात्र मंडळाच्या योजना कर्ज योजना म्हणून कायम आहेत.त्यामध्ये जामीनदार शासकीय नोकरदार असावा लागतो किंवा स्थावर मालमत्ता तारण ठेवावी लागते.या अटींची पूर्तता करणे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना अशक्य आहे.त्यामुळे कर्ज योजनांचा लाभ घेण्यापासून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी वंचित राहात आहेत,असे आमदार शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.

सारथी,बार्टी,महाज्योती या संस्था त्या,त्या समाजघटकातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी शिष्यवृत्ती, ट्रेनिंग आदी उपक्रम राबवतात.पीएच.डी.करणाऱ्या तसेच परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शिष्यवृत्ती देतात.या प्रकारचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना कोणत्याही शासन योजनेतून मिळत नाही.अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण नाही.परिणामी, बहुतांशी विद्यार्थी शिक्षणापासून आणि पर्यायाने विकासापासून वंचित राहत आहेत.त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांवर आणि युवक- युवतींवर अन्याय होत असल्याची भावना समाजात असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.त्यामुळे सारथी,बार्टी,महाज्योती, आणि अमृत या स्वायत्त संस्थांप्रमाणे ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था’ स्थापन करावी आणि अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी